Original Title
जन्म मृत्यू च्या पलीकडे
Subject & College
Series
Publish Date
1994-01-01
Published Year
1994
Publisher, Place
Total Pages
58
ISBN 13
978-93-82716-83-9
Format
Paperback
Country
India
Language
Marathi
Readers Feedback
जन्म मृत्यू च्या पलीकडे
Book Review : Sonawane Gaurav Gopal, MGV's Loknete Vyankatrao Hiray Arts Science and Commerce College Panchvati, Nashik. शरीर आणि आत्मा यातील भेद.. या आपल्या देहामध्ये...Read More
Sonawane Gaurav gopal
जन्म मृत्यू च्या पलीकडे
Book Review : Sonawane Gaurav Gopal, MGV’s Loknete Vyankatrao Hiray Arts Science and Commerce College Panchvati, Nashik.
शरीर आणि आत्मा यातील भेद..
या आपल्या देहामध्ये वास करणारा जीव. हा शाश्वत ( चिरायु, दीर्घकाळ टिकणारा).असुन त्याचा कधीच वध नाही होऊ शकत. म्हणून आपल्याला त्या गोष्टी साठी दुःख करण्याची गरज नाही. कारण आपला आत्मा आणि आपले शरीर दोन वेग- वेगळे आहेत. आणि मृत्यु झाल्यावर आपला आत्माच्या आपल्या शरीराचा मृत्यू होतो. आपला आत्मा हा कधीच मृत्यू होऊ शकत नाही. आणि हे मन्नुष्याला समजल पाहीजे की आपल शरीर हे शरीर नसुन एक आत्मा आहे. हे समजन गरजेचे आहे.
मी या सर्व यज्ञ आणि तपस्यांचा परम भोक्ता, सर्व ग्रहलोक आणि देवदेवतांचा परमेश्वर आणि सर्व जीवांचा हितकर्ता तथा सर्व जीवाच्या कल्याणाची इच्छा करणारा आहे .हे मनुष्याला जाणून घेतल की समजतं माझ मनुष्य सांसारीक- दुःखांपासून शांती प्राप्त करू शकतो असं वाटेल .
अन्तवन्त इमे देहा देहा निलक्ष्यीक्ता शरीरिणः । अनाशिनी ड प्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत ।। जविनाशी अमयदि आणि शास्वत जीवात्माच्या शरीराचा निश्चितपणे अंत होणार अहि.
म्हणून श्रीकृष्ण आपलयाला आपल्या देवात्मबुद्धीच्या पलीकडे जाऊन खरे आध्यामिक जीवन प्राप्त करण्यासाठी प्रोत्साहित करतात.
मृत्यूनंतर आत्म्याची प्रगती त्याच्या भक्ती आणि कर्मानुसार निर्धारित होते. कृष्ण भावनेत जीवन जगणाऱ्या व्यक्तीला परमात्म्याच्या धाम प्राप्तीची संधी मिळते.
1)मूलभूत तत्त्व=
आत्मा अमर असतो.
शारीरिक मृत्यू हा केवळ एक संक्रमण आहे.
पूर्वीच्या कर्माप्रमाणे पुढील जन्म निश्चित होतो.
2)प्रगतीचे टप्पे.
आध्यात्मिक स्तर:
कर्माप्रमाणे वेगवेगळ्या लोकांमध्ये जन्म.
भौतिक किंवा आध्यात्मिक लोकांत प्रवेश.
कृष्ण भावनेनुसार उच्च आध्यात्मिक धामाकडे प्रगती.
3)चेतनेचे स्तर:
शुद्ध चेतनेकडे वाटचाल.
भौतिक बंधनातून मुक्ती.
परमात्म्याशी एकरूप होण्याची संधी.
मोक्ष प्राप्तीचे मार्ग:
कर्मयोग: निःस्वार्थ कर्म करणे, फलाची अपेक्षा न ठेवता
आत्मज्ञान: स्वतःच्या गुण-दोषांचे भान ठेवणे
करुणाभाव: दुसऱ्यांप्रती दया व प्रेम दाखविणे
कठिणाईंचा सामना: आव्हानांना निर्भयपणे तोंड देणे
मानसिक शांति: स्वार्थ मुक्त कर्मातून संतुष्टी मिळविणे.
भगवान श्रीकृष्ण आणि सामान्य जीव यांमधील आणखी एक भेद असा की, जीवात्मा एका वेळी एकाच ठिकाणी असू शकतो; परंतु श्रीकृष्ण मात्र ब्रह्मांडामध्ये सर्वत्र असूनही त्याच वेळी स्वतःच्या धामातही असतात. आध्यात्मिक जगामधील गोलोक वृंदावन हे श्रीकृष्णांचे धाम आहे. हेच गोलोक वृंदावन पृथ्वीवर भारतामध्ये वृंदावन म्हणून अवतीर्ण झाले आहे. जेव्हा श्रीकृष्ण स्वतः आपल्या अंतरंगा शक्तीने अवतीर्ण होतात, तेव्हा त्यांचे धामही अवतीर्ण होते. दुसऱ्या शब्दांत सांगावयाचे तर, भगवंत पृथ्वीवर अवतीर्ण होतात तेव्हा ते त्या विशिष्ट स्थानावर स्वतः प्रकट होतात. असे असूनही वैकुंठामध्ये श्रीकृष्णांचे धाम नित्य अस्तित्वात असते. या श्लोकामध्ये श्रीकृष्ण स्पष्ट करतात की, जो कोणी त्यांच्या वैकुंठामधील धामामध्ये प्रवेश करतो, त्याला भौतिक जगामध्ये जन्म घ्यावा लागत नाही. अशा व्यक्तीला महात्मा म्हणतात. पाश्चात्त्य देशांमध्ये ‘महात्मा’ हा शब्द महात्मा गांधींच्या संदर्भात ऐकला जातो; परंतु ‘महात्मा’ ही काही राजकीय नेत्याची उपाधी नव्हे हे आपण जाणले पाहिजे.
त्यांनी एक मार्ग शिकवला ज्यामध्ये स्वतःला एक शाश्वत अध्यात्मिक अस्तित्व समजून घेण्याचे उद्दिष्ट आहे , एखाद्याच्या तात्पुरत्या भौतिक शरीरापासून वेगळे आहे, आणि कृष्ण नावाने ओळखल्या जाणाऱ्या परम सजीवांसोबतचे सुप्त संबंध पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करतात . विविध पद्धतींद्वारे, विशेषत: प्रमाणित ग्रंथांमधून कृष्णाबद्दल ऐकून, कृष्णाच्या नावांनी युक्त मंत्रांचा जप करून आणि कृष्णाची भक्तीपूर्ण सेवा करून जीवन अंगीकारून हे काम करतो.
