Share

Publisher, Place

Total Pages

156

Format

paper back

Language

Marathi

Readers Feedback

प्रकाशवाटा

(पुस्तक परीक्षण- अनिल मोहन दळवी, Librarian) JSPM Narhe Technical Campus, Pune प्रकाशवाटा’ हे डॉ. प्रकाश आमटे यांनी त्यांच्या हेमलकसाच्या ‘लोकबिरादरी प्रकल्पा’तल्या अनुभवांवर लिहिलेले पुस्तक आहे....Read More

Anil Mohan Dalvi

Anil Mohan Dalvi

×
प्रकाशवाटा
Share

(पुस्तक परीक्षण- अनिल मोहन दळवी, Librarian) JSPM Narhe Technical Campus, Pune

प्रकाशवाटा’ हे डॉ. प्रकाश आमटे यांनी त्यांच्या हेमलकसाच्या ‘लोकबिरादरी प्रकल्पा’तल्या अनुभवांवर लिहिलेले पुस्तक आहे. डॉ. बाबा आमटेंचे समाजकार्य अविरत पुढे चालू ठेवताना त्यांची दोन मुले डॉ. प्रकाश आणि डॉ. विकास यांनी आपले आयुष्य देखील त्यांच्या या कार्यासाठी वाहिले. अशाच एका कामाची लोकविलक्षण कहाणी म्हणजे “प्रकाशवाटा”. महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील भामरागडच्या दुर्गम भागात ‘माडिया-गोंड’ ही कशीबशी लाज झाकावी एवढीच कपडे वापरणारी अतिशय मागासलेली जमात वास्तव्य करून आहे. अंगभर कपडे घातलेला माणूस बघून घाबरून दूरवर जंगलात पळून जाणारे हे आदिवासी भूक, रोगराई, अंधश्रद्धेच्या विळख्यात सापडलेले या कथेतून अनुभवायला मिळतात.

डॉ. प्रकाश आमटे त्याचे बालपण आणि जडणघडणीच्या अनेक प्रसंगांचे वर्णन या पुस्तकात आहे. हे पुस्तक म्हणजे खरंतर प्रकाश आमटेंच्या जीवनातील अनेक किस्स्यांचा संग्रहच. यातील काही खळखळून हसवतात, तर काही डोळ्यातून टचकन पाणी आणतात. हे सर्व किस्से एकेमकांमध्ये सुसंबद्धपणे गुंफून आमटेंनी हेमलकसाच्या लोकबिरादरी प्रकल्पाची आणि त्यांच्या जीवनाची गोष्ट सांगितली आहे. त्यांच्या या प्रवासातून शिकण्यासारखे बरेच काही आहे. त्यामुळे हे पुस्तक जरूर वाचावे. अगदीच काही नाही तर अनेक गोष्टींविषयी एक नवा दृष्टिकोन नक्की मिळेल.

ध्येयवेड्या वृत्तीच्या डॉ. बाबा आमटेंनी अशा या दुर्गम भागात प्रकल्प उभारण्याचे ठरवले. वयाच्या साठाव्या वर्षीची बाबांची जिगर पाहून डॉ. प्रकाश यांनी तत्काळ या प्रकल्पाची धुरा सांभाळण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या कार्यात त्यांची नुकतेच लग्न करून आलेली पत्नी डॉ. मंदाताई देखील सामील झाल्या. “प्रकाशवाटा” मध्ये मनाला चटका लाऊन जाणारे अनेक प्रसंग आहेत. अत्यंत कठीण परिस्थितीतून, जीवावर बेतणाऱ्या प्रसंगातून मार्ग काढत हेमलकशाला इस्पितळ, शाळा सुरु करणाऱ्या झपाटलेल्या लोकांची ही कहाणी आहे.

प्रकाशवाटा

प्रकाशवाटा हे पुस्तक डॉ.प्रकाश आणि डॉ. मंदा आमटे यांच्या महाराष्ट्रातील हेमलकसा जिल्हा गडचिरोली येथील जीवनातील संकटे आणि संकटांनशी निगडीत येथील आहे. ज्यात लोकबिरादरी प्रकल्प सुरु...Read More

प्रा. अपेक्षा सुर्यकांत गावडे, तुळजाराम, चतुरचंद महाविद्यालय, बारामती.

