मी वाचलेल्या व मला सर्वाधिक प्रिय असणाऱ्या पुस्तकाचे नाव अग्निपंख आहे हे पुस्तक भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी लिहिलेले आहे. अग्निपंख ही एपीजे अब्दुल कलाम यांची आत्मकथा आहे. या पुस्तकात अब्दुल कलाम यांचा बालपणापासून तर राष्ट्रपती पदापर्यंतचा संपूर्ण प्रवास रचण्यात आला आहे. डॉक्टर अब्दुल कलाम भारताच्या यशस्वी शास्त्रज्ञा पैकी एक आहेत. त्यांनी इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रो मध्ये महत्त्वाची योगदान दिले. भारताची सैन्य क्षमता वाढवण्यासाठी त्यांनी अणुचाचणी घेतली म्हणूनच त्यांना मिसाईल मॅन म्हणूनही संबोधले जाते ,2002 सालापर्यंत ते अत्यंत लोकप्रिय झाले होते म्हणूनच त्यांना भारताच्या राष्ट्रपती पदासाठी निवडण्यास आले .अग्निपंख या पुस्तकात अब्दुल कलाम यांनी त्यांच्या बालपणाचे जीवन ते राष्ट्रपतीपदासाठी करण्यात आलेली निवड पर्यंतचा संपूर्ण जीवन परिचय रेखाटला आहेत. या चरित्राची सुरुवात एका लहान मुलापासून होते जो नंतर इस्त्रोच्या प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि भारताचे राष्ट्रपती बनतो . मला या पुस्तकातील सुरुवातीचे धडे जास्तीच आवडले कारण या धड्यांमध्ये भारताच्या 1930 ते 1950 या कालखंडातील परिस्थितीचे चित्रण करण्यात आले आहे .अब्दुल कलाम यांचा जन्म धार्मिक नगरी रामेश्वरम मधील एका मुस्लिम कुटुंबात झाला. भारताच्या विभाजनापूर्वी असलेली देशातील धार्मिक एकता आणि एकात्मतेचे वर्णन अब्दुल कलाम यांनी पहिल्या दोन धड्यांमध्ये केले आहे अब्दुल कलाम यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे की लहान असताना त्यांचे स्वप्न पायलेट बनण्याचे होते. परंतु पायलेट बनण्यासाठी असलेली इंटरव्यू परीक्षा ते अनुत्तीर्ण झाले ,परंतु निराश न होता त्यांनी दुसऱ्या क्षेत्रात आपले करिअर सुरू केले पुस्तकात सांगितल्याप्रमाणे कलाम यांनी सुरुवातीला विमान बनवण्याचे क्षेत्रात कार्य केले नंतर ते भारतीय अंतरिक्ष संस्था इस्त्रोकडे वळले.अग्निपंख पुस्तकात अब्दुल कलाम यांनी यशस्वीपणे पूर्ण केलेल्या सॅटेलाईट आणि मिसाईल कार्यक्रमांची माहिती देण्यात आली आहे. अग्नी ,आकाश, पृथ्वी, त्रिशूल, नाग या घरोघरी पोहोचलेल्या नावांच्या क्षेपणास्त्रांची जडणघडणे ही फार सुंदर पणे वाचकांना सांगितलेली आहे. जागतिक शस्त्र स्पर्धेच्या राजकारणाची आणि विज्ञानाची ती कहाणी आहे .तसेच स्वयंपूर्ण होण्यासाठी आपल्या देशाने केलेल्या संघर्षाचे ते मनोहारी खंडकाव्य ही आहे. अग्निपंख पुस्तकात फक्त स्वतःचेच चरित्र न मांडता अब्दुल कलाम यांनी अनेक कवितांच्या देखील समावेश केला आहे , हे पुस्तक तरुण तसेच प्रत्येक वयातील लोकांसाठी प्रेरणाचे अखंड स्त्रोत आहेत, म्हणून प्रत्येकाने एकदा तरी अग्निपंख पुस्तक वाचायला हवे या पुस्तकातील मला आवडलेल्या काही ओळी पुढील प्रमाणे आहे . “ जिंकण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे जिंकण्याची गरज भासू न देणे .आपण जेव्हा संभ्रमरहित असतो , ताणरहित मनाने प्रश्नांना सामोरे जातो , तेव्हा आपल्यामधील सर्वोत्तम देऊ शकतो ”
मी वाचलेल्या व मला सर्वाधिक प्रिय असणाऱ्या पुस्तकाचे नाव अग्निपंख आहे हे पुस्तक भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी लिहिलेले आहे. अग्निपंख ही एपीजे अब्दुल कलाम यांची आत्मकथा आहे. या पुस्तकात अब्दुल कलाम यांचा बालपणापासून तर राष्ट्रपती पदापर्यंतचा संपूर्ण प्रवास रचण्यात आला आहे. डॉक्टर अब्दुल कलाम भारताच्या यशस्वी शास्त्रज्ञा पैकी एक आहेत. त्यांनी इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रो मध्ये महत्त्वाची योगदान दिले. भारताची सैन्य क्षमता वाढवण्यासाठी त्यांनी अणुचाचणी घेतली म्हणूनच त्यांना मिसाईल मॅन म्हणूनही संबोधले जाते ,2002 सालापर्यंत ते अत्यंत लोकप्रिय झाले होते म्हणूनच त्यांना भारताच्या राष्ट्रपती पदासाठी निवडण्यास आले .