SHYAMCHI AAI
श्यामची आई हे पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेली मराठी आत्मकहाणी आहे. नाशिकच्या कारागृहात असताना फेब्रुवारी ९, इ.स. १९३३ रोजी त्यांनी या पुस्तकाच्या लिखाणास प्रारंभ केला आणि १३ फेब्रुवारी, इ.स. १९३३ रोजी पहाटे त्या संपविल्या. आईच्या प्रेममय थोर शिकवणुकीचे सरळ, साध्या व सुंदर संस्कृतीचे एक करुण व गोड कथात्मक चित्र म्हणजे ‘श्यामची आई’ असे म्हणता येईल. आपल्या मुलांवर अपार माया करणारी, त्यांनी सुसंस्कारी बनावे म्हणून झटणारी; पण हे संस्कार उपदेशाच्या डोसाच्या रूपात मुलांना न पाजता स्वत च्या वागण्यातून व दैनंदिन छोट्याछोट्या प्रसंगातून मुलांच्या मनावर ते संस्कार बिंबवणारी आणि मुलांना शिस्त लावताना प्रसंगी कठोर बनणारी ही आदर्श ‘आई’ आजच्या पिढीतील उगवत्या पिढीसाठीच नव्हे तर त्यांच्या आईबाबांसाठी प्रेरक ठरेल, हे निश्चित.
श्यामची आई हे पुस्तक सुंदर आणि सुरस असून, त्यात साने गुरूजींनी हृदयातील सारा जिव्हाळा ओतलेला आहे. मातेबद्दल असणाऱ्या प्रेम, भक्ति व कृतज्ञता अशा अपार भावना ‘श्यामची आई’ या पुस्तकात साने गुरुजींनी मांडलेल्या आहेत. हे पुस्तक वाचून वाचकांचे डोळे व हृदय भरून येईल. हे पुस्तक ही एक सत्यकथा आहे. नाशिक तुरूंगात साने गुरूजींनी या कथा लिहिण्यास ९ फेब्रुवारी १९३३ (गुरुवार) रोजी सुरुवात केली आणि १३ फेब्रुवारी १९३३ (सोमवार) पहाटे त्या लिहून संपविल्या. मातेचा महिमा हे या पुस्तकातील मध्यवर्ती सूत्र आहे. त्याबरोबरच सुसंस्कृत व बाळबोध घराण्यातील साध्या, सरळ व रम्य संस्कृतीचे चित्रही यात आले आहे.
साने गुरूजीं लिखित ‘श्यामची आई’ एक पुस्तक नसून आई बद्दलचे प्रेम, आदर आणि कृतध्नता व्यक्त करणारा एक ग्रन्थ आहे. आईचे वैशिष्ट्य हे आहे की, तिच्या आयुष्याचा क्षण नि क्षण तसेच शारीरिक-मानसिक अंश नि अंश तिच्या बाळाच्यासाठीच असतो. बालक तळतळून रडत असो वा स्वानंदात रमून खेळत असो, त्याला हृदयाशी कवटाळणे, सर्वतोपरी रक्षण करणे, हा आईचा स्वभाव आहे. ती तिला ईश्वरी देणगी आहे. आपल्या बालकाची आवड पुरवून त्याचे जीवन साकारणे, हे तिचे अंगभूत कर्तव्य ती निरपेक्षपणे बजावत राहते. श्यामच्या आईचे संस्कार हे अनंत काळासाठी आहे. किंबहूना येणा-या काळात त्याची गरज अधिकाधिक भासणार आहे. त्यावेळी कदाचित मुलांच्या आधी त्यांच्या पालकांनी पुस्तक/सीडी बघणे अधिक गरजेचे होईल. कारण संस्कारक्षम पिढीच पुढची पिढी अधिक चांगली जोपासू शकते.
