Availability
available
Original Title
ययाती
Subject & College
Publish Date
1959-01-01
Published Year
1959
Publisher, Place
Total Pages
351
ISBN
9788171615889
Format
Hardcover
Country
india
Language
Marathi
Average Ratings
Readers Feedback
ययाती
ययाती कादंबरी हा माझा अनुभव आहे ययाती कादंबरी बद्दल. माझ्या आयुष्यात वाचलेली मी पहिली पौराणिक कादंबरी. खांडेकरांना ज्या कादंबरी साठी ज्ञानपीठ हा साहित्य क्षेत्रातील मानाचा...Read More
Assit. Prof. Vinita Bhujang , College Name - Dr. D.Y.Patil Arts, Commerce and Science Women's College, Pimpri, Pune
ययाती
ययाती कादंबरी
हा माझा अनुभव आहे ययाती कादंबरी बद्दल. माझ्या आयुष्यात वाचलेली मी पहिली पौराणिक कादंबरी. खांडेकरांना ज्या कादंबरी साठी ज्ञानपीठ हा साहित्य क्षेत्रातील मानाचा पुरस्कार मिळाला ती कादंबरी.
तीन प्रमुख पात्रांनी त्यांच्याच तोंडून जी स्वतःची कहाणी सांगितलीय ती अतिशय उत्कंठावर्धक आहे. ययाती, देवयानी अथवा शर्मिष्ठा कोणाचीही कहाणी वाचताना असंख्य प्रश्न मनाच्या तळाशी उमटतात, कि हे असं का झालं? यांना नेमकं हवं तरी काय होत? खरंच आपल्या सुखांसाठी, आपले हट्ट पूर्ण करण्यासाठी इतकी का वाहवत जातात माणसं ?
या तिघांच्या ही मनोगतांनी जो परिणाम माझ्या मनावर केला त्याचाच हा अनुभव आहे.
प्रतिशोध. जो तीन कधी कचावर घेतला, कधी शर्मिष्ठेवर, तर कधी ययातीवर. शर्मिष्ठा राजकन्या असूनही देवयानीच्या सूडभावनेमुळे तिला दासी व्हावं लागलं. सर्वच नात्यांना पारखी झालेली ती, तिला हवं असत प्रेम, समजून घेणार माणूस. पण तिला सुद्धा ते कधी कचाला भाऊ मानून मिळवावं लागलं, तर कधी ययातीला पती मानून.
प्रत्येकाच्या सुखाच्या व्याख्या त्यांच्या गरजेनुसार बदलत गेल्या. ययाती पासूनच सुरवात करायची झाली तर ….
“ययाती”- त्याच जीवन म्हणजे फक्त प्रेमाचा शोध इतकंच मर्यादित राहिल्यासारखं वाटत. त्यानं मिळवलेलं प्रेम त्याला शेवटपर्यंत कमीच पडत राहत. त्यानं आईच्या प्रेमाची अपेक्षा करावी तर आईला मुलावरच्या प्रेमापेक्षाही स्वतःच सौंदर्य नि राजघराण्याची प्रतिष्ठा महत्वाची वाटली. अगदी एका दासीलाही आई म्हणण्याइतपत ययाती वर वेळ यावी इतका तो आईच्या प्रेमाला पारखा झाला होता. देवयानी पत्नी म्हणून आयुष्यात आली खरी पण देवयानी फक्त आणि फक्त तिला हवं असेल ते मिळवण्यासाठी त्याचा वापर करत राहिली. ययातीवर निरपेक्ष प्रेम कोणी केलं असेल तर ते शर्मिष्ठेनं, पण दुर्दैवानं तिचीही साथ मधेच सुटली. शर्मिष्ठा आयुष्यातून निघून गेल्यानं सैरभैर झालेला ययाती, अजूनच वासनेच्या आहारी गेला. आयुष्यभर तो फक्त आणि फक्त सुखोपभोगच घेत राहिला. वासने पुढे नि मद्याच्या धुंदीपुढे त्यानं सर्व नाती तुच्छ मानली. शेवटी शेवटी तर तो इतका वासनामग्न झाला कि शापामुळे आलेल्या वार्धक्यासाठी त्यानं स्वतःच्या मुलाचं तारुण्य उसनं मागितलं. विषय विकारांच्या पूर्णपणे आहारी गेलेला असा हा ययाती. सार्वभौम राजा असूनही आपण सुखी नाही आहोत, याच विवंचनेत तो जगला. मरणाची भीती कुठून ना कुठूनतरी त्याला जाणवतच राहिली. अगदी आयुष्याच्या शेवटीला कुठेतरी त्याला याची जाणीव झाली कि हे सर्व एक मृगजळ आहे. ज्याच्यासाठी तो जगला ते सर्व सुख शेवटी मिथ्या ठरलं. कदाचित म्हणूनच आपली कहाणी.
तारुण्य उसनं मागितलं. विषय विकारांच्या पूर्णपणे आहारी गेलेला असा हा ययाती. सार्वभौम राजा असूनही आपण सुखी नाही आहोत, याच विवंचनेत तो जगला. मरणाची भीती कुठून ना कुठूनतरी त्याला जाणवतच राहिली. अगदी आयुष्याच्या शेवटीला कुठेतरी त्याला याची जाणीव झाली कि हे सर्व एक मृगजळ आहे. ज्याच्यासाठी तो जगला ते सर्व सुख शेवटी मिथ्या ठरलं. कदाचित म्हणूनच आपली कहाणी कुठलाही आडपडदा न ठेवता त्याला जगाला सांगावीशी वाटली.
