Share

Availability

available

Original Title

कोसला

Publish Date

1963-09-01

Published Year

1963

Publisher, Place

Total Pages

334

ISBN

978-8171854950

ISBN 10

8171854958

ISBN 13

978-8171854950

Format

Soft Bound

Country

India

Language

Marathi

Average Ratings

Readers Feedback

कोसला

पुस्तकाचे नाव : कोसला लेखक : भालचंद्र नेमाडे Book Reviewd by : शिंदे अश्विनी विजय Class : S.Y.B.C.S. College : GMD Arts, BW Commerce &...Read More

Dr.Subhash Ahire

Dr.Subhash Ahire

×
कोसला
Share

पुस्तकाचे नाव : कोसला
लेखक : भालचंद्र नेमाडे
Book Reviewd by : शिंदे अश्विनी विजय
Class : S.Y.B.C.S.
College : GMD Arts, BW Commerce & Science College, Sinnar Dist. Nashik

बऱ्याच दिवसांपासून मी कोसला वाचण्याच्या विचारात होते. माझ्या जन्माच्या 41 वर्ष आधी आलेली, ही कादंबरी मला समजेल का हाही प्रश्न मला होताच. कारण, बरेच वाचणारे लोक म्हणायचे की ही कादंबरी समजायला कठीण आहे, भाषा विचित्र आहे, तसेच कादंबरी अतिशय अप्रतिम आणि वाचनीय आहे. ही कादंबरी माझ्या परिसरात कुठेही उपलब्ध नव्हती, अशा वेळी आपलाच मराठी पुस्तक प्रेमी समूहातील डॉ.अतुल वचारकर या सदगृहस्थांनी ही कादंबरी मला पाठवली आणि मला भरपूर आनंद झाला. मी त्यांची खूप आभारी आहे. मग मी ही कादंबरी वाचेपर्यंत अगदी तसं वातावरण निर्माण व्हावं म्हणून गाणे ऐकणे, चित्रपट पाहणे, मोबाईलचा अतिवापर या सवयी काही दिवस पूर्णपणे टाळून, “मिशन कोसला” ठरवलं आणि कामाला लागले. एका नव्या कथाविश्वात सर्वस्वी रमण्यासाठी.
कोसला 1963 मध्ये आलेली ज्ञानपीठ प्राप्त आणि साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त, भालचंद्र नेमाडे यांनी लिहिलेली मराठी कादंबरी आहे. मी काही दिवसांपूर्वी कोसला वाचली नंतर कित्येक दिवस मी फक्त विचार करत राहिले. पांडुरंग सांगवीकर आणि माझा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मला फार सारखाच वाटला. कोसलाची तिरकस आणि लहान वाक्याची भाषा हेच कोसलाचे वैशिष्ट्य आहे .
