मृत्युंजय
By शिवाजी सावंत, सावंत शिवाजी
शिवाजी सावंत यांच्या मृत्युंजय या कादंबरीचे मुखपृष्ठ पुस्तकातील आशयाला साजेशे शोभेल असे आहे. या मुखपृष्ठावर सूर्यदेवतेचा तेजस्वी प्रतिमेचा उपयोग करण्यात आला आहे. त्याचा संदर्भ कर्णाच्या जीवनाशी अगदी योग्य आहे. कर्णाला सूर्यपुत्र म्हणून ओळखले जाते आणि त्याचा संघर्ष सूर्याच्या अखंड तेजाप्रमाणे ज्वलनशील वाटतो. मुखपृष्ठाच्या मध्यभागी कर्ण रथावरून आपल्या धनुष्याचे लक्ष साधताना दाखवला आहे. यामध्ये त्याचा पराक्रम, धैर्य आणि परिस्थितीला सामोरे जाण्याची ताकद त्याचे मिश्रण आहे. पिवळसर आणि सोनेरी रंगछटांचा वापर सूर्याची उष्णता, तेज आणि कर्णाच्या उगवत्या भविष्याचे प्रतीक म्हणून केला आहे. शिवाजी सावंत यांचे मृत्युंजय या कादंबरीचे मुखपृष्ठ कादंबरीच्या कथानकात म्हणजेच हे पुस्तक वाचण्यापूर्वीच आपल्याला प्रेरणा देते. त्याचबरोबर हे मुखपृष्ठ पाहून कर्णाच्या संघर्षमय जीवनाची झलक आपल्याला देते.
शिवाजी सावंत यांचे मृत्युंजय हे कादंबरी महाभारताच्या एका महत्त्वाच्या पात्राची म्हणजे कर्णाची कथा आहे. यामध्ये कर्ण हा एक अशा प्रकारचा नायक आहे, जो कधीही आपल्या आयुष्यात न्याय मिळू शकला नाही. तरीही आपल्या कर्तव्याशी आणि सन्मानाशी प्रामाणिक राहिला.
हि कादंबरी कर्णाच्या संपूर्ण आयुष्याचा प्रवास सांगते. त्याच्या जन्मापासून ते त्याच्या मृत्यूपर्यंत कर्णाचे दुःख त्याची स्वतःची ओळख शोधण्याची लढाई आणि समाजाने त्याच्यावर लादलेल्या अपमानांना सहन करतानाही तो आपले निष्ठा कशी टिकवतो, हेही कादंबरी आपल्याला सांगते. ही कादंबरी वेगवेगळ्या पात्राच्या नजरेतून सांगितली गेली आहे. जसे की कर्ण स्वतः त्याच्या दृष्टिकोनातून बोलतो. त्याची आई कुंती तिच्या भावना व्यक्त करते. दुर्योधन त्याचा मित्र म्हणून त्याच्याबद्दल सांगतो आणि श्रीकृष्णाचे विचारही या कादंबरीत मांडलेले आहे. त्यामुळे कथा अधिक जिवंत आणि प्रभावी वाटते.
शिवाजी सामंत यांची भाषा अत्यंत सोपी सरळ आणि भावनेने भारलेली आहे. त्याचे शब्द थेट मनाला भिडतात. त्यांनी कर्णाच्या भावना वेदना आणि संघर्ष इतक्या प्रभावी पद्धतीने मांडले आहेत की वाचणाऱ्याला ते स्वतः अनुभवल्यासारखे वाटतात. कर्णाचा संघर्ष त्याला समाजाने ‘सुतपुत्र’ म्हणून नाकारले. पण तरीही त्यांनी नेहमीच स्वतःच्या कर्तुत्वावर उभे राहून आपली ओळख निर्माण केली. कर्णाच्या आयुष्याकडे पाहून आपण हा संदेश घेऊ शकतो की नशीब कितीही प्रतिकूल असले तरीही आपण नशिबासोबत झुंज खेळावी आणि आपण नशिबा समोर हार मानू नये.
