श्री.विश्वास नांगरे पाटील हे एक तरूण,
तडफदार आणि स्वच्छ प्रतिमेचे पोलिस अधिकारी म्हणून
महाराष्ट्रात प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहेत. मुंबई वरच्या
२६/११ च्या हल्ल्यात त्यांनी दाखवलेल्या धैर्यशाली
नेतृत्वासाठी आणि प्रत्यक्ष पोलीस कारवाईतील सहभागासाठी
त्यांना राष्ट्रपती पारितोषिक मिळालं आहे. समाजाला बरोबर
घेऊन काम करण्याच्या त्यांच्या पद्धतीमुळे त्यांच्या
लोकप्रियतेत सदैव भर पडत आहे. आपल्या या कर्तृत्वाने ते
तरुणांना आदर्श बनले नसते तरच नवल. आणि म्हणूनच
विश्वासजी आपल्या या आत्मकथनातून तरुणांशी संवाद
साधतायत. तरुणांना विशेषतः यूपीएससी एमपीएससी
सारख्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या ग्रामीण तरुणांना
स्वानुभावातून मार्गदर्शन करायच्या तळमळी पोटी त्यांनी हे
पुस्तक लिहिले आहे .२०० पानी पुस्तकाच्या सुरुवातीच्या
प्रकरणात त्यांनी आपलं बालपण, शाळा, कॉलेजच्या वयातल्या
आठवणी सांगितल्या आहेत. यशस्वी व्यक्ती म्हणजे ती
लहानपणी खूप हुशार, सज्जन, एकपाठी, सर्वगुणसंपन्न असणार
असाच आपला समज असतो. पण ते लहानपणीचा खोडकर
मस्ती करणारा, चुका करणारा विश्वास आपल्यासमोर ठेवतात,
तरुणपणा तला टरबाज दुकाऱ्या करत फिरणारा, काही वेळा
चुकिच्या मार्गाने जाऊ लागलेल्या तरुणही आपल्या दिसतो
आणि हिच बाब आपल्याला अधिक भावते. शेकडा ९०% मुल
अशीच असतात. पण म्हणून ती सगळी वाया गेलेली नसतात,
ज्याप्रमाणे विश्वासजींना सावरणार, रागवणारे, ओरडणार,
कुणीतरी घरचे असतील, शिक्षक असतील किंवा कधी मित्र,
भेटत गेलंतसं जर त्यांनाही भेटलं तर तेही सावरू शकतील.
आपल्यातल्या सुप्त गुणांना वाव देऊ शकतील हा विचार
आपल्या मनात रुजतो.
. पुढची जवळपास दीडशे पानं त्यांच्या स्पर्धापरीक्षेच्या
अनुभवा बद्दल आहेत. आत्ताचे यशस्वी पोलीस अधिकारी
आहेत म्हणजे त्यानी परीक्षा अगदी सहज डाव्या हातचा मळ
असल्यासारखी पास केली असेल. असा आपला ग्रह होऊ
शकतो. पण त्यांनाही यश- अपयश बघावं लागले, अशा
निराशेच्या झोकांड्या खाव्या लागल्या होत्या. पुन्हा पुन्हा
स्वतःला प्रोत्साहित करावं लागलं. वाईट सवयीमुळे संगती
पासून, प्रलोभनापासून स्वतःला जाणीवपूर्वक बाजूला काढाव
लागलं. गावाकडन आलेला मुलगा, इंग्रजी कच्च असणारा,
इंग्रजी संभाषण सफाईदारपणे न जमणारा मुलगा हा न्यूनगंड
त्यांना ही वाटला.
विश्वासरावांनी मराठी साहित्य, इतिहास ते विषय घेऊन
हुच्च शिक्षण घेतल्यामुळे हे पुस्तक वाचताना आपण एका
पोलिसाने लिहिलेलं पुस्तक वाचतोय असं न' वाटता एखाद्या
सराईत लेखकाने लिहिलेलं आहे असचं वाटत राहत. मनगटात,
स्वप्नांना जिवंत करण्याची, पंखांत बळ निर्माण करण्याची,
लाथ मारीन तिथं पाणी काढण्याची जिद्द आणि अविरत संघर्ष
करण्याची तयारी ठेवावी लागते. अशी माहिती सांगणारा
प्रेरणा दायिक पुस्तक आहे.