कथेमधील दुसरी व्यक्ती म्हणजे “देवयानी”. कचाने जिच्या प्रेमाला प्रतिसाद न देता कर्तव्याला प्रेमापेक्षा जास्त महत्व दिल अशी देवयानी. कच निघून गेल्यावर तिच्या मनावर मोठा आघात होतो. नि या सर्वात भर पडते ती शर्मिष्ठा आणि देवयानीच्या भांडणाची. अहंकारी देवयानी शर्मिष्ठेवर सूड उगवण्यासाठी तिला स्वतःची दासी बनवून हस्तिनापूरला घेऊन येते. अपमानित झालेली व्यक्ती आपला हट्ट पूर्ण करण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकते हे खांडेकरांनी देवयानीच्या रूपात पूर्णपणे व्यक्त केलंय. कदाचित देवयानी हि ती स्त्री नसावीच जी ययातीला अपेक्षित होती. पत्नीच्या रूपात त्याला एक मैत्रीण, समजून घेणारी जोडीदार आणि निस्वार्थी प्रेम करणारी व्यक्ती हवी असते. पण देवयानी कायम आपल्या सौंदर्याच्या, अहंकाराच्या जगातच राहिली. शुक्राचार्यांपेक्षा श्रेष्ठ तिच्यासाठी कधीच कोणी नव्हतं. ती कायम जे तिला हवं तेच करत राहिली. मग त्यासाठी तीन कधी आपल्या सौंदर्याचा अधिकार ययातीवर गाजवला, तर कधी महाराणी पदाचा आपला अधिकार दाखवला. खर प्रेम भोगात नसून त्यागात असत हे सत्य तिला देखील आयुष्याच्या शेवटी कळलं.
तिसरी नि महत्वाची व्यक्ती म्हणजे “शर्मिष्ठा”. ती जितकी महत्वाची तितकीच आदरणीय. ययाती आणि देवयानी यांच्यापेक्षा खूप वेगळी असलेली शर्मिष्ठा मनाला खूप भावली. खूप काही शिकवून सुद्धा गेली. तिच्याही वाट्याला दुःख आली, पण त्याहीपेक्षा तिची त्या दुःखाला सोसण्याची तयारी खूप मोठी होती. खरं प्रेम निस्वार्थी असत, नि सुखापेक्षाही जास्त मोठा आपण आपल्या माणसांसाठी केलेला त्याग असतो, तो त्याग आपल्याला सर्वश्रेष्ठ बनवतो हे तिला खूप लवकर उमगलं होत. म्हणूनच तर आई वडिलांसाठी देवयानीची दासी होणं तीन आनंदानं मान्य केलं, ययाती साठी ती सर्व काही सोडून वनवासी सुद्धा झाली. ययातीवर तीन अगदी निरपेक्ष प्रेम केलं होत. कदाचित म्हणूनच १८ वर्ष दूर राहूनही ती मनोमन फक्त ययातिचीच पूजा करायची. जेवढी हट्टी, तापट आणि संतापी देवयानी होती तितकीच शांत, प्रेमळ, नि समजूतदार शर्मिष्ठा होती. त्या दोघी म्हणजे जणू एका नाण्याच्या दोन बाजू. दैवाचे इतके आघात सोसूनही तीच ययातीवरच प्रेम कुठेही कमी होत नाही. कारण तिच्या प्रेमात कुठलाच स्वार्थ नव्हता कि कसलीच मागणी नव्हती. प्रेमात मोठ्यातला मोठा त्यागही तीन आनंदानं स्वीकार केला. कादंबरीच्या बहुतांश पात्रामध्ये काही ना काही दोष असूनही शेवटी सगळ्यात निर्दोष उरते ती शर्मिष्ठा.
कादंबरीतील प्रत्येक पात्रान स्वतःची कहाणी सांगताना, स्वतःच्या स्वभावदोषानुसार अगदी परस्परविरोधी भूमिका मांडल्यात. ज्यामध्ये प्रेम-वात्सल्य, वाद-विवाद, सूड-संयम, कर्तव्य, सर्व काही येत. पण खांडेकरांनी त्यातूनही एक अशी चर्चा आपल्यापुढे मांडलीय कि तिचा सर्वस्वी परिणाम आपल्यावर होतो. या कादंबरी मधे जीवनाचं असं काही तत्वज्ञान सांगितलंय, कि ते या सर्वांना कुठे ना कुठे, कधी ना कधी समजत गेलं तस आपल्यालाही मार्गदर्शक होत राहील.
कादंबरीतील प्रत्येक पात्रान स्वतःची कहाणी सांगताना, स्वतःच्या स्वभावदोषानुसार अगदी परस्परविरोधी भूमिका मांडल्यात. ज्यामध्ये प्रेम-वात्सल्य, वाद-विवाद, सूड-संयम, कर्तव्य, सर्व काही येत. पण खांडेकरांनी त्यातूनही एक अशी चर्चा आपल्यापुढे मांडलीय कि तिचा सर्वस्वी परिणाम आपल्यावर होतो. या कादंबरी मधे जीवनाचं असं काही तत्वज्ञान सांगितलंय, कि ते या सर्वांना कुठे ना कुठे, कधी ना कधी समजत गेलं तस आपल्यालाही मार्गदर्शक होत राहील.