ही कादंबरी वाचताना कर्णाचे दुःख आणि त्याचे स्वाभिमान मनाला भिडतो. मृत्यू जो आपल्याला शिकवते की आपण परिस्थिती कितीही वाईट असली तरीही आपले आदर्श आणि कर्तव्य सोडू नये. कर्णाची ही कथा आपल्या जीवनातील समस्यांना सकारात्मकपणे सामोरे कसे जायचे हे शिकवते.
हि कादंबरी फक्त एक कथा नाही. तर जीवनातील सत्य आणि मूल्यांचा आरसा आहे .कर्णाच्या आयुष्याच्या माध्यमातून ती आपल्याला आपल्या संघर्षावर मात करण्याची प्रेरणा देते. प्रत्येक मराठी माणसाने ही कादंबरी आपल्या आयुष्यात एकदा तरी नक्की वाचले पाहिजे.
शिवाजी सावंत यांच्या मृत्युंजय या कादंबरीचे मुखपृष्ठ पुस्तकातील आशयाला साजेशे शोभेल असे आहे. या मुखपृष्ठावर सूर्यदेवतेचा तेजस्वी प्रतिमेचा उपयोग करण्यात आला आहे. त्याचा संदर्भ कर्णाच्या जीवनाशी अगदी योग्य आहे. कर्णाला सूर्यपुत्र म्हणून ओळखले जाते आणि त्याचा संघर्ष सूर्याच्या अखंड तेजाप्रमाणे ज्वलनशील वाटतो. मुखपृष्ठाच्या मध्यभागी कर्ण रथावरून आपल्या धनुष्याचे लक्ष साधताना दाखवला आहे. यामध्ये त्याचा पराक्रम, धैर्य आणि परिस्थितीला सामोरे जाण्याची ताकद त्याचे मिश्रण आहे. पिवळसर आणि सोनेरी रंगछटांचा वापर सूर्याची उष्णता, तेज आणि कर्णाच्या उगवत्या भविष्याचे प्रतीक म्हणून केला आहे. शिवाजी सावंत यांचे मृत्युंजय या कादंबरीचे मुखपृष्ठ कादंबरीच्या कथानकात म्हणजेच हे पुस्तक वाचण्यापूर्वीच आपल्याला प्रेरणा देते. त्याचबरोबर हे मुखपृष्ठ पाहून कर्णाच्या संघर्षमय जीवनाची झलक आपल्याला देते.
शिवाजी सावंत यांचे मृत्युंजय हे कादंबरी महाभारताच्या एका महत्त्वाच्या पात्राची म्हणजे कर्णाची कथा आहे. यामध्ये कर्ण हा एक अशा प्रकारचा नायक आहे, जो कधीही आपल्या आयुष्यात न्याय मिळू शकला नाही. तरीही आपल्या कर्तव्याशी आणि सन्मानाशी प्रामाणिक राहिला.
हि कादंबरी कर्णाच्या संपूर्ण आयुष्याचा प्रवास सांगते. त्याच्या जन्मापासून ते त्याच्या मृत्यूपर्यंत कर्णाचे दुःख त्याची स्वतःची ओळख शोधण्याची लढाई आणि समाजाने त्याच्यावर लादलेल्या अपमानांना सहन करतानाही तो आपले निष्ठा कशी टिकवतो, हेही कादंबरी आपल्याला सांगते. ही कादंबरी वेगवेगळ्या पात्राच्या नजरेतून सांगितली गेली आहे. जसे की कर्ण स्वतः त्याच्या दृष्टिकोनातून बोलतो. त्याची आई कुंती तिच्या भावना व्यक्त करते. दुर्योधन त्याचा मित्र म्हणून त्याच्याबद्दल सांगतो आणि श्रीकृष्णाचे विचारही या कादंबरीत मांडलेले आहे. त्यामुळे कथा अधिक जिवंत आणि प्रभावी वाटते.