संस्कार म्हणजे नक्की काय? बहुतेकांच्या मते घरी संध्याकाळी शुभंकरोती म्हणणे, मोठयांचा आदर करणे, खरे बोलणे, स्वच्छतेचे पालन करणे… पण हे संस्कार मुलांमध्ये रूजणार कसे? संस्कार हे एका पिढीतून दुस-या पिढीत रूजवायचे असतात. संस्कारांचा अनमोल ठेवा साने गुरूजी यांनी ‘श्यामची आई’च्या रूपाने लिहून ठेवला आहे. ‘श्यामची आई’ पुस्तकावर कितीतरी पिढया संस्कारक्षम झाल्या; साने गुरुजीनी लिहिलेले ‘श्यामची आई’ हे पुस्तक कोणत्याही काळात उपयुक्त ठरणारे पुस्तक आहे. कित्येक पिढ्यांवर सुसंस्कार करण्याचं काम या एका पुस्तकाने केलं. नाशिकला जेलमधे असतांना साने गुरूजींनी आईच्या आठवणी ५ दिवसात लिहून काढल्या. साने गुरूजींचे ‘श्यामची आई’ हे काही आत्मचरित्र, कांदबरी किंवा निबंध नाही. मातेबद्दलच असणार प्रेम, भक्ति व कृतज्ञता यांच्या अपार भावना ‘श्यामची आई’ या पुस्तकात आहे. हे सुंदर पुस्तक वाचून वाचकांचे डोळे व हृदय भरून येईल. हे पुस्तक म्हणजे सच्च्या दिलाने लिहीलेल्या आईच्या आठवणीं आणि अंतकरणापासून आईला वाहिलेली श्रघ्दाजंली, हृदयातील सारा जिव्हाळा यात गुरूजींनी ओतलेला आहे.
आईच्या सान्निध्यात श्याम कसा घडला, आईच्या कोणकोणत्या गुणांचे त्याला अनुभव आले, आईची थोरवी त्याला कशी प्रत्ययाला आली हे सांगत असतानाच लेखकाने श्यामच्या मर्यादा, श्यामचे कोतेपण, क्षुदत्व सूचित केले आहे. ‘रामरक्षा स्तोत्र’ उतरवून घेण्याची हकिगत, कळ्या तोडून आणण्याचा प्रसंग, घरातून पळून जाऊन परत आल्याचा प्रसंग, दोन आणे दक्षिणा आणण्याचा प्रसंग, वडिलांवर रागावण्या-रुसण्याचा प्रसंग, नोट चोरून घेण्याचा प्रसंग, श्लोक न म्हणता म्हटला असे खोटे बोलल्याचा प्रसंग, असे कितीतरी प्रसंग. आपल्या ठिकाणचे दुर्गुण श्यामला जसजसे जाणवतात तसतसे त्याचे व्यक्तिमत्त्व उजळत जाते, विकास पावते. पुण्य व पाप, सत्कर्म व दुष्कर्म, नीती व अनीती यांचे माणसाच्या हिताच्या दृष्टीने मूलभूत ठरणारे दंडक श्यामच्या आईच्या आचरणातून व उपदेशातून वेळोवेळी व्यक्त झाले आहेत.
साने गुरुजींचे ‘श्यामची आई` हे पुस्तक पहिल्यांदा १९३५ साली प्रकाशित झाले. ‘अमृत महोत्सव’ पूर्ण करणाऱ्या ‘श्यामची आई’ पुस्तकाच्या ३ लाखांपेक्षा अधिक प्रती खपल्या आहेत. मराठी वाचकांना आज एकविसाव्या शतकातही जीवनाच्या वाटचालीची योग्य दिशा ‘श्यामची आई’ दाखवीत आहे. पुस्तकाच्या सुरुवातीस ‘प्रस्तावना’ व ‘प्रारंभ’ ही प्रकरणे असून नंतर ‘रात्र पहिली’पासून ‘रात्र बेचाळिसावी’पर्यंत ४२ प्रकरणे आहेत
श्यामची आई हे पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेली मराठी आत्मकहाणी आहे. नाशिकच्या कारागृहात असताना फेब्रुवारी ९, इ.स. १९३३ रोजी त्यांनी या पुस्तकाच्या लिखाणास प्रारंभ केला आणि १३ फेब्रुवारी, इ.स. १९३३ रोजी पहाटे त्या संपविल्या. आईच्या प्रेममय थोर शिकवणुकीचे सरळ, साध्या व सुंदर संस्कृतीचे एक करुण व गोड कथात्मक चित्र म्हणजे ‘श्यामची आई’ असे म्हणता येईल. आपल्या मुलांवर अपार माया करणारी, त्यांनी सुसंस्कारी बनावे म्हणून झटणारी; पण हे संस्कार उपदेशाच्या डोसाच्या रूपात मुलांना न पाजता स्वत च्या वागण्यातून व दैनंदिन छोट्याछोट्या प्रसंगातून मुलांच्या मनावर ते संस्कार बिंबवणारी आणि मुलांना शिस्त लावताना प्रसंगी कठोर बनणारी ही आदर्श ‘आई’ आजच्या पिढीतील उगवत्या पिढीसाठीच नव्हे तर त्यांच्या आईबाबांसाठी प्रेरक ठरेल, हे निश्चित.
