
राजकीय विचारवंत पाश्चिमात्य आणि भारतीय या पुस्तकात राजकीय तत्त्वज्ञान हा विषय अनादी कालापासून चिंतनाचा आणि कुतूहलाचा झाला आहे मानवी समाजामध्ये जी सामाजिक घुसळण वैचारिक क्रांती आणि सामाजिक आर्थिक तथा राजकीय संरचनांमध्ये जे फेरबदल होत गेले त्यामागे राजकीय तत्त्वज्ञान हीच प्रेरक शक्ती राहिलेली आहे राजकीय विचारमंथनाशिवाय राजकारण हे शाडे नसलेल्या जहाजासारखे किंवा डोरा तुटलेल्या पतंगासारखे भरकटत राहील व त्याचा अंत झाल्याशिवाय राहणार नाही पाठीमात्य आणि पौरात्य जगात प्रामुख्याने भारतात याचा अनुभव वेळोवेळी आला आहे युरोपात जेव्हा राजकीय गोंधळ व राजक माजले तेव्हा त्याला त्या संकटातून वेचून बाहेर काढण्याचे कार्य तत्कालीन राजकीय विचारवंतांनी केले थॉमस हॉब्स बेंथम जॉन स्टुअर्ड मिल इत्यादींनी युरोपात जे कार्य केले कार्ल मार्क्स विचारवंतांनी युरोपातच नव्हे तर संपूर्ण जगात जे वैचारिक परिवर्तन केले तसेच जे कार्य भारतात कौटिल्य टिळक गांधी आंबेडकर यांनी केलेले दिसते यावरून मानवी जीवनाच्या अस्तित्वाच्या दृष्टीने राजकीय विचारांचे मूल्य आपल्या लक्षात येते राज्यशास्त्राच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून राजकीय विचारवंतांच्या विचारांचा अभ्यास हा अतिशय महत्त्वाची बाब आहे.