Availability
available
Original Title
आमचा बाप आन् आम्ही
Subject & College
Publish Date
2013-01-01
Published Year
2013
Publisher, Place
Total Pages
299
Format
Paperback
Country
India
Language
Marathi
Average Ratings
Readers Feedback
आमचा बाप आन् आम्ही
Kamble Bhakti Rajendra , (Department of Sociology) Savitribai Phule Pune University, Pune. एकदा वर्गात मी माझ्या सरांच्या बोलण्यात एक वाक्य ऐकलं, "तू तूझ्या बुद्धीला योग्य...Read More
Kamble Bhakti Rajendra
आमचा बाप आन् आम्ही
Kamble Bhakti Rajendra , (Department of Sociology)
Savitribai Phule Pune University, Pune.
एकदा वर्गात मी माझ्या सरांच्या बोलण्यात एक वाक्य ऐकलं, “तू तूझ्या बुद्धीला योग्य वाटल तेच होण्याचा प्रयत्न कर फक्त तू जे करशील तेच्यात टापला जायला पायजे”. हे वाक्य होतं ‘आमचा बाप आन आम्ही’ या पुस्तकातलं. हे कळताच मला ते पुस्तक वाचण्याची उत्कंठा वाढली आणि शेवटी मी ते पुस्तक घेऊन वाचलंच.
डॉ. नरेंद्र जाधव हे एक नामवंत शिक्षणतज्ञ, लेखक आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग सिंग यांच्या म्हणण्यानुसार एक आदर्श व्यक्तिमत्व आहेत. 2006 साली डॉ. नरेंद्र जाधव हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते. त्यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांतून ‘ आमचा बाप आन आम्ही’ हे एक.
लेखकांनी हे पुस्तक त्यांच्या वडिलांवर म्हणजेच दामोदर रुंजाजी जाधव यांच्यावर लिहिले आहे. लेखकांचे वडील हे बुद्धीप्रामाण्यवादी, प्रयत्नवादी निरीश्वरवादी होते. लेखकांच्या वडिलांना बाबा पेक्षा बाप हा शब्द जास्त रुचत असल्याने पुस्तकाचं नाव असं ठेवलं आहे. सगळ्यांना पुस्तकात लेखकांच्या बाबांचे दर्शन घडले आहे पण मला मात्र दोन बाबांचे दर्शन घडले: एक म्हणजे दामोदर रुंजाजी जाधव आणि दुसरे म्हणजे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर. पुस्तकातून शिकण्यासारखी अनेक वाक्ये आहेत. “तू जे करशील त्याच्यात टापला जायला पाहिजे”, छोटूमियां, किसी को डरने का नाही, क्या? आपुन क्या किसी के बाप का खाता है?”, “तू जो अभ्यास करशील, संशोधन करशील त्याचा रस्त्यावरचा सामान्य माणसाला उपयोग होणार नसलं तर ते सगळं झूट हाय”, इत्यादी. अंधश्रद्धा विरोधी, शिक्षणप्रेमी, महिला सक्षमीकरणाचे समर्थक, शेतकऱ्यांबद्दल कळकळ, बाबासाहेबांचे सच्चे अनुयायी म्हणून पुस्तकातून लेखकांनी त्यांच्या वडिलांचे दर्शन घडवून आणले. अस्पृशता अनुभवले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दादासाहेब गायकवाड, संत गाडगे महाराज यांच्या सहवासात आलेले, स्वतः अशिक्षित असतानाही आपल्या मुलांना शिक्षण देण्याची जिद्द लेखकांच्या वडिलांमध्ये दिसून येते. मला नेहमीच असं वाटत की समाजसुधारकांचे मोठमोठे फोटो, प्रतिमा घरात लावण्याआधी त्यांचे विचार डोक्यात घ्यावेत आणि ते आचरणात आणावेत आणि या पुस्तकात सुद्धा थोर समाज सुधारकांना डोक्यावर घेण्याएवजी डोक्यात घेणं अत्यंत गरजेचं आहे हे शिकायाला मिळेल. पुस्तकातल्या पत्रांचा (लेखक व त्यांच्या कुटुंबियांचा) प्रवास जातीव्यावेस्थेमुळे फारच खडतर होता. तो प्रवास वाचण्यासारखा आणि प्रेरणादायी आहे.