काळाच्या प्रत्येक टप्प्यावर कुठेतरी ययाती, देवयानी, शर्मिष्ठा जन्माला आले आहेत. येत राहतील. खरं तर हि पात्र नसून या समाजातील प्रत्येकाच्या मनात असलेल्या भावना आहेत. ज्या प्रसंगानुरूप बाहेर येत असतात. प्रत्येकाच्या मनात एक ययाती, देवयानी, शर्मिष्ठा, कच, हे कुठेतरी लपलेले आहेत. कारण माणसामध्ये जस अहंकार, महत्वकांक्षा, सूड या विकृती असतात तसं प्रेम, त्याग, ममता या प्रवृत्तीही असतात. कधी कधी आपणही रागाच्या भरात एखादी चूक करून बसतो, मोहामध्ये भरकटून जातो, आपल्या माणसांवर निरपेक्ष प्रेमही करतो.
शेवटी काय जीवनाचं तत्वज्ञान अगदी सहज सोप्या भाषेत, कोणतीही गुंतागुंत न वाढवता जाणून घ्यायचं असेल तर अवश्य वाचा “ययाती”.
ययाती
Mrs. Auti Jayshri S., Assit. Librarian college Name- Samarth College of Engineering & Management, Belhe ययाती - विष्णू सखाराम खांडेकर यांनी मराठी भाषेत रचलेली ययाती...Read More
Mrs. Auti Jayshri S.
ययाती
Mrs. Auti Jayshri S., Assit. Librarian college Name- Samarth College of Engineering & Management, Belhe
ययाती –
विष्णू सखाराम खांडेकर यांनी मराठी भाषेत रचलेली ययाती 1959 साली प्रकाशित झाली. अतिशय खूप सुंदर अशी हि कादंबरी आहे.. उत्कृष्ट लिखाण तसेच विचार मांडण्याची पद्धत हि वाखाणण्याजोगी आहे. वाचनाची आवड असलेल्या वाचकांनी हि कादंबरी जरूर वाचावी.या कादंबरीत लेखकाने चंद्रवंशी राजा नहुष यांचा मुलगा राजा ययाती यांच्या जीवनाचा संदर्भ घेऊन समाजाला आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सध्याच्या काळातील. या कादंबरीला 1960 मध्ये ज्ञानपीठ आणि 1974 मध्ये साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. संदर्भ निःसंशयपणे दंतकथेतून घेण्यात आला आहे, परंतु लेखकाची चित्रण शैली तुम्हाला वाटेल की ‘ययाती’ आज प्रत्येक माणूस बनला आहे. खांडेकरजींच्या रचनेत काल्पनिक कथांचे काही भागही समाविष्ट केले आहेत, त्यामुळे ही कादंबरी वाचणे आवश्यक आहे.
ही कादंबरी ययातीची कामकथा आहे, देवयानीची संसारकथा आहे. शर्मिष्ठेची प्रेमकथा आहे आणि कचाची भक्तिगाथा आहे, हे लक्षात घेऊन वाचकांनी ती वाचावी,” अशी अपेक्षा स्वत: खांडेकरांनीच प्रकटपणे व्यक्त केली आहे.
कै. विष्णु सखाराम तथा भाऊसाहेब खांडेकर यांच्या एकूण साहित्यकृतींच्या रत्नमाळेतील ‘ययाति’चे स्थान मेरुमण्यासारखे आहे.
या कादंबरीचा पुराणाशी केवळ नावापुरता संबंध नाही. एका प्रसिद्ध पौराणिक उपाख्यानाचे धागेदोरे घेऊन ते त्यांनी या कादंबरीत स्वतंत्र रीतीने गुंफले आहेत.
आपल्या प्रतिभेची जात, तिची शक्ती आणि तिच्या मर्यादा यांची योग्य जाणीव झालेल्या खांडेकरांनी आत्माविष्काराला योग्य अशीच कथा निवडली. ती ज्या माध्यमातून त्यांना प्रगट व्हावीशी वाटली, त्याच्यावर त्यांचे प्रभुत्व होतेच. पुराणकथांत जे भव्य-भीषण संघर्ष आढळतात, त्यांचे मंथन करण्याची अंगभूत शक्तीही त्यांच्या चिंतनात होती. जीवन जसे एका दृष्टीने क्षणभंगुर आहे, तसेच ते दुसर्या दृष्टीने चिरंतन आहे; ते जितके भौतिक आहे, तितकेच आत्मिक आहे, या कठोर सत्याचे आकलनही त्यांना पूर्णत्वाने झालेले होते.
त्यामुळेच एका पौराणिक कथेच्या आधाराने एक सर्वोत्तम ललितकृती कशी निर्माण करता येते, याचा आदर्श वस्तुपाठच ‘ययाति’च्या रूपाने श्री. खांडेकरांनी वाचकांपुढे ठेवला आहे.