शिवाजी सामंत यांची भाषा अत्यंत सोपी सरळ आणि भावनेने भारलेली आहे. त्याचे शब्द थेट मनाला भिडतात. त्यांनी कर्णाच्या भावना वेदना आणि संघर्ष इतक्या प्रभावी पद्धतीने मांडले आहेत की वाचणाऱ्याला ते स्वतः अनुभवल्यासारखे वाटतात. कर्णाचा संघर्ष त्याला समाजाने ‘सुतपुत्र’ म्हणून नाकारले. पण तरीही त्यांनी नेहमीच स्वतःच्या कर्तुत्वावर उभे राहून आपली ओळख निर्माण केली. कर्णाच्या आयुष्याकडे पाहून आपण हा संदेश घेऊ शकतो की नशीब कितीही प्रतिकूल असले तरीही आपण नशिबासोबत झुंज खेळावी आणि आपण नशिबा समोर हार मानू नये.
ही कादंबरी वाचताना कर्णाचे दुःख आणि त्याचे स्वाभिमान मनाला भिडतो. मृत्यू जो आपल्याला शिकवते की आपण परिस्थिती कितीही वाईट असली तरीही आपले आदर्श आणि कर्तव्य सोडू नये. कर्णाची ही कथा आपल्या जीवनातील समस्यांना सकारात्मकपणे सामोरे कसे जायचे हे शिकवते.
हि कादंबरी फक्त एक कथा नाही. तर जीवनातील सत्य आणि मूल्यांचा आरसा आहे .कर्णाच्या आयुष्याच्या माध्यमातून ती आपल्याला आपल्या संघर्षावर मात करण्याची प्रेरणा देते. प्रत्येक मराठी माणसाने ही कादंबरी आपल्या आयुष्यात एकदा तरी नक्की वाचले पाहिजे.
Availability
available
Original Title
मृत्युंजय
Subject & College
Publish Date
2023-05-04
Published Year
2023
Publisher, Place
Total Pages
742
ISBN 13
9769357200455
Format
Hardbound
Country
India
Language
मराठी
Average Ratings
Readers Feedback
मृत्युंजय
Aishwarya Divate, B.Sc,Sinhgad College of Science,Pune महाभारतातील 'कर्ण' या व्यक्तिरेखेवर आधारित शिवाजी सावंत यांनी लिहिलेली कादंबरी २४ सप्टेंबर १९९५ रोजी या पुस्तकाला 'भारतीय ज्ञानपीठ' या...Read More
Aishwarya Divate
मृत्युंजय
Aishwarya Divate, B.Sc,Sinhgad College of Science,Pune
महाभारतातील ‘कर्ण’ या व्यक्तिरेखेवर आधारित शिवाजी सावंत यांनी लिहिलेली कादंबरी २४ सप्टेंबर १९९५ रोजी या पुस्तकाला ‘भारतीय ज्ञानपीठ’ या संस्थेतर्फे मुर्तीदेवी पुरस्कार जाहीर झाला .
महाभारतातील सामान्यतः सूतपुत्र म्हणून परिचित असलेल्या महावीर कर्णाच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाचा मागोवा ही कादंबरी घेते . तो सुर्यपुत्र असूनही कोणाला परिचित नव्हता. पण शिवाजी सावंत यांची मृत्युंजय कादंबरी हाती घेतले आणि जणू कर्णाचे जीवन नव्याने माझ्या मनात उलघडले गेले.कर्णासारखा दानशूर या भूमीवर कधीच नव्हता हे या रेखाटलेल्या कादंबरी तुन कळते.
कुरुक्षेत्रावर घडलेली महत्वाची घटना, कौरव – पांडवाच्या यूध्दाची सतरावा दिवस वेळ जवळ-जवळ संध्याकाळची सारि योध्दै स्तब्ध होते . सारं जगांवर काळोक मांझलेला होता. रक्ताळलेला कर्ण जमीनीवर आपले शेवटचे क्षण मोजत होता. त्यांच क्षणी एका वृद्धानी दिलेला हाक, कोण आहे का दानवीर या कुरुक्षेत्रावर मला मदती- साठी. ती हाक कर्णाच्या कानावर पडली व त्यांनी त्याला बोलावले व याचकास इच्छा विचारली. त्या क्षणी कर्णाकडे देण्यासाठी, काहीच नव्हते. ज्या कर्णानी आपल अभेद कवच कुंडल इंद्राला दिलेल होता असा दानवीर कर्ण अता कसा काय त्यांच्या संपूर्ण आयुष्याला काळीमा लावू दिला असता. हि गोष्ट अशक्य होती?. त्या सुर्यपुत्र कर्णानी आपल्या मुलाला जवळ बोलावलं व त्यांच्या तोंडातील सोनेरी दात काड अशी आज्ञा दिली. अश्या या घायाळ अवस्थेत सुध्दा दानशूर कर्णानी आपला कर्तव्यापासून लांब नाही गेला. व त्यांनी आपले सोनेरी दात दान केले व आपला प्राण त्यागला.