लेखकांची लेखन शैली ही तितकीच दमदार आहे. पुस्तक वाचून तर झालं पण एक प्रश्न मनात कोरला गेला तो म्हणजे – मी माझ्या बाबांकडून काय शिकले? ज्याचं उत्तर मी अजूनही शोधात आहे. पुस्तकात लेखकांच्या नातेवाईकांचे मनोगत थोड्या कमी पानांमध्ये असायला हवे होते. लेखकांच्या बहिणींनी सुद्धा त्यांच्या वडिलांबद्दल थोडे लिहायला हवे होते.
निळू फुलेंसारखंच मी सुद्धा, साने गुरुजींच्या ‘शामची आई’ नंतर नरेंद्र जाधव यांचं ‘आमचा बाप आन आम्ही’ हे पुस्तक मी आवर्जून सर्वांना वाचण्याची शिफारस करते.
आमचा बाप आन आम्ही
Book Review : Manoj Shivaji Wagh, MGV’s Loknete Vyankatrao Hiray Arts Science and Commerce College Panchvati Nashik. What Does It Really Mean to Live a...Read More
Manoj Shivaji Wagh
आमचा बाप आन आम्ही
Book Review : Manoj Shivaji Wagh, MGV’s Loknete Vyankatrao Hiray Arts Science and Commerce College Panchvati Nashik.
What Does It Really Mean to Live a Good Life?
Dr. Narendra Jadhav’s AMCHA BAAP AAN AMHI is not merely a
biography; it is an exploration of familial values, social constructs, and
the role of a father in shaping a child’s worldview. The title itself, which
translates to “Our Father and Us”, sets the tone for the reflective journey
that the author takes the reader on.
As a child of a father who was both a strict disciplinarian and an
affectionate guide, Dr. Jadhav delves into his personal life to offer a
moving narrative of how his father’s values, struggles, and aspirations
influenced his own choices and understanding of the world. The
author’s open and honest portrayal of his relationship with his father
speaks to a universal truth – the complex but deeply impactful nature of
fatherhood.
Through this book, Dr. Jadhav brings to light not just the emotional
connection he shares with his father but also paints a broader picture of
the socio-economic conditions in India, especially from the perspective
of a middle-class family. The book is replete with anecdotes from the
author’s childhood, his education, and the professional journey that
shaped his destiny. His reflections on these events are insightful, as he
dissects how these seemingly small experiences helped build the man
he is today.
The heart of the book lies in its exploration of human resilience. Dr.
Jadhav’s father, a man of modest means, faced numerous challenges,
yet managed to impart strong values of perseverance, respect, and
dignity to his children. The author’s admiration for his father is clear, but
he does not shy away from discussing the imperfections and the
hardships they both faced as part of the family dynamic.
The narrative is laced with emotions that any reader can relate to,
whether it be the moments of pride, the misunderstandings, or the
ultimate respect that forms between a parent and a child over time. One
of the book’s most significant strengths is its ability to engage readers
from diverse backgrounds, as the themes explored are timeless. It
touches on universal questions of what it means to live a good life, to
overcome adversities, and the importance of legacy.
Jadhav’s writing style is lucid and accessible, making the book an easy
read. However, it is his introspection and the manner in which he makes
the reader reflect on their own life experiences that make the book truly
memorable. The author’s deep understanding of human nature and the
emotional weight of his narrative shine through each page.
“AMCHA BAAP AAN AMHI” is not just a tribute to fatherhood but an
exploration of the broader family values that define a person’s character
and outlook on life. It challenges us to look beyond the superficial
aspects of life and to appreciate the deeper meaning that comes from
relationships, especially the father-child bond.
While the book is largely a personal account, the lessons it imparts are
applicable to anyone seeking to understand the dynamics of family life,
the impact of parental guidance, and the importance of emotional
intelligence in shaping one’s life. Dr. Jadhav subtly critiques societal
norms and offers a broader philosophical view on parenting, making the
book both a personal memoir and a social commentary.
One of the most profound aspects of the book is its focus on the father’s
role in fostering independence and resilience in children, without
imposing undue pressure. Dr. Jadhav’s reflections on his father’s quiet
strength, coupled with his own journey as a parent, make for a
compelling narrative that is as educational as it is emotional.
