मृत्युंजय
By सावंत शिवाजी
Availability
available
Original Title
मृत्युंजय
Subject & College
Publish Date
1967-01-01
Published Year
1967
Publisher, Place
Total Pages
810
ISBN 13
9788184984111
Format
Paperback
Country
India
Language
Marathi
Readers Feedback
महाभारतातील ‘कर्ण’ या व्यक्तिरेखेवर आधारित
बदादेशुभमविजय [विद्यार्थी] क्रांतिवीरवसंतरावनारायणरावनाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कलाववाणिज्य महाविद्यालय, दिंडोरी . महाभारतातील सामान्यत: खलनायक म्हणून परिचित असलेल्या महावीर कर्णाच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाचा मागोवा ही कादंबरी घेते. बऱ्याच...Read More
बदादेशुभमविजय
महाभारतातील ‘कर्ण’ या व्यक्तिरेखेवर आधारित
बदादेशुभमविजय [विद्यार्थी]
क्रांतिवीरवसंतरावनारायणरावनाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कलाववाणिज्य महाविद्यालय, दिंडोरी .
महाभारतातील सामान्यत: खलनायक म्हणून परिचित असलेल्या महावीर कर्णाच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाचा मागोवा ही कादंबरी घेते. बऱ्याच कथा सर्वांनाच परिचित आहेत. नायक असूनही बहुतांशी सगळीकडे तो एक खलनायक भासतो. पण शिवाजी सावंत लिखित “मृत्युंजय ” कादंबरी हाती घेतली आणि जणू कर्णाचे जीवन नव्याने माझ्या मनात उलगडले गेले. कर्णासारखा दानशूर या भूमीवर कधीच नव्हता हे वर रेखाटलेल्या चित्रावरून सिद्ध झालेच. अशा अनेक परिचित अपरिचित प्रसंगांशी आपली अगदी जवळून ओळख करून देते ही कादंबरी.… मराठी साहित्यास शिवाजी सावंत यांसकडून मिळालेली आणखी एक देणगी.
कुरुक्षेत्रावर सुरू असलेल्या कौरव-पांडवांच्या युद्धाचा तो सतरावा दिवस. वेळ जवळ जवळ सूर्यास्ताची. कौरव आणि पांडव या दोन्ही पक्षांतील योद्धे सारे स्तब्ध उभे. समोर जमिनीवर रक्तात न्हालेला महावीर कर्ण मृत्युच्या शेवटच्या घटका मोजत. इथे कर्ण मृत्युच्या दारात आणि आसपास सभोवताली पडला होता मृत सैनिकांचा रक्तबंबाळ झालेल्या प्रेतांचा खच.… इथे कर्णाचा शेवट पहात उभ्या योध्यांची मुग्ध शांतता आणि चहूकडे फक्त आकांत… त्या सैनिकांच्या स्वकीयांचा. कर्ण आपल्या मावळत्या पित्याला शेवटचा निरोप देत असतानाच त्याचे लक्ष वेधले गेले … एका पित्याच्या मदतीसाठी मारलेल्या हाकेकडे … एका दीर्घ आकांताकडे … एका करुणामयी विनवणीकडे.
” अरे या कुरुक्षेत्रावर कोणी आहे का मला मदत करणारा. युद्धात मुलगा मारला गेला माझा. त्याच्या अंतिम कार्यासाठीही द्रव्य नाही माझ्याकडे. कोणी आहे का ? ”
ही मदतीसाठी मारलेली हाक दानवीर कर्णाने ऐकली आणि त्याने त्या याचकास जवळ बोलावले. त्याला इच्छा विचारली तेव्हा खरेतर त्या याचकास देण्यासाठी त्या क्षणी कर्णाकडे स्वतःकडे काहीच द्रव्य नव्हते. पण तरीही कर्णाने आपला दानधर्म न त्यागता आपल्या मुलास जवळ बोलावले आणि त्या जखमी स्थितीतही तो म्हणाला, ” पुत्रा , आयुष्यभर जे मजपाशी होते ते ते सर्व जेव्हा जेव्हा ज्याने मागितले मी त्यास दिले. पण आज हा याचक असाच रिकाम्या हाताने माझ्यापाशी येऊन परत जाणार हे कदापि शक्य नाही. तू एक काम कर . तो पडलेला जमिनीवरचा दगड घे आणि माझ्या तोंडात असलेले हे २ सोन्याचे दात पाड आणि या दुःखी पित्यास दे . त्याच्या मुलाचा अंतिम संस्कार करण्यासाठी ते त्याच्या कामा येतील. ”
आपल्या यमसदनी निघालेल्या पित्यासोबत असे निघृण कृत्य करण्यास न धजावणाऱ्या पुत्रास पाहून शेवटी कर्णाने त्यास तशी आज्ञा केली. तेव्हा रडत रडतच दुःखी अंतःकरणाने त्या पुत्राने आपल्या पित्याची ती आज्ञा मानली आणि दगडाच्या घावांनी कर्णाचे तोंड रक्तबंबाळ केले. त्या रक्तवर्णात मोतीमाळेतून अचानक निखळून गळावे तसे २ चमचम करणारे सुवर्णदातही लालसर झाले होते. असे दान कसे दयावे ? हा विचार करत कर्णाने त्यांस आपल्या डोळ्यांपाशी नेले . त्या नयनकमलांतून वाहणाऱ्या अश्रूजलात न्हाऊन पवित्र झालेले रद रेशीम कापडाने पुसून घेत हे शेवटचे दान त्या याचकास सुपूर्द करत कर्णाने कायमचे डोळे मिटले.
