Original Title
श्यामची आई
Subject & College
Series
Publish Date
2015-01-01
Published Year
2015
Publisher, Place
Total Pages
240
Format
Paperback
Country
India
Language
Marathi
Readers Feedback
श्यामची आई : हृदयस्पर्शी मातृप्रेमाची कलाकृती
Katkar Supriya Rajendra (Student) SAMARTH SHIKSHANSHASTRA MAHAVIDYALAY SATPUR, NASHIK श्यामची आई हे पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेली मराठी आत्मकहाणी आहे. नाशिकच्या कारागृहात असताना त्यांनी या...Read More
Katkar Supriya Rajendra
श्यामची आई : हृदयस्पर्शी मातृप्रेमाची कलाकृती
Katkar Supriya Rajendra (Student)
SAMARTH SHIKSHANSHASTRA MAHAVIDYALAY
SATPUR, NASHIK
श्यामची आई हे पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेली मराठी आत्मकहाणी आहे. नाशिकच्या कारागृहात असताना त्यांनी या पुस्तकाच्या लिखाणास प्रारंभ केला. आईच्या प्रेममय थोर शिकवणुकीचे सरळ, साध्या व सुंदर संस्कृतीचे गोड कथात्मक चित्र म्हणजे ‘श्यामची आई’ असे म्हणता येईल. आपल्या मुलांवर अपार माया करणारी, त्यांनी सुसंस्कारी बनावे म्हणून झटणारी; पण हे संस्कार उपदेशाच्या डोसाच्या रूपात मुलांना न पाजता स्वत:च्या वागण्यातून व दैनंदिन छोट्याछोट्या प्रसंगातून मुलांच्या मनावर ते संस्कार बिंबवणारी आणि मुलांना शिस्त लावताना प्रसंगी कठोर बनणारी ही आदर्श ‘आई’ आजच्या पिढीतील उगवत्या पिढीसाठीच नव्हे तर त्यांच्या आईबाबांसाठी प्रेरक ठरेल, हे निश्चित.
आईच्या सान्निध्यात श्याम कसा घडला, आईच्या कोणकोणत्या गुणांचे त्याला अनुभव आले, आईची थोरवी त्याला कशी प्रत्ययाला आली हे सांगत असतानाच लेखकाने श्यामच्या मर्यादा, श्यामचे सद्गुण सूचित केले आहे. ‘रामरक्षा स्तोत्र’ उतरवून घेण्याची हकिगत, कळ्या तोडून आणण्याचा प्रसंग, घरातून पळून जाऊन परत आल्याचा प्रसंग, दोन आणे दक्षिणा आणण्याचा प्रसंग, वडिलांवर रागावण्या-रुसण्याचा प्रसंग, नोट चोरून घेण्याचा प्रसंग, श्लोक न म्हणता म्हटला असे खोटे बोलल्याचा प्रसंग, असे कितीतरी प्रसंग. आपल्या ठिकाणचे दुर्गुण श्यामला जसजसे जाणवतात तसतसे त्याचे व्यक्तिमत्त्व उजळत जाते, विकास पावते. पुण्य व पाप, सत्कर्म व दुष्कर्म, नीती व अनीती यांचे माणसाच्या हिताच्या दृष्टीने मूलभूत ठरणारे दंडक श्यामच्या आईच्या आचरणातून व उपदेशातून वेळोवेळी व्यक्त झाले आहेत.
खरोखरच, श्यामची हे पुस्तक वाचल्यानंतर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. आणि पुस्तक वाचण्यास सुरु केल्यावर पूर्ण पुस्तक वाचण्याचा मोह आवरणार नाही.
‘श्याम पायाला घाण लागू नये म्हणून इतका जपतोस,
तसेच मनाला घाण लागू नये म्हणूनही जप’
असे सांगणारी आई कायमच स्मरणात राहते.
धन्यवाद …
करी मनोरंजन जो मुलांचे। जडेल नाते प्रभुशी तयाचे।
पुस्तकात एकूण ४२ प्रकरणे आहेत. साने गुरुजींचा जन्म २४ डिसेंबर १८९९ रोजी झाला. साने गुरुजी पालगड येथील निवास स्थानी राहत होते. गुरुजींची आई ह्या यशोदा...Read More
Mrs. Sunita D. Bansode
करी मनोरंजन जो मुलांचे। जडेल नाते प्रभुशी तयाचे।
पुस्तकात एकूण ४२ प्रकरणे आहेत. साने गुरुजींचा जन्म २४ डिसेंबर
१८९९ रोजी झाला. साने गुरुजी पालगड येथील निवास स्थानी राहत होते.
गुरुजींची आई ह्या यशोदा या नावाने त्या ओळखल्या जात होत्या. “श्यामची आई” हे
पुस्तक त्यांच्या मित्राच्या हट्टासमुळे लिहिले गेलेले आहे. एकदा त्यांचे मित्र त्यांना
विचारतात. तुझ्या जीवनात ही माधुर्य, सरलता, कोमलता, प्रेम हे गोड हसणे ,ही
सेवावृत्ती निरहता कोणतेही काम करण्याची लाज न बाळगणारी वृत्ती कुठून येते. ही
जादू तुला कुठून मिळते .आम्हाला पण सांगा ना, तेव्हा साने गुरुजींना राहवेना. आणि
त्यांचे डोळे भरून आले. मी किती भाग्यवान आहे ,असे साने गुरुजींना वाटू लागले.
