'मी एक स्वप्न पाहिलं'

By डॉ. राजेंद्र कमलाबाई भारुड (IAS)

Share

Availability

upcoming

Original Title

'मी एक स्वप्न पाहिलं'

Publish Date

2013-09-01

Published Year

2013

Total Pages

162

Format

Paperback

Country

INDIA

Language

MARATHI

Average Ratings

Readers Feedback

प्रस्तुत पुस्तक हे भिल्ल समाजाचे पाहिले आयएएस अधिकारी राजेंद्र भारुड यांची कहाणी आहे .ज्या समाजात शिक्षण म्हणजे काय माहीत नाही त्या समजतील मुलगा आपल्या ह्या प्रतिकुल परिस्थितीशी मात करत कसा एक अधिकारी होतो आणि प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन एमबीबीएस ही पद्वी मिळवून आयएएस होण्याचं त्यांच स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी घतलेली अथांग मेहनत प्रस्तुत पुस्तकात सांगितली आहे.

मी एक स्वप्न पाहिले ह्या प्रस्तुत पुस्तकात राजेंद्र भारूड यांनी आपला आयएएस होण्याचा प्रेरणादीयी जीवनप्रवास सांगितला आहे. प्रतिकूल परिस्थीतीवर मात करत त्यांनी आपले स्वप्न पूर्ण...Read More

Kunal Raja Kate

Kunal Raja Kate

×
प्रस्तुत पुस्तक हे भिल्ल समाजाचे पाहिले आयएएस अधिकारी राजेंद्र भारुड यांची कहाणी आहे .ज्या समाजात शिक्षण म्हणजे काय माहीत नाही त्या समजतील मुलगा आपल्या ह्या प्रतिकुल परिस्थितीशी मात करत कसा एक अधिकारी होतो आणि प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन एमबीबीएस ही पद्वी मिळवून आयएएस होण्याचं त्यांच स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी घतलेली अथांग मेहनत प्रस्तुत पुस्तकात सांगितली आहे.
Share

मी एक स्वप्न पाहिले ह्या प्रस्तुत पुस्तकात राजेंद्र भारूड यांनी आपला आयएएस होण्याचा प्रेरणादीयी जीवनप्रवास सांगितला आहे. प्रतिकूल परिस्थीतीवर मात करत त्यांनी आपले स्वप्न पूर्ण करत गरीबी ही पैसयाची असावी पण विचारांची नाही हे सांगितले आहे.
राजेंद्र भारुड हे आदिवासी उपयोजना क्षेत्रातील साक्री तालुक्यातील सामोडे येथील आदिवासी कुटूंबात जन्माला आले. जन्म होण्याच्या आदीच त्यांचे वडील वारले, त्यामुळे भारूड यांची आणि सोबत दोन बहिन भावडांची जिम्मेदारी त्यांच्या आई आणि मावशीने उचलली. भारूड यांच्या आई ने मोहाची दारू विकून आपला घरखर्च संभाळला. त्यांच्या पूर्ण समाजात भारुड हे शाळेत जाणारा पहिला मुलगा होता. ते सांगतात की शाळेचे कपडे व पाठी घेण्यायाठी त्यांच्याकडे पैसे नसायचे त्या काळात त्यांच्या शिक्षकांनी त्यांचा सर्व शालेय खर्च उचलला.भारूड हे शाळेत असल्यापासून हुशार होते. पाचवीत असताना नवोदय परिक्षेत ते उतीर्ण झाले व 5 वी ते बारावी शिक्षण नवोदय मधे घेतले. आभ्यासात हुशार असल्यामुळे त्यांना स्कॉलरशीप मिळत गेल्या व सिएटी ही परीक्षा उत्तीर्ण होऊंन त्यांनी एमबीबीइस चे शिक्षण पूर्ण केले.
एमबीबीइस करत असताना त्यांना upsc ची गोड़ी लागली व आपन पण या समाजाला काही देण लागतो हे ठरवून त्यांनी upsc चा अभ्यास पदवी शिक्षणासोबत सुरू केला व पहिल्याच प्रयत्नात ते यशस्वी झाले . आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्यांनी संघर्ष केला. हा प्रवास सुरु असताना त्यांना खुप चांगले वाईट अनुभव आले, त्यातील प्रत्येक अनुभव वाचकाला एक संदेश देतो.
सुसंस्कृतता, गुणवत्ता, यश ही काही फक्त मोठ्या मोठ्या शहरातल्या इंग्रजी शाळांची आणि सुखसोयींनी युक्तत असलेल्या श्रीमंतांच्या मुलांची नसते. तर ज्या हृदयात जिद्द, कष्ट, चिकाटी, धैर्य, आत्मविश्वास, स्वतःवर व निसर्ग शक्तीवर अपार ‘श्रद्धा’ यांची ज्योत पेटते तिथे सर्व स्वप्वांनी पूर्ती होते. तुम्ही कोणाच्या पोटी जन्माला येता ; तुमचे आई वडील गरीब आहेत की श्रीमंत,तुम्ही खेड्यात आहात की शहरात, मराठी मीडियमला आहात की सेमी इंग्रजी ला आहात, याचा आणि तुमच्या यश- अपयशाचा काहीही संबंध नसतो. तुमचे विचार, स्वभाव व बेभान होऊन मेहनत घेण्याची वृत्ती यावरच तुमचे भवितव्य अवलंबून असते…….. याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे राजेंद्र भारूड यांचा जीवनप्रवास आहे.