कामुक, लंपट, सप्नातही ज्याला संयम ठाऊक नाही, असा ययाति; अहंकारी, महत्त्वाकांक्षी; मनात दंश धरणारी आणि प्रेमभंगाने अंतरंगात द्विधा झालेली देवयानी; स्वत:च्या सुखाच्यापलीकडे सहज पाहणारी आणि ययातिवर शरीरसुखाच्या, वासनातृप्तीच्या पलीकडच्या प्रेमाचा वर्षाव करणारी शर्मिष्ठा आणि निरपेक्ष प्रेम हाच ज्याचा स्वभावधर्म होऊन बसला आहे, असा विचारी, संयमी व ध्येयवादी कच या चार प्रमुख पात्रांमधील परस्परप्रेमाची विविध स्वरूपे या कादंबरीत समर्थपणे चित्रित झाली आहेत.
ययाती
Name:- Joshi Sujit Dhananjay Dept. of Sociology,SPPU, Pune. ‘ययाती’ ही शिक्षक, लेखक, कवी विष्णू सखाराम खांडेकर यांची १९५९ साली प्रथम प्रकाशित झालेली मराठी आणि भारतीय...Read More
Joshi Sujit Dhananjay
ययाती
Name:- Joshi Sujit Dhananjay
Dept. of Sociology,SPPU, Pune.
‘ययाती’ ही शिक्षक, लेखक, कवी विष्णू सखाराम खांडेकर यांची १९५९ साली प्रथम प्रकाशित झालेली मराठी आणि भारतीय साहित्यातील एक नामवंत कादंबरी आहे. या कादंबरीच्या पुढे वारंवार आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. १९५८ – ६८ या दशकामध्ये भारतीय भाषांतील प्रकाशित सर्जनात्मक साहित्यातील सर्वोत्कृष्ट रचना म्हणुन १९७४ साली या कादंबरीसाठी खांडेकरांना भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला आहे. पुढे हिंदी, इंग्रजी आणि इतर भाषांमध्ये तीचा अनुवाद केलेला आहे. मराठी साहित्यातील अनेक साहित्यिकांची आणि वाचकांची ती पहिली पसंती ठरली आहे आणि म्हणुनच गेल्या ६५
वर्षांमध्ये तीचे वाचकवर्गातील कुतुहल तीळमात्रही कमी झाले नाही. कथासुत्र थोडक्यात सांगणे तसे कठीण काम आहे. ययाती नावाचं हस्तीनापुरचा जन्मजात वैभवसंपन्न राजपुत्र जो बालपणीपुसुनच विलासांचा उपभोगता असतो. आंगाखांद्याने भरभक्कम असणारा राजपुत्र पुढे शुरवीर होतो, अश्वमेधाच्या घोड्यासवे तो यशस्वी परीक्रमा करतो ज्यामुळे त्याच्या पराक्रमाची किर्ती दूरदूर पसरते. या परिक्रमेदरम्यान आपल्या जन्मा आधीच सुखाच्या शोधात पळुन गेलेल्या आपल्या मोठ्या भावाशी त्याची
योगवश भेट होते. पुढे देव-दैत्यांचे युध्द टळावे म्हणुन अंगीरस ऋषी करीत असलेल्या शांतीयज्ञाचे रक्षण करण्याची जबाबदारी त्याला मीळते आणि त्यादरम्यान कच नावाच्या शांत, संयमी, सुस्वभावी, समजुतदार आणि त्यागी बृहस्पतीपुत्राशी त्याची मैत्री होते. यज्ञाचा मुख्य भाग संपला तेव्हा अचानक वडीलांची प्रकृती खालावल्याने त्याला परत हस्तीनापुरला यावे लागते. वडीलांच्या अंतिम काळात त्यांची जगण्याविषयीची आसक्ती, पुर्वकर्मामुळे मिळालेल्या शापाचा खेद, कालचक्र आणि मृत्यूसमोरची हतबलता पाहुन त्याच्या मनात जीवनाविषयी अनेक प्रश्न व मृत्यूविषयी भय निर्माण होते. ज्यापासुनच्या त्रस्ततेचा उपाय म्हणुन त्यांचे पाऊल नकळत मद्य आणी वासनेकडे वळते. पुढे वडीलांच्या मृत्युनंतर तो राजा बनतो. कचाला राज्याभिषेकाचे निमंत्रण असुनही तो येत नाही पण त्याच्याबद्दल त्याला कळते की तो दैत्यगुरू शुक्राचार्यांकडुन संजीवनी विद्याप्राप्तीसाठी दैत्यांच्या राज्यात शिरला आणि दैत्यांकडुन मारला गेला. पुढे शिकारीसाठी फिरत असता तो राक्षस राज्यात शिरतो जीथे संकटात सापडलेल्या शुक्रचार्यांची कन्या देवयानीला तो वाचवतो आणि तीच्या सौंदर्याला भाळुन तीचे पाणीग्रहण करतो. देवयानीचे प्रेम कचावर असते, तीने आपल्या वडीलांना विनवणी करून तीनवेळा कचाला जीवनदान दिलेले असते पण स्वकियांच्या कल्याणाचा हेतु लक्षात घेता त्याने ते नाकारले असते तेव्हा देवयानी त्याला विद्याविफलतेचा शाप देते. कचही तीला कुठलाही ऋषीपुत्र तीच्याशी विवाह करणार नाही असा शाप देतो. प्रेमभंगाने व्याकुळ झालेली