In conclusion, AAMACHA BAAP AAN AAMHI stands as a tribute to
fatherhood, but it is also a philosophical exploration of what it means to
live a meaningful life. Dr. Narendra Jadhav, with his characteristic
wisdom and storytelling flair, invites readers to think about their own
familial bonds, values, and the legacy they wish to leave behind.
Whether you are a parent, a child, or someone in search of life’s deeper
meaning, this book offers rich insights that resonate long after the last
page is turned.
आमचा बाप आन् आम्ही
Book Review : Tejas Ramesh Gholap, MGV’s Loknete Vyankatrao Hiray Arts Science and Commerce College Panchvati, Nashik. पुस्तक राजकारण आणि राजकारण्यांवर आधारित आहे. डॉक्टर नरेंद्र...Read More
Tejas Ramesh Golap
आमचा बाप आन् आम्ही
Book Review : Tejas Ramesh Gholap, MGV’s Loknete Vyankatrao Hiray Arts Science and Commerce College Panchvati, Nashik.
पुस्तक राजकारण आणि राजकारण्यांवर आधारित आहे. डॉक्टर नरेंद्र जाधवाच्या पुस्तकांमध्ये पक्षपातीवादी विरुद्ध लढा देण्याची आस आहे व त्याचबरोबर आधुनिकीकरणाची कास आहे आपल्या देशातील बहुसंख्य लोक कोणाची तरी एक बाजू धरून ठेवतात आपण आपल्या भूतकाळात रमत बसले तर आपल्या भविष्याबद्दल केव्हा लिहिणार आणि बोलणार. डॉक्टर जाधव यांनी लिहिलेल्या आत्मकथन आणि त्यांचे अर्थकारणावरील पुस्तक ही दोन्ही पुस्तके राजकीय नेत्यांची आणि समाज क्षेत्रातील कार्यकर्त्यांची मुद्दाम असावीत अशी आहेत असे मला आवर्जून सांगावेसे वाटते.
आमचा बाप आन आम्ही
Book Review : Sangale Rushikesh Mohan, MGV’s Loknete Vyankatrao Hiray Arts Science and Commerce College Panchvati Nashik. संघर्ष, प्रेरणा आणि स्वाभिमानाची कथा "आमचा बाप आनं...Read More
Sangale Rushikesh Mohan
आमचा बाप आन आम्ही
Book Review : Sangale Rushikesh Mohan, MGV’s Loknete Vyankatrao Hiray Arts Science and Commerce College Panchvati Nashik.
संघर्ष, प्रेरणा आणि स्वाभिमानाची कथा
“आमचा बाप आनं आम्ही” हे डॉ. नरेंद्र जाधव यांनी लिहिलेले आत्मचरित्र केवळ एका कुटुंबाची संघर्षगाथा नसून, समाजातील वंचित घटकांच्या उन्नतीसाठी दिलेली प्रेरणादायी साक्ष आहे.
डॉ. जाधव यांनी आपल्या वडिलांच्या संघर्षमय जीवनाचा मार्मिक वर्णन या पुस्तकातून केले आहे. त्यांनी आपल्या कुटुंबाच्या खडतर परिस्थितीचा आढावा घेतला असून, शिक्षण आणि स्वाभिमानाच्या जोरावर केलेल्या प्रगतीची प्रेरक कहाणी यात सादर केली आहे.
या पुस्तकातून त्यांच्या वडिलांचा प्रामाणिकपणा, कष्ट आणि शिक्षणाची जिद्द उलगडली जाते. कथेचा ओघ अत्यंत भावनिक आणि जिवंत असून, लेखकाचा अनुभव वाचकांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरतो.
पुस्तकाची भाषा साधी, सोपी आणि हृदयस्पर्शी आहे. हे पुस्तक प्रत्येक वाचकाला स्वतःच्या जीवनातील अडचणींवर मात करण्याची प्रेरणा देते.
विशेष गुण:
1. संघर्ष आणि यशाची प्रेरणा.
2. कथेची साधी व वास्तववादी मांडणी.
3. वडील-मुलांच्या नात्याचा हृदयस्पर्शी भाव.