लेखकांनी उत्तम असे वर्णन केलेले आहे. कादंबरी च्या प्रत्येक पानावर कर्णाच्या वाट्याला आलेला संघर्ष. त्याचे बालपण. व त्याला मिळालेली वरदान व जमदग्नी पुत्र परशुरामाकडून प्राप्त केलेली शिक्षा, पांडव व समाजानी केलेला अपमान, द्रौपदी वस्त्रहरण, या सर्व शोष्टी आपल्याला माहितच आहेत. यातील अनेक दडलेल्या गोष्टी या कादंबरीतुन लेखकांनी व्यक्त केलेले आहेत. कर्णाच्या वाट्याला अनेक संघर्ष आले .प्रत्येक संघर्ष यातनादायी होता. तरीही त्यांनी आपला धर्म ,कर्तव्य याचा कवडीमोलही त्याग केला नाही. कर्णाचे जीवन हे मनाला हेलावणारी व यातनादायी होते. त्यांच्या जीवन संघर्षातुन आपल्याला खूप काही शिकायला भेटत .
कादंबरीत लेखकांनी प्रत्येक गोष्टीचा जरा जास्त बढ़ावा केलेला आहे. हे पुस्तक वाचताना मला असे वाटायचे की मीही कुरूक्षेत्रातील पात्र आहे. पुर्णपणे त्या प्रत्येक घटनेचा मी वाचनातून अनुभव घेतला आहे. मला असे वाटते ही कादंबरी युवकाच्या हातात दिली पाहिजे. कारण यात संकटाला कसे सामोरे जावून आपले अस्तित्व निर्माण केलेल्या रविपुत्र कर्णाचा वर्णन आहे .ही पुस्तक युवकांना मार्गदर्शन ठरेल .अशा या महावीर कर्णाचे जीवनपट वाचताना वाचकांचे मन तासन् तास गूंतवून ठेवते. ही कादंबरी आज अनेक भाषेतून उपलब्ध आहे.
मृत्युंजय
पुस्तक परीक्षण -शुभम शांताराम तांदळे,तृतीय वर्ष वाणिज्य, म.ए.सो.कला व वाणिज्य रात्र महाविद्यालय, कर्वेनगर, पुणे शिवाजी सावंत यांच्या मृत्युंजय या कादंबरीचे मुखपृष्ठ पुस्तकातील आशयाला साजेशे शोभेल...Read More
शुभम शांताराम तांदळे
मृत्युंजय
पुस्तक परीक्षण -शुभम शांताराम तांदळे,तृतीय वर्ष वाणिज्य, म.ए.सो.कला व वाणिज्य रात्र महाविद्यालय, कर्वेनगर, पुणे
शिवाजी सावंत यांच्या मृत्युंजय या कादंबरीचे मुखपृष्ठ पुस्तकातील आशयाला साजेशे शोभेल असे आहे. या मुखपृष्ठावर सूर्यदेवतेचा तेजस्वी प्रतिमेचा उपयोग करण्यात आला आहे. त्याचा संदर्भ कर्णाच्या जीवनाशी अगदी योग्य आहे. कर्णाला सूर्यपुत्र म्हणून ओळखले जाते आणि त्याचा संघर्ष सूर्याच्या अखंड तेजाप्रमाणे ज्वलनशील वाटतो. मुखपृष्ठाच्या मध्यभागी कर्ण रथावरून आपल्या धनुष्याचे लक्ष साधताना दाखवला आहे. यामध्ये त्याचा पराक्रम, धैर्य आणि परिस्थितीला सामोरे जाण्याची ताकद त्याचे मिश्रण आहे. पिवळसर आणि सोनेरी रंगछटांचा वापर सूर्याची उष्णता, तेज आणि कर्णाच्या उगवत्या भविष्याचे प्रतीक म्हणून केला आहे. शिवाजी सावंत यांचे मृत्युंजय या कादंबरीचे मुखपृष्ठ कादंबरीच्या कथानकात म्हणजेच हे पुस्तक वाचण्यापूर्वीच आपल्याला प्रेरणा देते. त्याचबरोबर हे मुखपृष्ठ पाहून कर्णाच्या संघर्षमय जीवनाची झलक आपल्याला देते.
