Original Title
पानिपत
Subject & College
Series
Publish Date
2017-01-01
Published Year
2017
Publisher, Place
Total Pages
275
ISBN 13
9788174347657
Format
Paperback
Country
India
Language
Marathi
Average Ratings
Readers Feedback
मराठी मातीच्या, मराठी मनाच्या सर्वोच्च सद्गुणांच्या शौर्याची गाथा!
विश्वास पाटील यांची “पानिपत” ही पहिली मूळ मराठीत लिहिले गेलेली ऐतिहासिक साहित्यकृती आहे. या कादंबरीत १४ जानेवारी १७६१ रोजी झालेल्या पानिपतच्या तिसऱ्या लढाईचा आढावा घेण्यात...Read More
Mr. Chhagan Mavali
मराठी मातीच्या, मराठी मनाच्या सर्वोच्च सद्गुणांच्या शौर्याची गाथा!
विश्वास पाटील यांची “पानिपत” ही पहिली मूळ मराठीत लिहिले गेलेली ऐतिहासिक साहित्यकृती आहे. या कादंबरीत १४ जानेवारी १७६१ रोजी झालेल्या पानिपतच्या तिसऱ्या लढाईचा आढावा घेण्यात आला आहे. यात मराठा सैन्य आणि अफगाण सम्राट अहमद शाह अब्दालीच्या सैन्यादरम्यान झालेल्या ऐतिहासिक लढाईचे वर्णन करण्यात आले आहे. तसेच या पुस्तकात सुरुवातीला नजीब-उद-दौला, पश्तून आणि सिंधिया यांच्या सैन्यामध्ये झालेल्या वंशीय युद्धाचे अनुसरण करण्यात आले आहे. काळाशीही चार हात करीन, प्रलयाशी झुंजता झगडता तुटेन, फुटेन पण मागे हटणार नाही. अशा निश्चयाने पानिपतचा वीर सदाशिवरावभाऊ रणात गाडून उभा राहिला. वैऱ्याचा विजयाचा आनंद विरून जावा अशी पराक्रमाची शर्थ करून ३५ हजार कटिल मराठी स्वारांनी पानिपतावर देह ठेवला.
नजीब-उद-दौलाच्या धोक्याचा सामना करण्यासाठी तसेच उत्तरेकडील प्रदेश काबीज करण्यासाठी ते मोठ्या मराठा सैन्याच्या फौजेसहित पुढे जातात. अखेरीस मराठा पायदळ आणि घोडदळ पानिपतच्या मुघल किल्ल्यामध्ये प्रवेश करण्यात यशस्वी होतात, परंतु येथे त्यांना शिया मुस्लिम आणि अफगाण सैनिकांच्या मोठ्या सैन्याने चोहोबाजूने वेढले. या सैन्यांनी मराठ्यांचा अन्न-धान्याचे मुख्य पुरवठा श्रोत अडवून त्यांची कुचंबणा केली. परिणामी निराशा आणि कुपोषणासारख्या परिस्थितीचा सामना त्यांना करावा लागतो.
या पुस्तकात जनकोजी शिंदे, नानासाहेब पेशवे या सारख्या इतर अनेक मराठा देशबांधवांच्या शूर प्रयत्ननांचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच लेखकाने सदाशिवराव भाऊ या मराठा नेत्यांपैकी एक असलेल्या सामान्य नकारात्मक पात्राचाही वर्णनात्मक चित्रण करून, त्याच्या युद्धकौशल्याची उत्तमरित्या प्रशंसा केली आहे. युद्धभूमीवर छाप पाडणाऱ्या त्यांच्या असंख्य अनुभवांचा या पुस्तकात उल्लेख करण्यात आला आहे.
या कादंबरीत लेखकाने काही प्रमुख मुद्द्यांवरही प्रकाश टाकला आहे, जसे की रक्तपात, नैराश्य, रोग, उजाडता, हौतात्म्य, विश्वासघात, मृत्यू, भय, विजय, पराभव, द्वेष, अज्ञान आणि सूड. या कादंबरीत लेखकाने भाषेची भूमिका आणि प्रादेशिक एकात्मतेचं महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर काही मुद्द्यांमध्ये धर्माची भूमिका, उत्तर आणि दक्षिण प्रांत यांच्यातील वर्चस्वाची लढाई, प्रादेशिक राजकारणाचा हानिकारक प्रभाव, यासारख्या प्रसंगांचा आवर्जून उल्लेख केला आहे.
पुस्तकाच्या शेवटी, लेखकाने त्यांच्या संशोधनाच्या प्रयत्नांची माहिती दिली आहे, ज्यामध्ये त्यांनी पानिपतला अनेकदा प्रत्यक्ष भेटी देऊन ऐतिहासिक घटना, प्रासंगिक क्षणचित्रे प्रत्यक्ष रेखाटण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. “पानिपत” हि मूळ मराठी भाषेत लिहलेली ऐतिहासिक साहित्य कृती होय. प्रकाशनांनंतर तिचे इंग्रजि आणि हिंदी भाषेसहित
ही एक ऐतिहासिक साहित्यकृती असल्यामुळे मी या कादंबरीची निवड केली आहे. कारण ऐतिहासिक घटनांचा तंत्रज्ञानाच्या या २१ व्या शतकामध्ये काही प्रमाणात विसर पडताना दिसत आहे.
मराठ्यांचा जरी या युद्धात पराभव झाला असला तरी, मराठी सैनिकांचे हुतात्म्य आणि शौर्य वाखाणण्या जोगे आहे. मराठी अस्मितेला जपणारी अशी किर्ती आणि शौर्य त्यांनी साकारलेली दिसून येते.