कमतरता:
काही ठिकाणी वर्णन थोडेसे लांबवले आहे, परंतु ते मुख्य आशयाला धक्का देत नाही.
एकूण परीक्षण:
“आमचा बाप आनं आम्ही” हे पुस्तक सामाजिक भान जपणाऱ्या आणि प्रगतीसाठी प्रेरणा देणाऱ्या वाचकांसाठी नक्कीच वाचनीय ठरते. डॉ. जाधव यांची लेखनशैली आणि कथा वाचकाच्या मनात खोलवर घर करते.
आमचा बाप आन आम्ही
ग्रंथ परिक्षण : खंडावी हर्षल देवराम,महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित लोकनेते व्यंकटराव हिरे कला विज्ञान व वाणिज्य महाविदयालय, पंचवटी नाशिक आमचा बाप अन आम्ही – डॉ....Read More
Khandavi Harshal Devram
आमचा बाप आन आम्ही
ग्रंथ परिक्षण : खंडावी हर्षल देवराम,महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित लोकनेते व्यंकटराव हिरे कला विज्ञान व वाणिज्य महाविदयालय, पंचवटी नाशिक
आमचा बाप अन आम्ही – डॉ. नरेंद्र जाधव
स्वकमाईचा आत्मविश्वास आणि त्या आत्मविश्वासातून अहंकार दूर ठेवून जेंव्हा एखादा माणूस व्यक्त होतो तेंव्हा त्याच्या आयुष्याला जी झळाळी असते. डॉ. नरेंद्र जाधव ह्यांचे आमचा बाप आन् आम्ही वाचताना ह्या भावनेचा प्रत्यय येतो. नाशिक जवळच्या गावातून एक पिढी मुंबईला येते, खिशात काहीही नाही, आणि केवळ पुढच्या दोन पिढ्यांनंतर ह्या परिवारातील सर्वजण कर्तृत्ववान होऊन नवनवीन आघाड्यांवर आपली छाप सोडतात. सहज लिहिलेले सर्वच विलक्षण वाचनीय झालेले आहे.
या पुस्तकात बोलीभाषेतील संवाद आहेत. ते एकूण प्रसंगांना व संदर्भांना जिवंतपणा देतात. यात आलेली प्रमाण भाषा, लेखक आज कसा आहे, याची प्रतिमा बांधण्यास मदत करते. वडिलांचे आत्मचरित्र किती संवादी स्वरूपात लिहिले आहे, ते मुळातून वाचण्यासारखे आहे. तेही प्रथमपुरुषी एकवचनी भूमिकेतून; जणू त्यांच्या कुडत्यात प्रवेशून, त्यातला कष्टाने कमावलेला घामट रुपया अनुभवून, त्यांच्या चालूनविरून पातळ झालेल्या वाहणांत पाय खुपसून अन् त्यातील जीर्णपणा अनुभवून! कष्टाला मागेपुढे न पाहणारा एक ‘बाप’ मुलगा पेपर विकून, युरोपीय माणसाच्या घरी पडेल ते काम करून रेल्वेमध्ये नोकरीला लागला. पुढे ‘पोर्ट ट्रस्ट’मध्ये गेला आणि तिथेही आपली कामासंबंधी चिकाटी त्याने सोडली नाही. ‘आपण जे करू ते ‘ए-वन’ असले पाहिजे’, असा जणू त्याचा धोशाच होता. तो शब्दांतून व्यक्तिचित्रणात लेखकाने जिवंत केला आहे.
लेखकाचे वडील निवृत्त झाल्यावर हाताशी काही उद्योग हवा म्हणून मुलांनी आपल्या आठवणी शब्दबद्ध करण्यास सांगितले. रूढार्थाने शालेय शिक्षण नसूनही निव्वळ अनुभवाच्या जोरावर अनेक विविध कामे केलेला हा माणूस. ब्रिटिश अधिकाऱ्याच्या मुलीचा मित्र, पेपर लाईन टाकून पोटपुरते मिळवणारा माणूस, पुढे रेल्वेमध्ये पडेल ती कामे केलेली. अनुभवाला कायम आंबेडकरी विचारशैलीची जोड. शिक्षणाच्या महत्त्वाची पूरेपूर जाणीव.