कादंबरीची वैशिष्ट्ये
या कादंबरीचे एक पाहताक्षणीच नजरेस येणारे खास वैशिष्ट्य म्हणजे ही इतर कादंबऱ्याप्रमाणे एकमुखी गोष्ट नाही आहे. तर महाभारतातील विविध पात्रांच्या मुखांतून पुस्तकाच्या प्रत्येक पानावर झरझर उतरणारा कर्णाचा जीवनपट आहे . कुंतीला मिळालेले असामान्य वरदान , त्यातूनच कर्णाचा झालेला असामान्य जन्म ,जगाच्या भीतीने कुंतीने घेतलेला कठोर निर्णय , गुरू द्रोण आणि पांडवांकडून कर्णाचा झालेला अपमान, त्यातूनच दुर्योधानासोबत जन्मास आलेले मित्रप्रेम , द्रौपदी वस्त्रहरण , कुरुक्षेत्रातील युद्ध या सर्वच गोष्टी वरवर प्रत्येकास माहित आहेतच . पण या प्रत्येक गोष्टींत काही बारीक बारीक अशा कितीतरी गोष्टी दडलेल्या आहेत ज्या पुस्तक हाती घेण्याआधी आपल्या विचारांतही नसतात किंवा वर्षानुवर्षे आपण या प्रश्नांची उत्तरे शोधत आलो आहोत पण जी अजूनही अनुत्तरीत आहेत. उदाहरणार्थ कुंतीला ही पुत्रप्राप्ती नक्की कशी झाली ?सारथ्याच्या घरी कर्णाचे बालपण कसे असेल? शोण म्हणून असलेला राधेचा मुलगा या कर्णासोबत कसा वागत होता? कर्णाची पत्नी वृषाली नक्की कशी होती…त्यांच्यातील प्रीतीचे क्षण कधी फुलले होते कि इंद्राला कवच कुंडल दान केल्यानंतर निस्तेज झालेल्या कर्णाप्रमाणे त्याचे प्रेमजीवनही कोमेजलेले होते? सूर्याचा पूत्र असूनही त्याने धर्माच्या विरोधात अधर्मी दुर्योधनास नेहमी साथ का दिली… केवळ मैत्रीसाठी? द्रौपदी वस्त्रहरणात त्याने द्रौपदीचे रक्षण नक्की का केले नाही ? अभिमन्यूला धर्माविरुद्ध जात मारणाऱ्यात कर्ण का सामील झाला ? खरेच तो अधर्मी होता ? जर असे होते तर मग श्रीकृष्ण विरुद्ध पक्षात असतानाही त्याने या सूतपूत्राचा अंतिम संस्कार करण्यात रस का दाखवला? जसजसे आपण एकेक पान वाचत जावू तसतसा हा हळूहळू उलगडत जाणारा खुलासा आपल्याला जागीच खिळवून ठेवतो.
मृत्युंजय
ग्रंथ परीक्षण : जाधव प्रीतेश, महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित, लोकनेते व्यंकटराव हिरे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पंचवटी नाशिक. नमस्कार मित्रांनो आज आपण मृत्युंजय या...Read More
Jadhav pritesh deepak
मृत्युंजय
ग्रंथ परीक्षण : जाधव प्रीतेश, महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित, लोकनेते व्यंकटराव हिरे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पंचवटी नाशिक.
नमस्कार मित्रांनो आज आपण मृत्युंजय या कादंबरी बद्दल जाणून घेणार अहित ठी कादंबरी शिवाजी सावंत यांनी महाभारतानीन महारशी कर्ण यांवर लिहीली असून मेहता पब्लिकेशनने ही कादंबरी प्रकाशित केली. अहि. कादंबरीची पृष्ठ संख्या ६१८ असून किंमत ४५०/- आहे. या कांदबरीचे लेखक शिवाजी सावंत यांचा जन्म १५ ऑगस्ट १९४० साली कोल्हापूर जिल्हया- तील आजरा गावात आला.
कादंबरीच्या पृष्ठावर दिग्विजयी, दानवीर, अशरण सूर्यपुत्त कर्णाचे चित्त असून स्वर्गीय दीनानाथ दलाल यांनी उत्तम रित्या साकारलेले अहि. शिवाजी सावंत यांच्या प्रदीर्घ संशोधन चिंतन व मनन यांतून रससंपन्न अशा मृत्युजय था वास्तववादी कादंबरीचा जन्म झाला. व शिवाजी सावंत यांचे महाराष्ट्रभर नाव झाले. १९ey साली भारतीय ज्ञानपीठ या संस्थेतर्फ मूर्तिदेवी पुरस्कार जाहिर झाला.