श्यामची आई हे पुस्तक सुंदर आणि सुरस असून, त्यात साने गुरूजींनी हृदयातील सारा जिव्हाळा ओतलेला आहे. मातेबद्दल असणाऱ्या प्रेम, भक्ति व कृतज्ञता अशा अपार भावना ‘श्यामची आई’ या पुस्तकात साने गुरुजींनी मांडलेल्या आहेत. हे पुस्तक वाचून वाचकांचे डोळे व हृदय भरून येईल. हे पुस्तक ही एक सत्यकथा आहे. नाशिक तुरूंगात साने गुरूजींनी या कथा लिहिण्यास ९ फेब्रुवारी १९३३ (गुरुवार) रोजी सुरुवात केली आणि १३ फेब्रुवारी १९३३ (सोमवार) पहाटे त्या लिहून संपविल्या. मातेचा महिमा हे या पुस्तकातील मध्यवर्ती सूत्र आहे. त्याबरोबरच सुसंस्कृत व बाळबोध घराण्यातील साध्या, सरळ व रम्य संस्कृतीचे चित्रही यात आले आहे.
साने गुरूजीं लिखित ‘श्यामची आई’ एक पुस्तक नसून आई बद्दलचे प्रेम, आदर आणि कृतध्नता व्यक्त करणारा एक ग्रन्थ आहे. आईचे वैशिष्ट्य हे आहे की, तिच्या आयुष्याचा क्षण नि क्षण तसेच शारीरिक-मानसिक अंश नि अंश तिच्या बाळाच्यासाठीच असतो. बालक तळतळून रडत असो वा स्वानंदात रमून खेळत असो, त्याला हृदयाशी कवटाळणे, सर्वतोपरी रक्षण करणे, हा आईचा स्वभाव आहे. ती तिला ईश्वरी देणगी आहे. आपल्या बालकाची आवड पुरवून त्याचे जीवन साकारणे, हे तिचे अंगभूत कर्तव्य ती निरपेक्षपणे बजावत राहते. श्यामच्या आईचे संस्कार हे अनंत काळासाठी आहे. किंबहूना येणा-या काळात त्याची गरज अधिकाधिक भासणार आहे. त्यावेळी कदाचित मुलांच्या आधी त्यांच्या पालकांनी पुस्तक/सीडी बघणे अधिक गरजेचे होईल. कारण संस्कारक्षम पिढीच पुढची पिढी अधिक चांगली जोपासू शकते.
संस्कार म्हणजे नक्की काय? बहुतेकांच्या मते घरी संध्याकाळी शुभंकरोती म्हणणे, मोठयांचा आदर करणे, खरे बोलणे, स्वच्छतेचे पालन करणे… पण हे संस्कार मुलांमध्ये रूजणार कसे? संस्कार हे एका पिढीतून दुस-या पिढीत रूजवायचे असतात. संस्कारांचा अनमोल ठेवा साने गुरूजी यांनी ‘श्यामची आई’च्या रूपाने लिहून ठेवला आहे. ‘श्यामची आई’ पुस्तकावर कितीतरी पिढया संस्कारक्षम झाल्या; साने गुरुजीनी लिहिलेले ‘श्यामची आई’ हे पुस्तक कोणत्याही काळात उपयुक्त ठरणारे पुस्तक आहे. कित्येक पिढ्यांवर सुसंस्कार करण्याचं काम या एका पुस्तकाने केलं. नाशिकला जेलमधे असतांना साने गुरूजींनी आईच्या आठवणी ५ दिवसात लिहून काढल्या. साने गुरूजींचे ‘श्यामची आई’ हे काही आत्मचरित्र, कांदबरी किंवा निबंध नाही. मातेबद्दलच असणार प्रेम, भक्ति व कृतज्ञता यांच्या अपार भावना ‘श्यामची आई’ या पुस्तकात आहे. हे सुंदर पुस्तक वाचून वाचकांचे डोळे व हृदय भरून येईल. हे पुस्तक म्हणजे सच्च्या दिलाने लिहीलेल्या आईच्या आठवणीं आणि अंतकरणापासून आईला वाहिलेली श्रघ्दाजंली, हृदयातील सारा जिव्हाळा यात गुरूजींनी ओतलेला आहे.