त्याच्या बाप लेखणीतून, बोलीभाषेतील अदमासे ५० एक पानांचा ऐवज लिहून झाला. घरच्यांनाही तो आवडला. त्याला पुस्तक रूपाने प्रसिध्दी द्यावी असही ठरलं. मग पुढच्या दोन पिढ्यांनी वडिलांच्या लेखनाच्या पुढे त्यांचे स्वतःचे विचार मांडले आणि हे पुस्तक आकाराला आलं. आज अनेक भाषांमध्ये ह्याचे अनुवाद झालेले आहेत, अनेक पुरस्कारांचे मानकरी हे पुस्तक ठरलेले आहे. शिक्षण आणि वाचन ह्यांची गरज ओळखून वडिलांनी मुलांच्या शिक्षणाकडे जातीने लक्ष दिलं. आंबेडकरी विचारांची शिदोरी त्यांनी आपल्या मुलांबरोबरही दिली.
नरेंद जाधव ह्यांचं वाचन अफाट असलच पाहिजे. कारण त्यांच्या लेखनशैली मधून तत्कालीन प्रतिष्ठित लेखक डोकावतात. मधेच एखादी कवितेची ओळ असो किंवा विनोदाची थोडीशी पेरणी, त्यांचं लिखाण सहजसुंदर झालेलं आहे.
हे पुस्तक सर्वांसाठी आहे. स्वतः निवांत राहून नशिबाला किंवा सरकारला बोल लावणाऱ्या सर्वांनाच एक शिकवण देणारं आहे. शिक्षणाचं महत्त्व अनेक पटींनी अधोरेखित करणारं हे तीन पिढ्यांचं चरित्र मार्गदर्शक आहे, प्रेरणादायी आहे. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार ह्या जबाबदारीची आणि उत्तरदायित्वाची जाणीव करुन देणारं आहे. आंबेडकरांच्या कार्याला त्यांच्या शिकवणुकीला सार्थ ठरवणारी ही सत्यकथा आहे. ह्याच्या अनेक आवृत्त्या निघण्याची गरज आहे आणि शालेय अभ्यासक्रमात ह्यातील उतारे समाविष्ट होण्याची देखील गरज आहे.
आदर्श बाप
पुस्तक परीक्षण - डॉ. साहेबराव गायकवाड (उप-प्राचार्य तथा विभागप्रमुख, हिंदी विभाग) डॉ.नरेंद्र जाधव द्वारा लिखित ‘आमचा बाप आन् आम्ही’ सन 1993 में ग्रंथाली प्रकाशन से...Read More
डॉ. साहेबराव गायकवाड
आदर्श बाप
पुस्तक परीक्षण – डॉ. साहेबराव गायकवाड (उप-प्राचार्य तथा विभागप्रमुख, हिंदी विभाग)
डॉ.नरेंद्र जाधव द्वारा लिखित ‘आमचा बाप आन् आम्ही’ सन 1993 में ग्रंथाली प्रकाशन से मराठी भाषा में प्रकाशित हुई उत्कृष्ट आत्मकथा विधा है। जो अत्यंत लोकप्रिय हुई। इस पुस्तक की पृष्ठ संख्या २८९ है। तत्पश्यात अंग्रेजी, फ्रेंच तथा स्पेनिश विदेशी भाषाओं में तथा गुजराती,तमिल,कन्नड,उर्दू और पंजाबी जैसे भारतीय भाषाओं में भी इसका अनुवाद प्रकाशित हुआ है। प्रस्तुत आत्मकथा में जाधव परिवार की संघर्ष गाथा है। बल्कि यह कहना अधिक उचित होगा कि जाधव परिवार की तीन पीढियों का इतिहास वर्णित है। सन् 1948 तक का इतिहास नरेंद्र जाधव के पिताजी दामोदर जाधव ने लिखा है, और उनके देहावसान के बाद लेखक नरेंद्र जाधव अपने स्वयं का संघर्षमय जीवन प्रवास का रेखांकन किया है। परंतु सही आलोचनात्मक या समीक्षात्मक दृष्टिकोण से देखा जाये तो इस आत्मकथा का नायक लेखक नरेंद्र जाधव न होकर उनके पिता दामोदर जाधव है और नायिका लेखक की माँ सोनूबाई जाधव है। इन लोगों ने जो भोगा, जो सहा है वह नरेंद्र जाधव या उनके भाइयों