जगातील सर्वात मोठे महाकाव्य म्हणून महाभारताकडे बघितले जाते. यांत असंख्य व्यक्ति- रेखा रेखाटल्या आहेत. या महाभारतात प्रेम,
त्याग, लोभ, सत्ता, हिंसा व्यभिचार, राजकारण, दुःख करुणा अशा भावनांनी भरलेले हे महाकाव्य आहे, या सर्व व्यक्तिरेखा मध्ये उदुन दिसते.. ली व्यक्ती म्हणजे कुंतीपुत्त्र, राधेय, सूर्यपुत्त, सारथीपुत्त, अंगराज अशा विविध उपमांनी परिचित महारशी कर्ण.
महाभारतातील सामान्यतः खलनायक म्हणून प्रसिद्ध असनाच्या महारथी कर्णाच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाचा मागोवा ही कादंबरी घेते. नायक असूनही महारथी कर्ण बहुतांश सर्वत्त ती खलनायक दिसुन येतो. परंतू शिवाजी सावंत यांच्या शब्दातून लिखित ही कादंबरी उलगडल्यावर महारशी कर्णाचे
जीवन नव्याने आपल्या मनात उलगडायला लागते. था कादंबरीचे कर्ण या नावाला नवीन ओळख दिली आहे. था कादंबरीतील प्रत्येक पानावर महाकाव्यातील व्यक्तिरेखाच्या मुखांतून वदलेले शब्द कर्णाचे जीवनपर दर्शवत अहित. ज्यांमध्ये प्रत्येक व्यक्तिरेखांच्या लोभसवाणा अनुभव येलो.
लहानपणापासूनच क्षुल्लक वागणूक मिळालेल्या कर्णाचे गुण अत्यंत प्रभावीपणे मांडले अहित. सतत दुर्लक्षित असल्यामुळे स्वतः ला सिध्द करण्याची क्षमता आपणांस नवीन ऊर्जा देते. लाकद, बुध्दिमत्ता व सत्ता असुनही चुकीच्या निर्णयांचा काय परिणाम असू शकतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कर्णाचे जीवन. कुंतीला मिळालेले असामान्य वरदान त्यातूनच कणीचा झालेला असामान्य जन्म जगाच्या भितीने कुंतीने घेतलेला निर्णय, गुरू होणाचार्यानी व पांडवांनी केलेला अपमान त्यातूनच दुर्योधना सोबत जन्माला आलेले
असामान्य मित्तत्प्रेम. द्ववपदी वस्त्रहरण व कुरुक्षेत्रातील झालेले युध्द यांसर्वच गोष्टी सर्वाना माहीती अहित. यांतील कितीतरी लहान लहान गोष्टी आजही आपणांस माहीती नाहीत. ती अनुत्तरीत आहेत.
अशा काही लहान गोष्टी सांगायचे म्हणाल तर कुंतीला ही पुत्तताप्ती कशी झाली, सारथ्याच्या घरी कर्णाचे बालपण कसे होते. शीण म्हणून असलेला राधेचा पुत्र कर्णासोबत कसा वागला. व कर्णाची पत्नी वृषाली नक्की कशी होती. त्याच्यातील प्रेमाचे संबंध कसे होते. कवचकुंडले देवेंद्वाला दान केल्यानंतर कर्णाचे शौर्य कमी झाले का. सूर्याचा पुत्त्र असूनही धर्माच्या विरोधात कर्णाने अधर्मी दुर्योधनास नेहमी साथ का दिली. केवळ मैतीसाठी. हवपदीचे रक्षण कर्णाने का केले नाही, अभिमन्युला मारतांना त्यात का सामील होता, खरेच कर्ण अधर्मी होता का ?
तर मग श्रीकृष्ण विरोधी पक्षांत असतानाही त्यांनी कर्णाच्या अंतिम संस्कारात रस का दाखवला ? जसे जसे आपण पान उलगडत जाक तसे- तसे कर्णाचा जीवनप्तवास आपल्याला समजायला लागतो. व जागीच खिळवून ठेवतो.
शिवाजी सावंत यांनी लिहिलेली ही कादंबरी वाचकांची चाहती ठरली आहे. मराठी साहित्यात मैलाचा दगड उरलेली ही कादंबरी प्रत्येकाने वाचावी अशी आहे. डोळयांपुढे दिसणारी गोष्ट ही खरी नसते. त्यामागे अनेक घटना, अनेक योजना या कळत नकळत चालू असतात. मूळ गोष्ट सर्वाना माहीत असूनही हे पुस्तक आपल्याला रोमांच तयार करते. पुढे काय होईल याची हुरहुर आपल्याला पुस्तक खाली ठेवू देत नाही. दानवीर महारशी कर्णाची ही कहाणी आपल्याही आयुष्यातील अनेक रिकाम्या जागा भरून काढते यांत शंकाच नाही