माझ्या मते कसला ही कादंबरी नाही तर अख्खविश्व आहे. पांडुरंग सांगवीकरांच्या डोळ्यांनी पाहिलेलं जग आहे. ही कादंबरी निराशावादाचेही काही प्रमाणात समर्थन करणारी आहे. तरीही, ते वाचताना आपल्याला क्षणभरही कंटाळा येत नाही. पांडुरंग सांगवीकर हा सांगवीसारख्या खेड्यात राहणारा तरुण पुण्यात शिक्षणासाठी वस्तीगृहात राहतो आणि तिथे त्याला अनेक बरे वाईट अनुभव येतात. नंतर परत तो गावाकडे येतो आणि तिथेहि त्याला अनेक अनुभव येतात. ज्यातून तो कायम शिकत राहतो. त्या काळात अनेक जणांनी कोसला वाचून आत्महत्या केली आहे असं म्हटलं जातं. निराशावाद आणि आत्मशोधाचा खोल आणि गंभीर चिंतन हे कदाचित या मागचं कारण असू शकतं.
कोसलातील मनीच्या मृत्यूचे प्रकरण खूप प्रसिद्ध आहे. अभिनेते किशोर कदम यांनी त्या प्रकाराचे अभिवाचनही केलं. अत्यंत हृदय द्रावक प्रसंगाचे त्यांनी त्यात वर्णन केला आहे. जे लोक साहित्यातील तेच तेच पणाला कंटाळलेले होते कोसलाने पुन्हा त्यांना वाचनाकडे वळवले. खांडेकर, खानोलकर, गडकरी यांच्या पेक्षा वेगळा शैलीचा आशय आणि तंत्राच्या बाबतीत वैविध्य आणि नवेपना असणार, वाचकांची अभिरुची संपन्न करणारं साहित्य कोसलाच्या माध्यमातून वाचकांना मिळालं.
नेमाडेंच्या कविताही वाचल्यात मी देखणी आणि मेलडी काव्यसंग्रहातल्या! नेमाडे यांच्या विचारसरणीचे प्रतिबिंब त्यात उमटल्याचा आपल्याला जाणवतो. एका कवितेत, “हे लांब लांब रस्ते जुने होत नाहीत किंवा संपतही नाहीत असे ते म्हणतात”. यातून त्यांच्या समृद्ध भावविश्वासाच आपल्याला दर्शन घडतं. त्याचवेळी दुसऱ्या कवितेत ते “दिवस दिवस नसतात, रात्री रात्री नसतात, असं म्हणतात सगळे आवाज बिनखुनांचे” अस ते लिहितात. गुढ अगम्य कवितेतही त्यांचे योगदान हे त्यानिमित्ताने जाणवतं. त्यांच्या कविता या बऱ्याच दीर्घ कविता आहेत.
बऱ्याच जणांना कोसला आवडत नाही किंवा ते पूर्ण कोसला वाचू शकत नाही असं ते म्हणतात परंतु कोसला समजण्याची तयारी असेल तर कोसला समजू शकते. तितकीही अवघड नाही. दोन-तीन वेळेस लक्ष देऊन वाचली तर काहीच न कळणाऱ्यांना सुद्धा लगेच ही कादंबरी कळते. या कादंबरीत उगाच लांबलाच, पोकळ वर्णने नाहीत. कथा एका समांतर दिशेने योग्य गतीने पुढे वाटचाल करते.
आपल्याला ही कादंबरी वाचून झाल्यानंतरही त्यातल्या बाबींवर विचार करायला मजबूर करते. नकळतच आपण त्या गोष्टींवर स्वतःची मते तयार करू लागतो! एक वेगळ्या भावनिक प्रवासावर जाण्यासाठी, मनसोक्त भटकंती करण्यासाठी कोसला वाचायलाच हवी.