शिवाजी सावंत यांचे मृत्युंजय हे कादंबरी महाभारताच्या एका महत्त्वाच्या पात्राची म्हणजे कर्णाची कथा आहे. यामध्ये कर्ण हा एक अशा प्रकारचा नायक आहे, जो कधीही आपल्या आयुष्यात न्याय मिळू शकला नाही. तरीही आपल्या कर्तव्याशी आणि सन्मानाशी प्रामाणिक राहिला.
हि कादंबरी कर्णाच्या संपूर्ण आयुष्याचा प्रवास सांगते. त्याच्या जन्मापासून ते त्याच्या मृत्यूपर्यंत कर्णाचे दुःख त्याची स्वतःची ओळख शोधण्याची लढाई आणि समाजाने त्याच्यावर लादलेल्या अपमानांना सहन करतानाही तो आपले निष्ठा कशी टिकवतो, हेही कादंबरी आपल्याला सांगते. ही कादंबरी वेगवेगळ्या पात्राच्या नजरेतून सांगितली गेली आहे. जसे की कर्ण स्वतः त्याच्या दृष्टिकोनातून बोलतो. त्याची आई कुंती तिच्या भावना व्यक्त करते. दुर्योधन त्याचा मित्र म्हणून त्याच्याबद्दल सांगतो आणि श्रीकृष्णाचे विचारही या कादंबरीत मांडलेले आहे. त्यामुळे कथा अधिक जिवंत आणि प्रभावी वाटते.
शिवाजी सामंत यांची भाषा अत्यंत सोपी सरळ आणि भावनेने भारलेली आहे. त्याचे शब्द थेट मनाला भिडतात. त्यांनी कर्णाच्या भावना वेदना आणि संघर्ष इतक्या प्रभावी पद्धतीने मांडले आहेत की वाचणाऱ्याला ते स्वतः अनुभवल्यासारखे वाटतात. कर्णाचा संघर्ष त्याला समाजाने ‘सुतपुत्र’ म्हणून नाकारले. पण तरीही त्यांनी नेहमीच स्वतःच्या कर्तुत्वावर उभे राहून आपली ओळख निर्माण केली. कर्णाच्या आयुष्याकडे पाहून आपण हा संदेश घेऊ शकतो की नशीब कितीही प्रतिकूल असले तरीही आपण नशिबासोबत झुंज खेळावी आणि आपण नशिबा समोर हार मानू नये.
ही कादंबरी वाचताना कर्णाचे दुःख आणि त्याचे स्वाभिमान मनाला भिडतो. मृत्यू जो आपल्याला शिकवते की आपण परिस्थिती कितीही वाईट असली तरीही आपले आदर्श आणि कर्तव्य सोडू नये. कर्णाची ही कथा आपल्या जीवनातील समस्यांना सकारात्मकपणे सामोरे कसे जायचे हे शिकवते.
हि कादंबरी फक्त एक कथा नाही. तर जीवनातील सत्य आणि मूल्यांचा आरसा आहे .कर्णाच्या आयुष्याच्या माध्यमातून ती आपल्याला आपल्या संघर्षावर मात करण्याची प्रेरणा देते. प्रत्येक मराठी माणसाने ही कादंबरी आपल्या आयुष्यात एकदा तरी नक्की वाचले पाहिजे.