आईच्या सान्निध्यात श्याम कसा घडला, आईच्या कोणकोणत्या गुणांचे त्याला अनुभव आले, आईची थोरवी त्याला कशी प्रत्ययाला आली हे सांगत असतानाच लेखकाने श्यामच्या मर्यादा, श्यामचे कोतेपण, क्षुदत्व सूचित केले आहे. ‘रामरक्षा स्तोत्र’ उतरवून घेण्याची हकिगत, कळ्या तोडून आणण्याचा प्रसंग, घरातून पळून जाऊन परत आल्याचा प्रसंग, दोन आणे दक्षिणा आणण्याचा प्रसंग, वडिलांवर रागावण्या-रुसण्याचा प्रसंग, नोट चोरून घेण्याचा प्रसंग, श्लोक न म्हणता म्हटला असे खोटे बोलल्याचा प्रसंग, असे कितीतरी प्रसंग. आपल्या ठिकाणचे दुर्गुण श्यामला जसजसे जाणवतात तसतसे त्याचे व्यक्तिमत्त्व उजळत जाते, विकास पावते. पुण्य व पाप, सत्कर्म व दुष्कर्म, नीती व अनीती यांचे माणसाच्या हिताच्या दृष्टीने मूलभूत ठरणारे दंडक श्यामच्या आईच्या आचरणातून व उपदेशातून वेळोवेळी व्यक्त झाले आहेत.
साने गुरुजींचे ‘श्यामची आई` हे पुस्तक पहिल्यांदा १९३५ साली प्रकाशित झाले. ‘अमृत महोत्सव’ पूर्ण करणाऱ्या ‘श्यामची आई’ पुस्तकाच्या ३ लाखांपेक्षा अधिक प्रती खपल्या आहेत. मराठी वाचकांना आज एकविसाव्या शतकातही जीवनाच्या वाटचालीची योग्य दिशा ‘श्यामची आई’ दाखवीत आहे. पुस्तकाच्या सुरुवातीस ‘प्रस्तावना’ व ‘प्रारंभ’ ही प्रकरणे असून नंतर ‘रात्र पहिली’पासून ‘रात्र बेचाळिसावी’पर्यंत ४२ प्रकरणे आहेत
Original Title
SHYAMCHI AAI
Subject & College
Series
Publish Date
1857-01-01
Published Year
1857
Publisher, Place
Total Pages
242
ISBN
9789395741774 (ISBN10: 9395741775
Format
Paperback
Language
Marathi
Readers Feedback
श्यामची आई
श्यामची आई" हे साने गुरुजी उर्फ पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेले आत्मकथनात्मक पुस्तक आहे. हे पुस्तक त्यांच्या बालपणीच्या आठवणीवर आधारित असून त्यांच्या आईच्या महान त्यागाचे...Read More
कु. सातव प्रांजल संजय एस.वाय.बी.ए. महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय, श्रीगोंदा
श्यामची आई
श्यामची आई” हे साने गुरुजी उर्फ पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेले आत्मकथनात्मक पुस्तक आहे. हे पुस्तक त्यांच्या बालपणीच्या आठवणीवर आधारित असून त्यांच्या आईच्या महान त्यागाचे आणि सुसंस्काराचे प्रभावी चित्रण करते. साने गुरुजीच्या लेखणीतून आईच्या प्रेमाची, त्यागाचे आणि कर्तव्य भावनेची अप्रतिम कहानी उलगडते.