ने नहीं। इस आत्मकथा में नरेंद्र जाधव के पिताजी दामोदर जाधव,माँ सोनूबाई जाधव तथा स्वयं नरेंद्र जाधव का आत्मकथन प्रमुख है। दामोदर जाधव ने अपने जीवन के प्रारंभिक 10 साल अपने गांव ओझर में बिताये और बाकी जिंदगी मुंबई के वडाला इलाके में। दामू का चचेरा भाई माधव गाँव की ऊँची जाति की स्त्री के साथ अनैतिक सबंध रखने कारण उसे बुरी तरह पीटा गया। माधव मुंबई चला गया। कुछ हप्तों बाद समाचार मिला कि माधव मुंबई में मुश्किलों में है। उसकी सहायता के लिए माँ राहीबाई अपने बेटे दामू व बेटी नाजुका को साथ लिए बगैर टिकट मुंबई गये। तब दामू बारह साल का था। मुंबई में रहने की समस्या थी। रात सोने के लिए जगह नहीं मिलती। दामू प्लेटफार्म पर सोता। माँ ने घास छाटने और क्यारियाँ साफ करने का काम खोज लिया था। दामू कभी-कभी नाजुका को अकेले छोड़कर स्टेशन पर भिखारियों के साथ खेलने चला जाता। धीरे-धीरे उम्र के साथ दामू का संघर्ष आरंभ हुआ। नरेंद्र जाधव की माँ सोनाबाई बहादूर पति की बहादूर पत्नी थी। उसका विद्रोही व्यक्तित्त्व इस आत्मकथा में झलकता है। सोनाबाई के बयान से यह स्पष्ट होता है कि उसपर डॉ. बाबासाहेब आंबेडकरजी के विचारों का प्रभाव था। वह निरक्षर थी परंतु समझदार थी। वह देहाती थी। वास्तव में लेखक डॉ. नरेंद्र जाधव ने अपनी माँ सोनाबाई के बहुआयामी व्यक्तित्व का परिचय करा दिया है। एक सामान्य स्त्री की तरह जीवन यापन करनेवाली स्त्री सोनू ने कभी गर्व नहीं किया कि उसका बेटा कलेक्टर है। हाँ वह जरूर कहती थी कि वह कलेक्टर की माँ है। लेखक डॉ.नरेंद्र जाधव बचपन से ही पढ़ाकू थे। अत्यंत प्रतिकूल स्थिति में पढ़ रहे थे। कभी-कभी लेखक चाली के बालकनी में लटके रहे बिजली के बल्ब के नीचे बैठकर पढ़ते रहते। वास्तव में जाति प्रथा केवल गांवों में ही नहीं है। शहरों में भी जाति -प्रथा का बीज बोया गया। इसका एहसास लेखक को बचपन मे कदम- कदम पर होता था। लेखक इतने उच्च पदों तक पहुँचे परंतू समाज से उन्हें जातिभेद,छुआछूत का कटू अनुभव प्राप्त हुआ। ‘अछूत’ होने के कारण लेखक की उपेक्षा होती रही। इस जाति व्यवस्था से संघर्ष करते हुए कठोर परिश्रम से एक दलित आज अपनी बौद्धिकता के आधार पर यश,सफलता प्राप्त कर सका। उसका संपूर्ण श्रेय डॉ. बाबासाहेब की प्रेरणा,विचारों को हम दे सकते। इस आत्मकथा का नायक दामोदर रुंजाजी जाधव डॉ.आंबेडकर जी के विचारों से प्रभावित हुए और डॉ. आंबेडकर के विचारों से प्रभावित होकर अपने जीवन को दिशा देने का काम किया। उनकी चौथी पीढ़ी अपूर्वा जाधव का कहना है कि, डॉ.बाबासाहेब के विचारों की मशाल हाथ में लिए वह भी अपने जीवन का मार्ग ढूँढेंगी। समाज द्वारा दी गई बैसाकियों को फेंककर स्वयं प्रकाशित हो जाओ। उचित दिशा को ढूँढों तो यश व सफलता आपकी होगी। ‘आम्ही आन् आमचा बाप’ आत्मकथा हमें यहीं संदेश देती है