प्रा. अपेक्षा सुर्यकांत गावडे, तुळजाराम, चतुरचंद महाविद्यालय, बारामती.

×
प्रकाशवाटा
Share

प्रकाशवाटा हे पुस्तक डॉ.प्रकाश आणि डॉ. मंदा आमटे यांच्या महाराष्ट्रातील हेमलकसा जिल्हा गडचिरोली येथील जीवनातील संकटे आणि संकटांनशी निगडीत येथील आहे. ज्यात लोकबिरादरी प्रकल्प सुरु केल्यापासून आजपर्यंतचा प्रवास दर्शिवला आहे. या भागातील “माडिया गोंड”जमातींना आघाडीवर आणण्याचा त्यांचा प्रयत्न होता. या आदिवासींना आधुनिक जीवनाची ओळख नव्हती. त्यांना जगात स्वतःला सिद्ध करण्याची संधी नव्हती. त्यांच्याकडे शिक्षण आरोग्य सेवा किवा उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नव्हते. बाबा आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली आशीर्वादाने त्यांनी, त्याच्या पत्नी डॉ मंदा त्यांचे भाऊ डॉ विकास यांनी हे काम केले. यामध्ये त्यांचा त्यासाठी चा खडतर प्रवास व आधुनिक सुख सुविधांचा त्याग दर्शविला आहे. आणि हेमलकसा नावाच्या ठिकाणी हे स्वप्न कसे प्रत्यक्षात आले याची हि कथा आहे.

आयुष्याकडे बघण्याचा एक नवीन दृष्टीकोन देणारं हे पुस्तक

कु.निर्मला बाबू मेमाणे तृतीय वर्ष कला , अण्णासाहेब आवटे कॉलेज ,मंचर डॉ.प्रकाश बाबा आमटे लिखित "प्रकाशवाटा"हे त्यांचं आत्मकथन आहे.या आत्मचरित्रातून प्रेरणा आणि ऊर्जा मिळते ....Read More