देवयानी कचला अपमानीत करून बदला घेण्यासाठी ययातीशी लग्न करते. आपल्याला संकटात पाडणाऱ्या राक्षसराजकन्या शर्मीष्ठेला आपली दासी बनवुन ती हस्तीनापुरला घेऊन येते. देवयानीशी शारीरिक मिलन होऊनही मानसीक किंवा आत्मीक मिलन होत नसल्याने ययाती त्या प्रेमाच्या आणि मायेच्या ओलाव्याच्या शोधात शर्मीष्ठेकडे आकर्षीत होतो. पुढे दोघीही गरोदर राहतात. दोघींनाही पुत्ररत्न प्राप्त होतात. देवयानी आपल्या पतीला आवडणाऱ्या शर्मीष्ठेला मारण्याचा प्रयत्न करते पण ययाती तीला वाचवतो आणि दूर पाठवतो. पुढे ययाती आणि देवयानी यांच्यात तीडा निर्माण होऊन विरह होतो. ययाती राज्यकारभार सोडून मदीरा आणि मदनीका यांच्यात पार बुडतो. अठरा वर्षांनंतर परकिय आक्रमणादरम्यान देवयानीचा पुत्र यदु युद्धात पकडला जातो पण शर्मीषठापुत्र पुरू त्याची मुक्तता करून विजय संपादन करतो व दोघे नगरी मध्ये येतात. त्याच दिवशी अठरावर्षांनी तपश्चर्या पुर्ण करून आलेल्या आणि कन्येच्या दुःखी संसारकथेने व्यतीत झालेल्या शुक्राचार्यांच्या शापामुळे ययातीला अकाली वृद्धत्व येते. तेव्हा उत्शापासाठी त्याला त्याच्याच कुळातील, त्याच्याच रक्ताच्या कुणाचे तरी यौवन हवे असते जे तो वासनेच्या आधीन जाऊन आठरा वर्षांनी भेटलेल्या शर्मीष्ठा आणि त्याचा पुत्र पुरुकडे मागतो. पुत्र धर्माला जागुन पुरू ते देतो आणि ययाती वासनातृप्तीकडे वळतो पण शर्मीष्ठेच्या पुनर्मीलनातील अश्रुंनी त्याला पश्चात्ताप होतो. आपले जीवन त्यागुन ययाती ते यौवन गुरुला परत करतो. वेळीच आलेला कच त्याला पुनर्जीवित करतो. पुरु यदुला मोठा भाऊ मानुन राज्य देण्यास तयार असतो परंतु त्याचा त्याग देवयानीचे मनपरिवर्तन घडवुन आणतो. पुरूला राज्य सोपावुन ययाती, देवयानी आणि शर्मिष्ठा कचासोबत वानप्रस्थाश्रमाला निघुन जातात.
प्रस्तुत कादंबरी ही हिंदु पुराणातील एका प्रसिद्ध आख्यायिकेचे धागेदोरे घेऊन स्वतंत्रपणे केलेली रचना आहे असे लेखकाचे मत आहे जे बहुतांशी खरे आहे. परंतु मुळ कथेतील बोध न बदलता कथासुत्रात केलेले बदल विशेष आहेत. काम, वासना, आसक्ती, भुक , हव्यास, यांद्वारे मीळणारे क्षणीक भौतीक सुख हे माणवी जीवनाचे उद्देश नाही तर चिरस्थायी आत्मीक सुख हे आहे आणि त्याग आणि निर्वीकार , निस्वार्थ प्रेम हे त्यासाठीचे प्रभावशाली मार्ग आहेत. याचा अर्थ संसार आणि सांसारीक सुखदुःखांपासुन पुर्ण विरक्ती घ्यावी असे नाही. संसार हा जगत उन्नतीचा मार्ग आहे आणि काम त्याची प्रेरणा . या वाटेने जावे परंतु त्याची आणि इंद्रिय विषयांच्या आहारी जाऊ नये. स्वत: सवे परकल्याण करणे हे मुळ उदिष्ट जाणुन त्यासाठी आपला धर्मा जाणुन वागावे, हा मुख्य कथेचा आशय आहे. कादंबरीतील कथा चार मुख्य पात्रांभोवती फिरते – ययाती , कच, देवयानी आणि शर्मिष्ठा. तसेच इतर महत्वाचे पात्रांमध्ये नहुष महाराज, ययातीची आई, यती, अलका, मुकुलीका, माधव, तारका,अंगीरस ऋषी , शुक्राचार्य इ. समाविष्टीत आहेत. पण मुळ कथेत नसलेली काही पात्रं सुध्दा या कादंबरीत आहेत आणि त्यामुळे कथासुत्र अगदी वीलक्षण आकर्षक बनली आहे. उदा. – कच, अंगीरस, कलीका, इ. कादंबरीत काही पात्र मुळकथेपेक्षा वेगळी वाटतात; उदा. – मुळ कथेतील देवयानी इतकी क्रुर आणि अहंकारी वाटत नाही. मुळ कथेतील शर्मीष्ठा जरा चतुर, संधीसाधु आणि कारस्थानी वाटते जी कादंबरीत वाटत नाही. शिवाय या कादंबरीतील देवयानी व शर्मीष्ठा आणि कृ.प्र. खाडीलकरांच्या ‘विद्याहरण’
नाटकातील देवयानी व शर्मीष्ठा याही वेगळ्या जानवतात. कथासुत्राद्वारे काय सांगायचे ते आधीक उठावदारपणे सांगण्यासाठी लेखक अशी पात्रां रेखाटली विषय सोईस्कर करत असतात हे आढळुन येते. एकुण पाहिले तर हे सारे कथासुत्र खुलवीण्यासाठी उत्तम जुळुन आले आहे.