‘मी एक स्वप्न पाहिलं’

Book Review: Khare Soundarya Tatyasaheb, Final Year B Pharmacy Divine College of Pharmacy Satana 'मी एक स्वप्न पाहिल' हे पुस्तक ऐतिहासिक किंवा सांस्कृतिक नसून तर...Read More

Khare Soundarya Tatyasaheb

Khare Soundarya Tatyasaheb

×
‘मी एक स्वप्न पाहिलं’
Share

Book Review: Khare Soundarya Tatyasaheb, Final Year B Pharmacy Divine College of Pharmacy Satana
‘मी एक स्वप्न पाहिल’ हे पुस्तक ऐतिहासिक किंवा सांस्कृतिक नसून तर हे पुस्तक स्वअनुभवातून लिहिलेले आहे. येथे लेखक आपल्या खडतर परिस्थितीतून कसे पुढे आले, याचे सविस्तर वर्णन केलेले आहे.
‘मी एक स्वप्न पाहिल!’ हे सदर पुस्तक निवडण्यामागचे कारण हेच की. लेखक यांच्या आत्मकथनपर व अतिशय शून्य अशा आयुष्यातून् व आदिवासी कटुंबातून कशे पुढे आले, व तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाची परिक्षा अतिशय खडतर परिस्थितितून पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाले, याचे वर्णन दिलेले आहे लेखकांविषयी मला वैयाक्तक खूप आदर आहे. कारण एका आदिवासी समाजाचा मुलगा कुठलेही शैक्षणिक पार्श्वभूमी नसतांना स्वकर्तृत्वाने अधिकारी होतो. हे माझ्यासाठी प्रेरणादायी आहे.
सदर लेखक हे अतिशय गरिब कुटुंबातून पुढे आलेले आहे त्यांनी ‘मी एक स्वप्न पाहिल!’ या पुस्तकातून आपल्या जीवनाचा खडतर प्रवास नमूद केला आहे. प्रामाणिकना व कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड न बाळगता आणि विशेष म्हणजे अतिशय प्रतिकूल परिस्थितिवर मात करून उत्तुंग भरारी घेतो लेखकांचा शालेय व महाविद्यालयीन जीवन व केंद्रिय लोकसेवा आयोगाची परिक्षा यशस्वी होण्यापर्यंतचा प्रवासु खरतर एखाद्या चित्रपटासारखाच आहे.
डॉ. राजेंद्र भारुड हे आईच्या पोटातच असताना त्यांचे पितृछत्र हरपले धुळे जिल्हयातील सामोडे गावच्या आदिवासी एका अत्यंत गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या घरान कर्ता पुरुष कोणीही नाही. फक्त दोन स्त्रिया त्यांची आई कमलाबाई, त्याची मावशी (मोठमाय), एक भाऊ दीपक, एक बहीण (द्रोपदी) लेखकाच्या बालपणाविषयी सांगायचे म्हणजे, लेखकांच्या वडिलाचे निधन हे लेखक जेव्हा त्यांच्या आईच्या गर्भान होते तेव्हा मिरगी या आजारामुळे झाले. तेव्हा आठवड्याभरानच लेखकाची मावशी त्यांचा बहीण व माऊ यांना आपल्या घरी घेऊन गेली पण त्यांची आई मात्र त्या भकास झोपडीत एकटीच शोक करन बसलेली असायची. याच परिस्थितितून त्यांची आई निघत नाही, तोवर लेखकांच्या वडिलाकडच्या लोकानी आईवर आणखी एक जबरदस्त आग्रह केला, तो म्हणजेच गर्भपाताचा! पण पुन्हा मावशी खबीरपणे आईच्या बाजूने उभी राहिली तिने आईचा गर्भपात होऊ देणार नाही, तेव्हा कळते की. लेखकाच्या आई मनाने श्रीमंत होत्या, सलाम त्या माऊलीला किती ठामपणे लेखकाच्या मावशीने त्या असवेदनशील लोकांना सांगितले लेखकाच्या जन्मानंतर काही काळातच लेखकाच्या आईने दारु काढण्याच काम सुरु केले.
दारु काढण्याच काम हा आदिवासीयांचा पारंपारिक व्यवसाय होय. जेव्हा लेखक जरा मोठे झाले, तेव्हा त्याच्या आईवरच्या जबाबदाऱ्याही वाढल्या, जेव्हा त्याच्या आई दारु काढण्याच काम करुन ती विकत असे, तेव्हा तिथे येणारे ग्राहक जास्त असल्यामुळे त्या सकाळीच लवकर उठून दारु पाडायला जात असे, व नंतर लेखकांची तयारी करून त्यांना शाळेत पाठवत असे एका संध्याकाळची गोष्ट लेखक सागतात की, ते जेव्हा अभ्यास करत असे, तेव्हा तेथे येणारे ग्राहक त्यांना नको ते काम सांगत व त्याना आक्षेपार्ह बोलत. परंतु त्यांची आई त्यास विरोध करायच्या त्यावेळेस तिथे येणारे ग्राहक टिंगलटवाळी करायचे की, हा तुझा मुलगा डॉक्टर, कलेक्टर होणार आहे का? त्यावेळेस त्यांच्या आईना खूप वाईट वाटत असे, लेखकाच्या आई त्या लोकाना ठामपणे सांगायच्या की, माझाही मुलगा एक दिवस डॉक्टर, कलेक्टर होईल! माझ्यामते तरी अश्या लोकांमुळेच जे की आपला अपमान करतात व आपल्याला मागे खेचतात त्यांच्यामुळे जीवनात काहीतरी करण्याचे बळ भेटते, जेवढी टिका तेवढे यश!

Submit Your Review