कु.निर्मला बाबू मेमाणे

कु.निर्मला बाबू मेमाणे

×
आयुष्याकडे बघण्याचा एक नवीन दृष्टीकोन देणारं हे पुस्तक
Share

कु.निर्मला बाबू मेमाणे तृतीय वर्ष कला , अण्णासाहेब आवटे कॉलेज ,मंचर
डॉ.प्रकाश बाबा आमटे लिखित “प्रकाशवाटा”हे त्यांचं आत्मकथन आहे.या आत्मचरित्रातून प्रेरणा आणि ऊर्जा मिळते .
प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा आपल्या प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर.आयुष्यात येणाऱ्या अडीअडचणीवर मात करतं सतत चालतं राहणे,मुळात हे फार कठीण काम असतं.हे काही सर्वांनाच जमतं नाही.आपल्यासाठी व आपल्या कुटुंबासाठी तर सर्वंच जगतात पण समाजातील दबलेल्या,कुचलेल्या आणि वंचित व दुर्लक्षित घटकांतील लोकांसाठी जगायला किंवा त्यांच्याबद्दल विचार करायला किती जणांकडे वेळ असतो ?
आज आपल्याला योग्य तो आहार आणि चांगल्या आरोग्य सुविधा मिळतात.पण त्या रानात मानवी वस्तीपासून कोसो दूर राहणाऱ्या आदिवासी समाजाचा काय ?त्यांच्यापर्यंत या बेसिक सुविधा खरंच पोहचतात का ?यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आजपर्यंत कोणी किती आणि काय काय प्रयत्न केले आहेत ? हा प्रश्न आपल्यापैकी प्रामुख्याने किती जणांना पडतो ?त्या माणसांसाठी सुद्धा काही करायला हवं,त्यांना सुद्धा योग्य त्या सुविधा मिळायला हव्या.यासाठी आपण प्रयत्न करायला हवे असे किती जणांना वाटते ?
हे प्रश्न काही वर्षांपूर्वी एका व्यक्तीला पडले होते.त्या व्यक्तिमत्त्वाचं नाव होतं,’थोर समाजसेवक बाबा आमटे”.यांनी या प्रश्नांची उत्तरे शोधायला सुरुवात केली आणि उत्तरे शोधून शांत न बसता त्यावर उपाय शोधून अंमलबजावणी सुद्धा केली.समाजातील कुष्ठरोगी,अंध,अपंग,कर्णबधिर, आदिवासी अशा विविध वंचित आणि दुर्लक्षित घटकांना माणूसपणाचं सन्मान्य जगणं जगता यावं यासाठी बाबा आमटे यांनी आपलं उभं आयुष्य झिजवलं आहे. बाबा आमटे आणि साधना आमटे यांनी १९४९ मध्ये “आनंदवनाची उभारणी केली. संपूर्ण समाज नाकारत असलेल्या कुष्ठरोग्यांना या ठिकाणी आश्रय त्यांनी दिला.
डॉ.प्रकाश आमटे यांनी “हेमलकसा”या अतिशय दुर्गम भागात जाऊन आदिवासी समाजासाठी कार्य करायला सुरुवात केली,आणि येथूनच सुरुवात झाली “लोकबिरादरी प्रकल्पा’ची.प्रकाशवाटा’ हे डॉ. प्रकाश आमटे यांनी त्यांच्या हेमलकसाच्या ‘लोकबिरादरी प्रकल्पा’तल्या अनुभवांवर लिहिलेले अप्रतिम पुस्तक आहे. डॉ. बाबा आमटेंचे समाजकार्य अविरत पुढे चालू ठेवताना त्यांची दोन मुले डॉ. प्रकाश आणि डॉ. विकास यांनी आपले आयुष्य देखील त्यांच्या या कार्यासाठी वाहिले. अशाच एका कामाची लोकविलक्षण कहाणी आहे .
डॉ.प्रकाश आमटे म्हणतात :- ‘आदिवासींना मुख्य प्रवाहात आणावं, त्यांची पिळवणूक थांबावी आणि त्यांना माणूस म्हणून जगण्याची संधी मिळवून द्यावी, असं बाबा आमटेंच्या मनात होतं. या कामाची जबाबदारी मी घेतली आणि सर्वांनी मिळून ती पार पाडली. बाबांचं हे स्वप्न हेमकलशात प्रत्यक्षात कसं उतरतंय, त्याची ही गोष्ट! म्हटली तर माझ्याही जीवनाची गोष्ट.’सामाजिक कार्यासाठी ‘रेमन मॅगसेसे’ हा जागतिक पातळीवरचा पुरस्कार डॉ. प्रकाश आमटे यांना देण्यात आला आहे. दुर्गम भागात गेली चार दशकं सुरु असलेल्या नि:स्वार्थ कामाची ही ओळख संस्मरणीय तर ठरतेच पण अनेकांना प्रेरणाही देते.
डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी हे दोघे गेली ४० वर्षे कोणतीही तक्रार न करता सगळ्या अडचणींवर मात करत हेमलकसा येथे आनंदाने काम करत आहेत.. त्यांना असे जगताना पाहून आयुष्य काय असते, याची खऱ्या अर्थाने जाणीव होते..”आदिवासी कधी जन्माला आणि कधी मेला याची कोणाला काही परवाच नसते”.या पुस्तकांतून ही बाब अधोरेखित होते.पुस्तकातून आपल्या समाजातील अनेक गोष्टीवर प्रकाश आमटे भाष्य करतात.अंधश्रद्धा, रूढी-परंपरा,वृक्षतोड,आदिवासींचे जीवन व त्यांना न मिळणाऱ्या सुविधा,शिक्षण,आरोग्याचा तुटवडा व इतर अनेक बाबी आपल्याला वाचायला मिळतात..

‘Journey of Indigenous People’ from darkness of religion and superstition to the pathways to light of modern life.

Review By MS. JAYSHREE S. BHADANE (Asst Professor), Loknete Dr. J. D. Pawar College of pharmacy Manur The books given the information of all the...Read More

MS. JAYSHREE S. BHADANE

MS. JAYSHREE S. BHADANE

×
‘Journey of Indigenous People’ from darkness of religion and superstition to the pathways to light of modern life.
Share

Review By MS. JAYSHREE S. BHADANE (Asst Professor), Loknete Dr. J. D. Pawar College of pharmacy Manur
The books given the information of all the countless efforts taken by the author to change the social lief of indigenous peoples.(Aadivasi from Bhamaragarh)

Submit Your Review