शूर व धाडसी स्त्रियांचे योगदान

Share

भारतीय विरांगणाचा कथा हे पुस्तक प्रसिद्द लेखिका सौ.मालतीबाई धांडेकर यांनी १९७२ साली लिहिले आहे.भारताच्या
इतिहासात अनेक स्त्रिया होत्या ज्यांनी आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये मदत केली.या पुस्तकाद्वारे लेखिकेने
पुराणकाळापासून ते स्वातंत्र्यापर्यंतच्या काही अश्या शूर व धाडसी स्त्रियांचे योगदान आपल्यासमोर मांडले आहेत.
सौ.मालतीबाई दांडेकर या बालसाहित्यकार म्हणून प्रसिद्ध आहे.आपल्या आजीकडून लहानपणी ऐकलेल्या गोष्टी त्यांनी
सोप्या व सरळ भाषेत लिहून ‘माईच्या गोष्टी’ या पुस्तकादवारे प्रकाशित केल्या.त्याच बरोबर,त्यांनी लोकसाहित्याचा
अभयास करून लोककथांवरही विविध पुस्तके लिहिली ‘भारतीय विरांगनांच्या कथा’ या पुस्तकातून लेखिकेने विविध
स्त्रियांच्या कार्याचीमाहिती दिली आहे. या पुतकदवारे वीर सत्यभामा’राणी दुर्गावती’चांदबीबी उमाबाई,आणि कॅप्टन
लक्सष्मी या स्त्रियांच्या वीरगाथा आपल्याला कळतात.
वीर सत्यभामा श्री कृष्णाची राणी सत्यभामा ह्या पराक्रमी वीरांगना होत्या. आसाम देश ,ज्याला पूर्वी प्राग्जोतिषपूर असे नाव
हिते,तेथे भोमसूर नावाचा राजा राज्य करीत होता. तो पराक्रमी होता पण त्याला फारच दोष्ट महत्वकांक्षा होती.तो इतर
राजांवर स्वारी करायचा.त्यांच्यावर विजय मिळवायचं आणि मग त्यांच्या तरुण सुंदर बहिणी,मुली जुलमाने आणून
आपल्याला तुरुंगातठेवून द्यायचं.अशा अनेक सुंदर राजकन्या त्यांच्या कैदेत होत्या.या सर्वांशी लग्न करण्याची त्यांची दुष्ट
इच्छा होती.लोक त्याला भोमसुरा ऐवजी नरकासुरच म्हणत असत.त्याने स्वर्गावर स्वारी करून देवांना हरवले,इंद्राची
संपत्ती लुटली,तिची आई अदिती तिची कुंडलीही घेतली.इंद्राने श्री कृष्णाला भौमासुराने सूड घेण्याची विनंती केली.
ज्यावेळेस राणी सत्यभामेस कळले कि भोमसुराने निरपराथ मुलींना लीं कोंढूकों ढून ठेवले आहे, त्यावेळेस त्याही श्री कृष्णनाबरोबर
युद्धास निघाल्या .त्यांनी भाऊमसुराचा वधकरून सर्व मुलींना लीं मुक्त केले. या नरकासुराला मारल्याबद्दल लोकांनी मोठा
विजयोत्सव साजरा केला.तो दिवाळीचा प्रथम दिवस होता, म्हणून लोक त्याला ‘नरकचतुर्दशी’ म्हणू लागले. आजही
स्त्रियांचा छळ करणारे मानवरूपी राक्षस आहेत.त्यांना शासन घडवायला सत्यभामेसारखा तेज्वी व शूर स्त्रियांची गरज
आहे.सत्यभामेचे चरित्र हि सर्व स्त्रियांसाठी प्रेरणा आहे. राणी दुर्गावती वर्णन ‘लहानपणापासून धाडसी’ असे केले जाते.
अशा वर्णनामुळेच गोंदवगों नाचा राजा दलापातशाहा यांनी दुर्गवतील मागणी घातली आणि राणीनेही मनोमन त्यांच्याशी लग्न
करायचे ठरवले.परंतु वडिलांचा नकार ऐकल्यानंतर दुर्गावतीने स्वतःच दलपाशाह ला ‘आपल्या पत्नीचे रक्षण करण्यासाठी
पत्र लिहिले. सैन्य घेऊन राजा राणीच्या वडिलांशी लढला. त्यानंतर दोघांचे लग्न झाले. परंतु लग्नाच्या पाच सहा वर्षांनी
राजाचा मृत्यू पावला. राणीचा मुलगा खुपलाहान असल्यामुळे तिने राज्य चालवायला घेतले व भरभराटीस आणले. त्यावेळी
अकबर दिल्लीचा राजा झाला होता व त्याने आसफखान या जहागीराला गढामंडळावर हल्ला करण्याचे कार्य सोपवले.

Author: Dr. Sangeeta Dhamdhere

Librarian PES Modern College of Arts, Science and Commerce, Ganeshkhind, Pune