अग्निपंख या पुस्तकात अब्दुल कलाम यांनी त्यांच्या बालपणाचे जीवन ते राष्ट्रपतीपदासाठी करण्यात आलेली निवड पर्यंतचा संपूर्ण जीवन परिचय रेखाटला आहेत. या चरित्राची सुरुवात एका लहान मुलापासून होते जो नंतर इस्त्रोच्या प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि भारताचे राष्ट्रपती बनतो . मला या पुस्तकातील सुरुवातीचे धडे जास्तीच आवडले कारण या धड्यांमध्ये भारताच्या 1930 ते 1950 या कालखंडातील परिस्थितीचे चित्रण करण्यात आले आहे .अब्दुल कलाम यांचा जन्म धार्मिक नगरी रामेश्वरम मधील एका मुस्लिम कुटुंबात झाला. भारताच्या विभाजनापूर्वी असलेली देशातील धार्मिक एकता आणि एकात्मतेचे वर्णन अब्दुल कलाम यांनी पहिल्या दोन धड्यांमध्ये केले आहे अब्दुल कलाम यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे की लहान असताना त्यांचे स्वप्न पायलेट बनण्याचे होते. परंतु पायलेट बनण्यासाठी असलेली इंटरव्यू परीक्षा ते अनुत्तीर्ण झाले ,परंतु निराश न होता त्यांनी दुसऱ्या क्षेत्रात आपले करिअर सुरू केले पुस्तकात सांगितल्याप्रमाणे कलाम यांनी सुरुवातीला विमान बनवण्याचे क्षेत्रात कार्य केले नंतर ते भारतीय अंतरिक्ष संस्था इस्त्रोकडे वळले.अग्निपंख पुस्तकात अब्दुल कलाम यांनी यशस्वीपणे पूर्ण केलेल्या सॅटेलाईट आणि मिसाईल कार्यक्रमांची माहिती देण्यात आली आहे. अग्नी ,आकाश, पृथ्वी, त्रिशूल, नाग या घरोघरी पोहोचलेल्या नावांच्या क्षेपणास्त्रांची जडणघडणे ही फार सुंदर पणे वाचकांना सांगितलेली आहे. जागतिक शस्त्र स्पर्धेच्या राजकारणाची आणि विज्ञानाची ती कहाणी आहे .तसेच स्वयंपूर्ण होण्यासाठी आपल्या देशाने केलेल्या संघर्षाचे ते मनोहारी खंडकाव्य ही आहे. अग्निपंख पुस्तकात फक्त स्वतःचेच चरित्र न मांडता अब्दुल कलाम यांनी अनेक कवितांच्या देखील समावेश केला आहे , हे पुस्तक तरुण तसेच प्रत्येक वयातील लोकांसाठी प्रेरणाचे अखंड स्त्रोत आहेत, म्हणून प्रत्येकाने एकदा तरी अग्निपंख पुस्तक वाचायला हवे या पुस्तकातील मला आवडलेल्या काही ओळी पुढील प्रमाणे आहे . “ जिंकण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे जिंकण्याची गरज भासू न देणे .आपण जेव्हा संभ्रमरहित असतो , ताणरहित मनाने प्रश्नांना सामोरे जातो , तेव्हा आपल्यामधील सर्वोत्तम देऊ शकतो ”
Original Title
अग्निपंख
Publish Date
1931-01-01
Published Year
1931
Publisher, Place
Total Pages
179
ISBN
९७८८१७४३३४९०७१
Format
paper back
Country
india
Language
Marathi
Readers Feedback
अग्निपंख
कुणाल रामेश्वर इंगळे, लेट जी एन सपकाळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, अंजनेरी, नाशिक हे पुस्तक डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी त्यांच्या जीवन प्रवासावर लिहले आहे. यात...Read More
कुणाल रामेश्वर इंगळे, लेट जी एन सपकाळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, अंजनेरी, नाशिक
अग्निपंख
कुणाल रामेश्वर इंगळे, लेट जी एन सपकाळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, अंजनेरी, नाशिक