कथेचा विषय हा वैयक्तिक मानवी आणि सामाजीक अशा दोन्ही जीवनात विशेष मार्गदर्शक असा आहे. लेखकाने अगदी उत्तम वठवीला आहे. एका पुराण कथेला आजच्या प्रश्नांचा संदर्भ लाभेल आणि आजच्या विकारांविषयी विचार होईल यावर पुरेपुर भर दिला आहे. लेखकाने वापरलेले भाषा सौंदर्य, अलंकार, रुपके, आणि मुख्य म्हणजे विरामचिन्हांचा अगदी सुयोग्य वापर हे कादंबरीला लेखन कौशल्याचे उत्तम उदाहरण बनवते. विचारांचा आणि मनाचा गोंधळ वठवीताना जे अनेक प्रश्न वेगवेगळ्या मार्गांनी आणि रुपकांच्या अडोशाने पात्रांना पडतात ते या कथेद्वारे प्रकट होणारे तत्वज्ञान अगदी उत्तमपणे प्रकट करतात. कथेची रचना आणि कथासुत्राची गती त्यास अगदी पुरक ठरते. वाचकांना ते गुंतवुन ठेवतात. विचार करायला भाग पाडतात. मी तर अगदी हरवुन गेलो होतो ही कादंबरी वाचताना . एक वेगळीच ओढ लागली होती. कथा जरी एका कामुक राजाची कामकथा वाटत असली तरी ती आपल्या प्रत्येकाच्या आजुबाजुच्या परिसरातील विषयांच्या आसक्तीशी संबंधित आहे हे लक्षात येते.कथासुत्राची मांडणी आणि लेखन कौशल्य अगदी आवडेल असे आहे. अंतीम भागातील ययातीच्या मनातील द्वंद्व भावना प्रकट करणाऱ्या प्रश्नातील काही आकलनास जरा अवघड आहेत, तसेच दोन ते तीन सलग प्रकरणात ते आल्याने प्रश्न संख्या वाजवी पेक्षा अधीक वाटते. ययाती ही माझी बरीच वर्षापासुनची वाचनाची प्रतीक्षा होती. माझ्या कडे ती असुनही सात म्हशीने चौदा दिवस मी काही कारणांमुळे ती वाचु शकलो नाही. तो वाट पाहण्याचा काळ मी आजही आठवुन पाहतो तेव्हा ती वाचुन झाल्यानंतरचा आनंद अगदी चौपटीने वाढतो. मी माझ्या आजुबाजुच्या वीशीतल्या किंवा त्यापेक्षा प्रौढ असणाऱ्या प्रत्येकाला ही
वाचण्यासाठी संगतो कारण माझ्या मते या वयापर्यंत आपली ययातीची कामकथा, देवयानीची संसारकथा, शर्मिष्ठेची प्रेमकथा आणि कचाची भक्तीगाथा यांपलीकडच्या
आपल्या प्रत्येकाचे जीवन समृद्ध करणारे तत्वज्ञान समजुन घेण्याची कुवत विकसीत झालेली असते. ते तत्वज्ञान समजले तरच या सर्वोत्कृष्ट कलाकृतीशी न्याय होईल.
ययाति
Book Review : Bhoye Renuka Tejmal, MGV’s Loknete Vyankatrao Hiray Art, Science And Commerce College Panchvati, Nashik. Vishnu Sakharam Khandekar’s Yayati is a literary masterpiece...Read More
Bhoye Renuka Tejmal
ययाति
Book Review : Bhoye Renuka Tejmal, MGV’s Loknete Vyankatrao Hiray Art, Science And Commerce College Panchvati, Nashik.
Vishnu Sakharam Khandekar’s Yayati is a literary masterpiece that deftly retells the ancient story of King Yayati from the
Mahabharata. At its core, the novel grapples with the eternal human struggle between duty and desire, making it a timeless exploration of human psychology. King Yayati, cursed with premature old age, trades his senility with his son, Puru, to satisfy his insatiable longing for youth and pleasure. Through Yayati’s journey, Khandekar masterfully portrays the conflict between transient pleasures and the pursuit of deeper meaning in life. The character development is one of the novel’s strongest aspects, as readers witness Yayati’s transformation from a hedonistic king to a man seeking redemption. The supporting characters—Devayani, Sharmishtha, and Puru—are equally nuanced. Devayani’s vulnerability, Sharmishtha’s defiance, and Puru’s selfless sacrifice provide compelling sub plots that enrich the narrative. Each character serves as a mirror to Yayati’s internal conflict, reflecting the diverse shades of human emotion and morality. Khandekar’s writing style is poetic and philosophical, blending mythology with contemporary relevance. His vivid descriptions and introspective monologues allow readers to delve into the minds of the characters, making their dilemmas relatable even in modern contexts. The novel also raises profound questions about the nature of desire. Is desire inherently sinful, or does it drive human progress? Khandekar doesn’t provide definitive answers, instead inviting readers to reflect on their own lives. One of the most striking aspects of Yayati is its narrative depth. While rooted in mythology, the book transcends time and space, offering insights that resonate with readers across generations. Its themes of sacrifice, moral dilemmas, and the pursuit of happiness remain as relevant today as they were in ancient times. In conclusion, Yayati is not merely a retelling of a mythological tale but a profound exploration of human nature. Khandekar’s ability to intertwine philosophy with storytelling makes this book a must- read for lovers of literature and mythology. Its universal themes and rich characterizations ensure that it remains a classic in Indian literature.