कोसला

साक्षी प्रमोद मालपुरे, तिसरे वर्ष, (बीटेक), संगणक अभियांत्रिकी, के. के. वाघ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग एज्युकेशन अँड रिसर्च, नाशिक 'कोसला' ही भालचंद्र नेमाडे यांची १९६३ साली...Read More

साक्षी प्रमोद मालपुरे, तिसरे वर्ष, (बीटेक), संगणक अभियांत्रिकी, के. के. वाघ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग एज्युकेशन अँड रिसर्च, नाशिक

साक्षी प्रमोद मालपुरे, तिसरे वर्ष, (बीटेक), संगणक अभियांत्रिकी, के. के. वाघ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग एज्युकेशन अँड रिसर्च, नाशिक

×
कोसला
Share

साक्षी प्रमोद मालपुरे, तिसरे वर्ष, (बीटेक), संगणक अभियांत्रिकी, के. के. वाघ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग एज्युकेशन अँड रिसर्च, नाशिक

‘कोसला’ ही भालचंद्र नेमाडे यांची १९६३ साली प्रकाशित झालेली कादंबरी एका पिढीच्या मानसिकतेचं आणि अंतर्मनाच्या संघर्षाचं उत्कृष्ट चित्रण करते. पांडुरंग सांगवीकर या साध्या, ग्रामीण भागात वाढलेल्या तरुणाच्या आयुष्याभोवती फिरणारी ही कथा केवळ त्याच्या वैयक्तिक अनुभवांची गोष्ट नाही, तर ती समाज आणि जीवन याबाबतच्या व्यापक प्रश्नांवर प्रकाश टाकते.
पांडुरंग शिक्षणासाठी पुण्यासारख्या शहरात जातो. सुरुवातीला शहराचे चकचकीत जीवन त्याला वेगळं वाटतं, पण जसजसं त्याला कृत्रिमतेचा अनुभव येतो, तस तो वैतागतो. गावातील साधं, मोकळं आयुष्य आणि शहरातील स्वार्थी जीवन यामधील तफावत त्याला सतत जाणवत राहते. शिक्षणव्यवस्थेतील त्रुटी, कुटुंबीयांची अपेक्षा, आणि नात्यांमधील गोंधळ यामुळे तो स्वतःच्या अस्तित्वाचा अर्थ शोधत राहतो. मला हे पुस्तक वाचताना असं वाटलं की, पांडुरंग सांगवीकर या नायकाच्या जीवनातील प्रसंगामधून मीही स्वतःला शोधत होते.
‘कोसला’च्या मुखपृष्ठावरील वटवृक्ष हे कथेचं सार दर्शवतं. वटवृक्ष स्थैर्य आणि मुळांशी जोडले- पणाचं प्रतीक आहे. मात्र, पांडुरंगाच्या आयुष्यात हा वटवृक्ष नुसत्या स्मृतींचं प्रतीक बनतो.
मुखपृष्ठावरील रिकामं वातावरण जणू त्याच्या आयुष्यातील एकटेपणा आणि मोकळी दर्शवतं.
कादंबरीतील काही प्रसंग मला विशेष भावले. उदा. पांडुरंगचा मित्र गप्पा मारताना म्हणतो, “आपण शिकतोय काय ? आणि शिकून काय होणार? शिक्षणाच्या अर्थावर प्रश्नचिन्ह उभं करणारा हा प्रसंग आजच्या काळातही तितकाच लागू होतो.
तसंच, पांडुरंगच्या कुटुंबीयांचं त्याच्यावरील अपेक्षांचं ओझंही मला खूप भावलं. त्याच्या वडिलांना त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा असतात, पण त्याला त्या पूर्ण करता येत नाहीत. यामुळे त्याला सतत अस्वस्थ वाटतं. त्याचा मित्र श्रीरंगसारखा साधा व्यक्तीही त्याला जीवनाचं तत्वज्ञान शिकवतो. वटवृक्षाखाली बसून श्रीरंग म्हणतो,” आपण आपल्या मूळांपासून दूर जात आहोत”. हा संवाद अत्यंत विचारप्रवर्तक आहे.
कादंबरीचं कथानक साधं असूनही तिची शैली खूप वेगळी आहे. पारंपरिक कथा किंवा नायकाच्या यशाची गाथा याऐवजी हा एक अंतर्मुख प्रवास आहे. पांडुरंगच्या विचारांमधून लेखकाने जीवनातील गोंधळ आणि असमाधान मांडलं आहे.
कांदबरीचा शेवटही मला खूप विचार करायला लावणारा वाटला. पांडुरगाच्या प्रश्नांची उत्तरे त्याला मिळत नाहीत, पण त्याला शांततेचा मार्ग सापडतो. कधी कधी आयुष्याचे उत्तर शोधण्यातच खरी मजा असते, हे मला या शेवटातून शिकायला मिळालं. ‘कोसला’ फक्त एका तरुणाची गोष्ट नसून, ती समाजाच्या विसंगतीचे आणि अस्तित्वाच्या प्रश्नांचं प्रतीक आहे.
मुखपृष्ठावरील वटवृक्षापासून ते साध्या-संवादांपर्यंत, प्रत्येक गोष्ट वाचकाला अंतर्मुख करते. प्रत्येकाने ही कांदबरी वाचायलाच हवी, कारण ती आयुष्याकडे एक नवा दृष्टिकोन देते.

Submit Your Review