हे पुस्तक डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी त्यांच्या जीवन प्रवासावर लिहले आहे. यात त्यांनी त्यांच्या जन्मापासून ते यशस्वी होण्यापर्यत त्यांना किती संघर्ष करावे लागले. हे त्यांनी जन्म घेतल्यापासुनच पैशाच्या कमतरतेमुळेअनेक समस्या सोसल्या. त्यांनी रामेश्वरमच्या रेल्वेस्टेशनवर वृतपत्रे वाटली, त्यांच्या वडिलाचे नाव जैनूलबदीन होते. ते एका बोटेचे मालक होते. ते त्यांची बोट ही मासेमारीसाठी मासेकयांना देत असत व त्यावर त्यांचे घर चालयचे. त्यांची परिस्थिती ही फार गरिबीची होती. त्यांचे वडील व त्यांचे दोघे भाऊ हे एका छोट्याश्या घरात त्यांच्या पाच पाच मुलांना घेऊन राहत होते. त्यांच्या जीवनावर त्यांच्या वडिलांचा फार मोठा प्रभाव होता. डॉ. अब्दुल कलाम ज्यावेळी बाहेर शिकण्यासाठी जात होते, त्यावेळी त्याचे वडील म्हणाले होते की अब्दुल तुला मोठे व्हायचे असेल तर गाव सोडून शिक्षणासाठी बाहेर जायलाच हवे. सीगल पक्षी घरटे सोडून एकटे दूरवर उडत जातात आणि नवे प्रदेश शोधतात तसेच या मातीसाठी आणि इथल्या स्मृतीचा मोह सोडून तुझ्या इच्छा आकांक्षा जिथे पूर्ण होतील तिथे तुला जायला हवे. आम्ही तुला आमच्या प्रेमाने बांधून ठेवणार नाही. आमच्या गरजा तुझा रस्ता अडवणार नाहीत. त्यानंतर त्यांनी तिरुचिरापल्ली येथून भौतिकशास्त्र पदवी प्राप्त केली. नंतर ते अभियांत्रिकी शिक्षणासाठी मद्रासला गेले. पदवी मिळाल्यानंतर त्यांनी संरक्षण, संशोधन आणि विकास संस्थामध्ये जाण्याचा पर्याय निवडला, नंतर त्यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि हळूहळू प्रगती करत ते प्रकल्प संचालक झाले. त्यांच्याच कारकीर्दीमध्ये भारत निर्मित पहिले उपग्रह रोहिणी हे SIV-III ने पृथ्वीच्या जवळच्या कक्षेत यशस्वीपणे सोडले.
अब्दुल कलाम यांनी अग्नी क्षेपणास्त्र बनवले. पृथ्वी हे रणनीतिक क्षेपणास्त्र बनवले. १९९२ ते १९९९ ते भारताच्या संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार होते आणि नंतर त्यांनी कॅबिनेट मंत्री पदासह सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम केले. ते १९९८ च्या पोखरण अणुचाचण्याच्या मालिकेतील मुख्य समन्वयकापैकी एक होते. त्यांनी अणुशक्ती मजबूत केली. ते मुस्लीम असूनपण हिंदुराष्ट्रवादी होते. त्यांना उमेदवारी प्रस्तावित केली. त्यांनी माजी क्रांतिकारी नेत्या सहगत यांचा पराभव करून कलाम यांनी इलेक्ट्रोरोल कॉलेजचे मत सहज जिंकले. जुलै २००२ मध्ये त्यांनी भारताचे ११ वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. त्यांना गरिबीची जाण होती. आपल्या पैशाने जर कोणाचे भले होत असेल तर ते करावे. या प्रवृत्तीचे ते असल्यामुळे त्यांनी निवृत्त झाल्यावर त्याचे सर्व हे दान करून स्वतः पेक्षा इतरांचा विचार केला.
त्याच्या मते आजच्या तरुणाने स्वतःचा पराभव करणाऱ्या मार्गापासून दुर रहावे. भौतिक सुखांसाठी संपत्तीसाठी काम करणे हे ध्येय असू नये. कलाम सांगतात की मी कित्येक श्रीमंत सताधारी सुशिक्षित माणसांना आंतरिक शांतीसाठी तडफताना पाहिले आहे आणि स्वतः जवळ काहीही नसताना सुखी आनंदी माणसेही पाहिली आहेत. आपल्या मध्ये असलेली आंतरिक शक्ती कौशल्ये आपले आयुष्य घडवण्यात गुंतवून टाकावी. विशेषत कल्पना शक्तीचा विकास आपण करू शकलो तर यश मिळेल आणि आपण माणूस बनणे शक्य होईल. जीवन हा एक कठीण संग्राम आहे. आपल्या स्वतःची जाणीव ठेवल्या शिवाय तो जिंकणे शक्य नाही. दुसऱ्यांनी सांगितलेल्या मार्गावरून ण जाण्यासाठी धैर्य लागते. आपल्या अंतर्मनाचा कौल घेत कार्य करत राहिले. तर जीवनाचा खेळ रंगवता येतो जिंकता येतो.
अब्दुल कलामाच्या वडिलांनी जे सीगल पक्षबद्दल सांगितले होते. तसे त्यांनी केले सुद्धा ते विमानात बसणारे रामेश्वरम मधले पहिले व्यक्ती होते. जर का मानवाच्या मनात जिद्द असेल तर तो कोठूनही कोणत्याही परिस्थितीतून विश्वविजेता होऊ शकतो. फक्त जिद्द मनी व स्वतावर विश्वास या दोन्ही गोष्टी असायला हव्यात तरच तो जग जिंकू शकतो व स्वताला सुद्धा जिंकू शकतो.