Yayati
Gavali Madhav Yogiraj, Krantiveer Vasantrao Narayanrao Naik Shikshan Prasarak Sanstha's Arts & Commerce Coolege Dindori. Yayati by V.S. Khandekar is a celebrated Marathi novel based...Read More
Gavali Madhav Yogiraj
Yayati
Gavali Madhav Yogiraj, Krantiveer Vasantrao Narayanrao Naik Shikshan Prasarak Sanstha’s Arts & Commerce Coolege Dindori.
Yayati by V.S. Khandekar is a celebrated Marathi novel based on the story of King Yayati from the Mahabharata, one of the most intriguing and morally complex characters in the epic. The novel delves into the themes of desire, aging, and the pursuit of immortality, exploring the human condition with great depth and sensitivity.In the novel, Khandekar presents King Yayati’s story as a deeply
philosophical exploration of the consequences of one’s actions. Yayati is granted a boon by the gods that allows him to exchange his old age for the youth of one of his sons. However, despite enjoying a life of eternal youth, Yayati’s insatiable desire for more—more power, more pleasure, and more time—leads him to make choices that result in deep emotional and moral turmoil. His complex relationships with his sons, especially with Puru, whom he chooses to give his youth, form the core of the narrative.The novel emphasizes the destructive nature of unchecked desires, showing how Yayati’s selfishness ultimately causes him to face tragic consequences. Through Yayati’s internal struggle, Khandekar explores profound philosophical questions about the nature of life, time, and the inevitability of aging and death. The author uses the character of Yayati
to reflect on the futility of seeking eternal youth and the fleeting nature of human existence.Khandekar’s writing is rich, evocative, and poignant. His narrative style is introspective, weaving together psychological depth with philosophical musings, which makes the novel a deeply reflective read. The themes of sacrifice, duty, and the acceptance of life’s impermanence are woven into the story with great care, and the novel offers a timeless meditation on the human pursuit of happiness and fulfillment.
Yayati is considered a classic of Marathi literature for its philosophical depth, its exploration of moral dilemmas, and its rich, poetic prose. It is an introspective and thought-provoking work that raises important questions about the nature of human desires, the passage of time, and the consequences of one’s choices. For readers interested in philosophy, mythology, and the human experience, Yayati is a profound and rewarding read.
ययाती
ययाती – वि. स खांडेकर (कांबळे पलक उमेश SYBA ) विद्या प्रतिष्ठानचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बारामती. प्रस्तावना :- वि. स खांडेकर यांचे अत्यंत...Read More
कांबळे पलक उमेश
ययाती
ययाती – वि. स खांडेकर (कांबळे पलक उमेश SYBA ) विद्या प्रतिष्ठानचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बारामती.
प्रस्तावना :- वि. स खांडेकर यांचे अत्यंत नावाजलेले आणि अत्यंत श्रेष्ठ साहित्यातील श्रेष्ठ ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ही कादंबरी प्रसिद्ध आहे. ययाती लेखक वि. स खांडेकर यांची 1959 सालची मराठी भाषेतील ऐतिहाशिक कादंबरी आहे. मराठी साहित्यातील सर्वात लोकप्रिय आणि आदरणीय कादंबऱ्यापैकी एक आहे. महाभारतातील पात्र ययाती आणि देवयानी यांच्या पौराणिक प्रेमकथे भोवती फिरणारी ही कादंबरी आजवर लिहलेली सर्वोत्कृष्ट साहित्यकृती म्हणून ओळखली जाते. सदर कादंबरी ही साध्या, सोप्या आणि वाचकाला मनापर्यंत भिडणारी आहे. आशय अगदी सोप्या शब्दांमध्ये मांडलेला आहे. भावनांवर आधारित ही कादंबरी आहे. हस्तिनापुरचा राजा ययाती नावाच्या नायकाच्या जीवनावर केंद्रस्थानी आहे.
सारांश : निराशा ययातीच्या मुरुवातीच्या जीवनाचे वैशीष्ट्ये आहे. कादंबरीतील पात्रे सामान्यतः काव्यात्मक भाषा वापरतात. कादंबरीत तीन कथाकार आहेत. ययाति देवयानी आणि शर्मिष्ठा, जेव्हा ययातीला समजते की, त्याच्या आईने आपले संदिर्य गमावण्याच्या भीतीने त्याचे दुध सोडले आहे तेव्हा त्याचा मातृप्रेमावरील विश्वास तुटतो नंतर त्याला क्रूरता भाणि उत्कटतेचा आनुभव येतो. जो त्याच्या पुरुषत्वाला आव्हान येतो ययातीची कथा आपल्याला एक चांगला घडा सांगते की, तारुण्य हा जीवनाचा सर्वोत्तम काळ आहे हा सौंदर्य सामर्थ्याने भरलेले आहे. हा तो काळ आहे, जेव्हा एखादा तरुण स्वतःसाठी किंवा देशाचे कल्याण करू शकतो पण ही कादंबरी आपल्याला हे देखील सांगते की, भोगाने इच्छा शमवण्याचा व्यर्थ प्रयत्न आहे मनुष्याच्या भोगवादी प्रवृत्तीवर प्रकाश टाकणारी ही कादंबरी आहे
ही कादंबरी ययातीची कामकथा आहे, देवयानीची संसारकथा आहे, शर्मिष्ठाची प्रेमकथा आहे, आणि कचाची भाक्तीग्राथा आहे हे कथानक वाचल्यानंतर आपल्या लक्षात येते ययाती हा आजच्या सामान्य मनुष्याचा प्रतिनिधी आहे. पुराणातल्या ययातिची कामवासना किती कठोर स्वरूप धारण करू शकते आणि भोगाच्या समुद्रात मनुष्य कितीही बुडाला तरी त्याची इच्छा अतृप्त राहते. हे या कादंबरीमधून स्पष्ट होते आजचा मनुष्य केवळ वासनेला बळी पडत आहे. त्याचे मनोविकार अनियंत्रित स्वरूपाचे आहेत.