कथा ही श्याम या मुलाच्या भोवती फिरते. श्याम चे बालपण गरीब पण संस्कारमय कुटुंबात घडते. त्याच्या कुटुबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत कठीण असते. वडील फारसे शिकलेले नसल्याने त्यांना रोजगार बोग्य मिळला नाही. या परिस्थितीत श्यामची आई कुटुंबाची सर्व जबाबदारी सांभाळते आणि त्यांच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी उचलते. श्यामच्या आईचे ध्येय स्पष्ट होते की, आपल्या मुलांना चांगले संस्कार देणे आणि त्यांना उत्तम व्यक्ती बनवणे.
आईच्या त्यागामुळे श्यामच्या मनात तिच्याविषयी अपार प्रेम निर्माण होते. या पुस्तकाचा शेवट अत्यंत भावनीक आहे. श्यामची आई आजारी पडते आणि अखेरीस तिचे निधन होते. तिच्या निधनानंतर श्यामच्या जीवनात एक मोठी पोकळी निर्माण होते. पण तिच्या शिकवणुकीने तो आपले जीवन सत्कारणी लावतो. आईच्या आठवणी त्याला नेहमीच प्रेरणा देतात, “श्यामची आई” हे पुस्तक एक आदर्श आईचे चित्रण करते.
या पुस्तकातुन साने गुरुजींनी त्यांच्या आईवर असलेले अपार प्रेम, आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली आहे. भारतीय समाजातील आईच्या भूमिकेचा गौरव करताना, गुरुजींनी तिला नवी ओळख दिली आहे. “शामची आई’ हे पुस्तक केवळ साहित्यिक दृष्टिकोनातून नाही तर नैतिक मूल्ये, संस्कार भाणि समाजसेवेच्या दृष्टीकोनातूनही महत्त्वाचे आहे. त्यामुळे हे पुस्तक भारतीय साहित्यातील एक अमुल्य रत्न मानले जाते. या पुस्तकातील एक प्रसंग मला खुप आवडतो. श्यामला पाण्याची भीती वाटते. म्हणून तो पाण्यात पोहणे टाळतो. श्यामला त्याचे मित्र भेकड म्हणून चिडवतात, तेव्हा आई कशी सहन करेल. श्यामची आई त्याला विहरीपाशी नेते, तिथे तो पोहायला शिकतो, याठिकाणी श्यामची आईचे कणखर, कठोर व परोपकारी स्वभावाचे दर्शन घडुन येते. एखादया कसलेल्या कुंभाराप्रमाणे ती आपल्या मुलांना नैतिकदृष्या घडवण्याचा प्रयत्न करते. यातल्या प्रत्येक गोष्टीमधुन गुरुजीनी मोठा व मोलाचा उपदेश देण्याचा व तो तितक्याच सोप्या भाषेत पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. हे पुस्तक वाचताना कोकणातील सुसंस्कृत व साध्या कुटुंबाचे व तेथील रम्य संस्कृतीचे वर्णन डोळ्यासमोर उभे राहते. हे पुस्तक वाचताना आपण त्यामध्ये आपली आई शोधण्याचा प्रयत्न करतो व यातील श्यामची आई ही आपलीशी कधी होऊन जाते हे आपल्यालाच कळत नाही. यातील कथा या जरी लहानग्या श्यामभोवती फिरत असल्या तरीही यातील प्रत्येक गोष्टीत आई ही मुख्य नायिका आहे. सावित्री व्रताच्या गोष्टीतील आईचे शब्द मन हेलावून टाकतात, देवाच्या कामाला लाजु नको, पाप करताना लाज धर हे आईचे शब्द प्रत्येकाला निशब्द करतात. सध्याच्या युगात या शब्दाचे मोल खुप मोठे आहे.