माझी आई म्हणजे “माझे दैवत माझा गुरु कल्पतरू” नुसती ती जन्मदात्री नव्हती तर
गुरुजींचा प्राण आणि त्यांचा श्वास होती. या अखंड मातृभक्तीतूनच “श्यामची आई”
या अजरामर कलाकृतीचा जन्म झाला. साने गुरुजी १९३१ साली नाशिकच्या
तुरुंगात होते, तेव्हा ९ फेब्रुवारी १९३३ रोजी लिहिण्यास सुरुवात केली. पाच
दिवसात त्यांनी लेखन पूर्ण केले. पहिली रात्र सावित्री व्रत ते ४२ वी रात्र स्मुती श्राद्ध
अशा रात्री त्यांनी लिहिल्या आणि अशा रात्री तुरुंगातील मुलांना खूप आवडल्या
सावित्रीचे व्रत या रात्र मध्ये गुरुजींच्या वडिलांवर झालेला हल्ला पण ते लोक खरे
खुनी नव्हते.तर त्यांच्या गरिबीमुळे त्यांना असे क्रूर कर्म करायला लागते. पण त्यांच्या
मुळाशी मात्र प्रेम स्वतःच्या कुटुंबाला सांभाळण्यासाठी त्यांना असं वागावं लागले.
जगात स्पर्धा हेच सत्य आहे .
आक्कांच्या लग्नाची गोष्ट सांगताना आई आणि आत्या संदर्भात आठवण
सांगितली आपल्याजवळ आहे ते दुसऱ्याला द्यावं दुसऱ्याच अश्रू पुसावं. अशी शिकवण
श्यामची आईंनी दिली आहे.फुलं म्हणजे परमेश्वराची रसमयी सादरियम मूर्ती. मुकी
फुले झाडावर फुलली पाहिजेत. असं समज आईने खूप छान सांगितली आहे. देवाचे
काम करताना लाजू नये, पाप करण्याची लाज धर अशा शब्दाच्या शिकवणीतून
गुरुजींवर सखोल परिणाम झाला. आईच्या शब्दांना किती महत्त्व आहे .श्रम-प्रतिष्ठा,
नीटनेटकेपणा, वक्तशीरपणा, वैज्ञानिक दृष्टिकोन,ही व्यक्तिगत मूल्य. सर्व धर्म
समभाव, संवेदनशीलता, स्त्री पुरुष समानता, ही सामाजिक मूल्य आहेत. आणि
राष्ट्रीय एकात्मता, हे राष्ट्रीय मूल्य आहेत. या सर्व मूल्यांचं सुंदर दर्शन “श्यामची
आई” पुस्तकात आपणाला घडते. मानवी मूल्यांबद्दल कितीतरी बदल, कितीतरी
रंग आणि गंध श्यामची आई मध्ये वाचायला मिळतात. काही गोष्टीत त्यांनी त्यांचं
इतिहास सांगितला आहे. त्यावरून त्यांचे जीवन दर्शन होते. पण प्रासंगिक जीवनदर्श
हेच श्यामची आईची वैशिष्ट्ये आहेत. असे म्हणता येईल. या जगात वावरताना नुसते
प्रेम पुरेसे नाही, तर जीवन सुंदर करण्यासाठी त्या गोष्टी आवश्यक आहेत. प्रेम, ज्ञान,
आणि शक्ती या तिन्ही गोष्टी ज्यांच्याकडे आहेत, त्याला जगात कृतार्थ होता येईल.
प्रेम प्रेमहीन व्यर्थ आहे, ज्ञानहीन ज्ञान व्यर्थ आहे, शक्तीहीन प्रेम व ज्ञान हे ही व्यर्थच
याचे सुंदर चित्र सहजरीत्या आणि सोप्या शब्दात सांगितले आहे.
एकमेकांचे प्रेमळ बंध निर्माण झाले तर वातड वाद संपतील आणि
परस्परसंबंधांना एक भावचिंब रूप येईल. गुरुजींना वाटतं आईचे प्रेम , माया थोर
शिकवण्याची सरळ साध्या सुंदर संस्कृतीचे एक गोड कथात्मक चित्रण म्हणजे
श्यामची आई म्हणता येईल. आपल्या मुलांवर अपार माया करणारी त्यांना
सुसंस्कारी बनावे यासाठी झगडणारी, छोट्या-छोट्या प्रसंगातून मुलांच्या मनावर
संस्कार बिंबवणारी, शिस्त लावताना प्रसंगी कठोर बनणारी, ही आदर्श आई आजच्या
पिढीतील उगवत्या पिढीसाठीच निवेदन त्यांच्या आईवर बाबांसाठी प्रेरक ठरेल हे
निश्चित. श्यामची आई हे नुसते पुस्तक नाही, तर आई मुलांमधील अफाट प्रेम
कृतज्ञता करणारा एक ग्रंथ आहे असे म्हणता येईल. आई म्हणजे मुलांचं पूर्णत्व आहे. हे
या पुस्तकातून समजते साने गुरुजी सांगतात माझी आई ईश्वरी
देणगी आहे. आईच्या महान त्यागाचे आणि सुसंस्काराचे प्रभावी चित्रण गुरुजींच्या
लेखणीतून आईच्या असिम प्रेमाची, त्यागाची, कर्तव्य भावनेची अप्रतिम कहानी
उलगडते.
नातेसंबंधीचा जिव्हाळा जाणून घेण्यासाठी आई मुलांमधील प्रेम म्हणजे संस्कार
नीटनेटकेपणा असल्या गोष्टी आजी कडून आणि समाजातून ऐकल्या होत्या त्या
प्रेरणेतून “श्यामची आई” हे पुस्तक निवडले.
श्यामच्या आई सारखी आई प्रत्येक मुलांना भेटो तेव्हाच भविष्यात साने गुरुजी
सारखी मुले निर्माण होतील, जेणेकरून भविष्यात सुसंस्कृत पिढी निर्माण होईल.