विश्लेषण = ज्याला स्वप्नातही संयम नाही असा ययाती, अहंकारी, महत्त्व काशी आणि मनात दंश धरणारी आणि प्रेमरंगात दिव्धा झालेली देवयानी, स्वताच्या पलीकडे सहज पाहणारी आणि ययातीवर प्रेमाचा वर्षात करणारी शर्मिष्ठा निरपेक्ष प्रेम हाच तिचा धर्म होवून बसला आहे. विचारी, ध्येवादी संयमी, कच ही चार प्रमुख पात्रे या कथेमध्ये आढळतात. या पात्रांभोवती ही कथा फिरते वाचकांनी आवश्यक वाचावी अशी ही कथा आहे.
मनुष्याच्या चीस्तरून राहण्याऱ्या भोगवादी प्रवृत्तीवर एक वेगळा प्रकाश ही कादंबरी टाकते जेव्हा मनुष्याला हा वर मिळतो त्यावेळेस त्याला हे जीवनातील अंतिम सत्य नव्हे याची जाणीव होते.
ताकद आणि कमकुवत बाजू: ययाती कादंबरी तरुणांसाठी तसेच सखल मानवजातीसाठी आवश्यक आहे ययातिने सर्व सुख उपभोगली पण तो सुखी मात्र होवू शकला नाही. आनियंत्रित कामवासना त्याला आधिकाधिक सतावत गेली, शुर धाडसी, पराक्रमी आणि जग जिंकल्याची स्वप्न ज्या ययातिने पाहिली ती काही काळानंतर स्वप्नच राहिली. यायाती कादंबरी खूप प्रसिद्ध आणि महत्व पूर्ण संदेश देणारी कादंबरी आहे.
वासनेच्या आहारी गेलेला ययाति एवढा स्वार्थी होती की, स्वताला शाप म्हणून मिळालेले वृध्दत्व तो आपल्या पोटच्या मुलाला देऊ करते.
वैयक्तिक विचार – ययाति ही कादंबरी खूप छान असून माझ्या मते, प्रत्येक तरुण वयातील मुलाने वाचावी अशी ही कादंबरी आहे किशोरवस्थेत, तरूणावस्थेत आपल्या हातात वेळ आणि वय या दोन गोष्टी असतात शूर, धाडसी आणि ज्या तरुणाने जग जिंकायची स्वप्न पाहिली तो ययाति कामवासनेच्या आहारी जावून स्वर्थी, महत्वकांक्षी होवुन जातो. आणि आपल्या अंगी असणाऱ्या पराक्रमी शौर्याला त्याला हळूहळू विसर पडतो. शेवटी हे सारे काही निष्फळ, निरर्थक उरते त्यामुळे वाचकांनी आवश्य त्या कादंबरीला प्राधान्य देवून ती वाचावी आणि प्रत्येक तरुणाने त्यामध्ये जो संदेश दिला आहे त्याचे अनुकरून करून या दृष्टीने वाटचाल करावी ही नम्र विनंती.
yayati
Yayati is born in a King’s family and since childhood tries to understand what the purpose of life is. His mother, afraid that he may...Read More
Asst. prof Lonkar Sarika Haribhau
yayati
Yayati is born in a King’s family and since childhood tries to understand what the purpose of life is. His mother, afraid that he may leave home to become an ascetic like his elder brother makes him take a vow that he will never accept asceticism. But this intensifies his curiosity even more as he wonders what does a renunciate gain, what pleasure they acquire while sacrificing a life of wealth, comfort, and aristocratic pleasures. The story becomes dramatic when the characters Devyani and Sharmishtha enter the scene. Both of them are beautiful young women and dream of aristocratic lives. They are friends but Devyani is jealous of Sharmishtha. Devyani by virtue of a coincidence convinces Yayati to marry her and by a clever ploy, traps Sharmistha into a pact to become her maid servant.The story becomes quite interesting after that as we see the character’s nature unfolding. Yayati seems to succumb to Devyani’s demands just to please her, and she starts drawing full benefit of his infatuation. Yayati, who is trying to find happiness through Devyani, soon realizes she doesn’t love him and so feels drawn towards her servant Sharmishtha. He keeps trying to figure out what will bring him happiness but keeps equating fickle enjoyments as eternal joys. Consequently, he goes on submitting more and more to his carnal impulses and feels perplexed that despite all these he is feeling further deteriorated, dissatisfied Meanwhile, the drama between Devyani and Sharmishtha intensifies as Devyani begins to see Sharmishtha as a threat between her and Yayati.
