शिवनेत्र बहिर्जी (खंड १)

By प्रेम धांडे

Share

Availability

available

Original Title

शिवनेत्र बहिर्जी (खंड १)

Format

paperback

Country

india

Language

Marathi

Average Ratings

Readers Feedback

शिवनेत्र बहिर्जी (खंड १)

मला आवडलेले पुस्तक पुस्तकाचे नाव-शिवनेत्र बहिर्जी (खंड १) लेखकाचे नाव -प्रेम धांडे विद्यार्थ्याचे नाव - सेजल माणिक गाडे वर्ग-TYbsc इंद्रायणी विद्या मंदीर संस्थेचे, इंद्रायणी महाविदयालय,...Read More

सेजल माणिक गाडे

सेजल माणिक गाडे

×
शिवनेत्र बहिर्जी (खंड १)
Share

मला आवडलेले पुस्तक
पुस्तकाचे नाव-शिवनेत्र बहिर्जी (खंड १)
लेखकाचे नाव -प्रेम धांडे
विद्यार्थ्याचे नाव – सेजल माणिक गाडे
वर्ग-TYbsc

इंद्रायणी विद्या मंदीर संस्थेचे, इंद्रायणी महाविदयालय,
तळेगाव – दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे – 410507
मोबाईल नंबर-9322915233
ईमेल आयडी-sejalgade23072004@gmail.com

शिवनेत्र बहिर्जी (खंड एक)
स्वराज्याचे गुप्त हेर बहिर्जी नाईक यांच्या संपूर्ण कार्याचा वेध घेणारी पहिली कादंबरी.
‘शिवनेत्र बहिर्जी’ ही प्रेम धांडे यांनी लिहिलेली एक ऐतिहासिक कादंबरी आहे. जी मराठी वाङ्मयातील एक महत्त्वपूर्ण टप्पा मानली जाते. या कादंबरीत बहिर्जी नाईकांच्या अद्‌भूत व्यक्तिमत्त्वाची आणि त्यांच्या काळातील ऐतिहासिक घटनांची तपशीलवार कथा सांगितली गेली आहे.
कादंबरीत बहिर्जी नाईकांचे बालपण, त्यांचे शिवरायांच्या सेवेत प्रवेश, त्यांचे साहसी कारनामे, त्यांचे राजकीय कौशल्य आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंचे वर्णन केले आहे. त्यांच्या गुप्तहेर कार्याची, त्यांच्या युद्धनीतीची, आणि त्यांच्या राजकीय दृष्टीकोनाची तपशीलवार माहिती वाचकांना मिळते.
लेखकाने बहिर्जी नाईकांच्या जीवनातील अनेक महत्त्वपूर्ण घटनांचे वर्णन केले आहे, जसे की शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेची शपथ, आदिलशाहीच्या विरोधात झालेले युद्ध, पहिल्या युद्धात स्वराज्याचा विजय आणि इतर अनेक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना. या घटनांचे वर्णन करताना लेखकाने ऐतिहासिक तथ्यांचा वापर केला आहे.
या कादंबरीत बहिर्जी नाईकांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडले आहेत. ते एक निपुण गुप्तहेर होते, एक कुशल युद्ध नियोजक होते आणि एक राजकीय धुरंधर होते. परंतु त्याचबरोबर ते एक वात्सल्यवान पिता, एक आदर्श पती आणि एक निष्ठावान सेवक देखील होते. लेखकाने त्यांच्या सर्व गुणांचे वर्णन करून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अधिकच आकर्षक बनवले आहे.
या कादंबरीत अनेक साहसी घटना, रोमांचक युद्धे आणि राजकीय षड्यंत्रांचे वर्णन आहे, जे वाचकांना आकर्षित करतात.
या कादंबरीचे महत्त्व अनेक कारणांमुळे आहे.
पहिले तर, या कादंबरीत बहिर्जी नाईकांच्या अद्भूत व्यक्तिमत्त्वाचे ओळख करून दिली आहे. बहिर्जी नाईक हे शिवरायांच्या सेवेत एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावत होते. आणि त्यांच्या कार्यामुळे शिवरायांनी अनेक मोठ्या विजयी मोहिमा पार पाडल्या या कादंबरीमुळे बहिर्जी नाईकांचे योगदान अधिक चांगल्या प्रकारे समजते.
दुसरे म्हणजे, या कादंबरीत मराठी इतिहासातील एक महत्त्वपूर्ण काळाचे वर्णन केले आहे. त्यांची युद्धनीती आणि राजकीय कौशल्यामुळे मराठी साम्राज्य अत्यंत शक्तीशाली बनले होते. या कादंबरीमुळे मराठी इतिहासाबद्दल अधिक माहिती मिळते.
तिसरे म्हणजे,या कादंबरीत लेखकाने भाषेचा प्रभावी वापर केला आहे त्यांची लेखनशैली सोपी आणि समजण्यासारखी आहे, परंतु त्याचबरोबर आकर्षक आणि मनोरंजक देखील आहे.
इतिहासानं दडलेल्या बहिर्जी नाईकांच्या व्यक्तिमत्त्वाला, त्यांचे उल्लेख सहजपणे मिळत नसताना ही शोधून काढत, अविरत अभ्यास, अमोध लिखाण आणि विशाल कल्पनाशक्तीनं शब्द रूपात जिवंत करणारी, आणि वाचताना मराठी अभिमान आणि कौतुकाची सोनेरी छटा पसरवणारी कादंबरी.
शिवबांच्या खडतर वाटेवरले, पायघड जे जाहले;
एक जन्मी हजार रूपांचे, भाग्य त्यांना लाभले;
वैराग्याचा शोक न केला, लालसा ना किर्तीची;
रहस्य हेच जयांचे लौकिक, ऐसे ते शिवनेत्र बहिर्जी

पुस्तकाचे नाव-शिवनेत्र बहिर्जी
लेखकाचे नाव-प्रेम धांडे
प्रकाशक-नवनाथ जगताप (रुद्र एंटरप्रायजेस)
प्रकाशन वर्ष आणि आवृत्ती-सप्टेंबर २०२१ , प्रथम आवृत्ती

Submit Your Review