श्यामची आई
"श्यामची आई" पुस्तक परीक्षण माझ्या आयुष्यात अभ्यासाच्या पुस्तका व्यतिरिक्त पहिलं पुस्तक श्यामची आई हे वाचलं . “श्यामची आई" हे पुस्तक पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेली...Read More
श्रीम. म्हस्के अनिता
श्यामची आई
“श्यामची आई” पुस्तक परीक्षण
माझ्या आयुष्यात अभ्यासाच्या पुस्तका व्यतिरिक्त पहिलं पुस्तक श्यामची आई हे वाचलं . “श्यामची आई” हे पुस्तक पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेली मराठी आत्मकहाणी आहे. नाशिकच्या कारागृहात असताना ९ फेब्रुवारी १९३३ रोजी त्यांनी या पुस्तकांच्या लिखाणास प्रारंभ केला. इ.स. १९५३ साली या पुस्तकांवर आधारित असलेला “श्यामची आई” याच नावाचा चित्रपट देखील पडद्यावर झळकला होता. प्रल्हाद केशव अत्रे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.
“श्यामची आई” हे पुस्तक सुंदर आणि सुरस असून त्यात साने गुरुजींनी हृदयातील सारा जिव्हाळा ओतलेला आहे. मातेबददल असणाऱ्या प्रेम, भक्ती व कृतज्ञता अशा अपार भावना या पुस्तकात मांडलेल्या आहेत. ”श्यामची आई” हे पुस्तक मराठी भाषेतील अक्षरंधन आहे. मातेचा महिमा हे या पुस्तकातील मध्यवर्ती सूत्र आहे. त्यांच बरोबर संस्कृत व बाळबोध , घराण्यातील साध्या व रम्य संस्कृतीचे चित्र यांत आले आहे.
“श्यामची आई” हे पुस्तक एका आईच्या आणि मुलांच्या निर्मळ नात्यांचं खुप छान अनुभव आहे. लहानपणात कठोर आणि प्रेमळ या दोन्ही पद्धतीने केलेल्या संस्कारांची ही एक छोटीशी गोष्ट आहे. यातील प्रत्येक पाठांतुन नक्कीच बोध मिळतो आणि तो बोध कसा घ्यावा यांची ही शिकवण अगदी उत्तम रित्या मांडली आहे. “श्यामची आई” हे पुस्तक आईच्या प्रेममय थोर शिकवणुकीचे सरळ, साध्या व सुंदर संस्कृतीचे एक करूण व गोड कथात्मक चित्र आहे . हे पुस्तक प्रवित्र आहे . जिव्हाळ्याने ओतप्रोत भरलेले आहे. आचार्य अत्रे म्हणतात तसं हे पुस्तक म्हणजे “महा मंगल स्त्रोत” आहे. याबद्दल जितकं लिहावे तेवढे कमीच आहे. गुरुजींनी तुरुंगात लिहिलेल्या या सर्व रात्री गहिवरून आणतात.
यातील प्रत्येक रात्र नवीन कसा अनुभव देते यात एक गंमत आहे. स्वत:च अस्तित्व निर्माण करण्यामध्ये सर्वांनाच उपयोग होतो. मुकी फुले ही देवांस आवडतं नाही. पायास घाण लागू नये म्हणून जसा जपलांस तसे मनास घाण लागू नये म्हणून जप सांगणारी आई लुगडे अंथरते तेव्हा डोळ्यात साठलेलं पाणी ओसंडून वाहते. पत्रावळ, भूतदया अशा अनेक कथांनी हे पुस्तक वेली प्रमाणे फुलले आहे. श्यामला पोहता यावे यासाठीचा आईचा आटापिटा, स्वाभिमान, साधेपणा यांची जवळून ओळख होते.
बंधु प्रेमाची शिकवण चिंधी च्या गाण्यातून वाचताना अंगावर शहारे येतात. तर उदार पितृहद्य वाचताना प्रत्येक बापाने केलेल्या कष्टाचे चीज होते असे मी म्हणेन . “सांब शिवा पाऊस दे” बोलणाऱ्या इवल्याशा ओठातून स्वत कोणत्याही गोष्टीसाठी कसे झटावे, कसे आपल्या परीने मदत करावी हेचं दिसून येते. या पुस्तकातील सगळंच अगदी साफ, निरागस मनाने वाचावं असं आहे.
सुखदुःखाच्या पलिकडे जाऊन मातीशी एकरूप झालेल्या अनेक कथां ची ही एक माळ आहे. जी आपल्या मनाला समृद्ध करते. “श्यामची आई” पुस्तकाला आज इतकी वर्षे पूर्ण झाली तरी त्यांची लोकप्रियता अजून तितकीच आहे.
