Share

संगमनेर नगरपालिका कला, दा.ज. मालपाणी वाणिज्य आणि ब. ना. सारडा विज्ञान महाविद्यालय (स्वायत्त), संगमनेर जि. अहमदनगर
विद्यार्थी चंचल रावसाहेब गुजर
वर्ग – एस. वाय.बी.ए.
पुस्तकाचे नाव – मृत्युंजय
लेखकाचे नाव – शिवाजी सावंत
पुस्तक परीक्षण / पुस्तक अभिप्राय
‘मृत्युंजय’ ही प्रसिद्ध लेखक शिवाजी सावंत यांची कादंबरी आहे. जी महाभारतातील एक अत्यंत महत्वाच्या पात्र असलेल्या कर्णाच्या जीवनावर आधारित आहे. कर्णाचे जीवन अत्यंत संघर्षपूर्ण, सशकत आणि विरोधाभासाने भरलेले होते. कादंबरीच्या माध्यमातून लेखकाने कर्णाच्या जीवनाची गहनता याच्या अंतांचा नैतिकतेचा आणि त्याच्या नातेसंबंधा -चा वेगळा दृष्टिकोन दिला आहे. कर्णाची जन्मकथा आणि त्याचा संघर्ष प्रमुख आहे. कर्णाला त्याच्या जन्माची खरी माहिती नाही होती, तो एक राणीच्या गर्भातून जन्माला आलेला अपत्य असतो . जन्माने तो शुद्ध असतो, तरी त्याचा शस्त्रविद्येचा शिक्षण मिळवले आणि तो महान योद्धा बनतो कर्णाची सद्गुणे त्याचे त्याच्या धाकट्या भावांसाठी केलेले समर्पण, त्याचे कर्तृत्व आणि त्याचे शौर्य अत्यंत प्रेरणादायक आहेत. कांदबरीत कर्णाच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांची विस्तृत मांडणी केली आहे. कर्णाच्या नातेसंबंधांतील त्रास, त्यांचा अर्जुनाशी असलेला शत्रुत्व आणि त्याच्यावर झालेल्या अन्यायाच्या कथा या सर्व गोष्टींना लेखकाने तपशीलवार आणि संवेदनशीलपणे प्रकट केले आहे. कर्णाच्या जीवनातील महत्वाच्या क्षणांना न्याय देण्यात आले. आहे, आणि कर्णाच्या पात्राचा मानवी दृष्टिकोण वाचकांपर्यंत पोहोचवला आहे. ” मृत्युंजय “ही कादंबरी केवळ ऐतिहासिक कथेची मांडणी नाही, तर ती कर्णाच्या जीवनातील विविध पैलूंचा गहन अभ्यास करतात, ज्यामुळे वाचक कर्णाला त्याच्या संपूर्ण मानवी रूपात समजू शकतात. कादंबरी वाचल्यावर कर्णाच्या जीवनाची खरी आणि समजून उमजून पाहण्याची दृष्टी मिळते

Related Posts

देशोधडी: नाथपंथी डवरी गोसावी या भटक्या जमातींत जन्म घेऊन प्राध्यापक होण्यापर्यंतचा प्रवास.

Vishal Jadhav
Shareमुंबई विद्यापीठातील इतिहास विभागात सहाय्यक प्राध्यापक पदावर कार्यरत असलेले डॉ. नारायण भोसले यांचे देशोधडी हे आत्मकथन आहे. नाथपंथी डवरी गोसावी...
Read More