Share

कादंबरी एका मोठ्या कालावधीवर आधारित आहे, ज्यामुळे ती वाचकाला विविध ऐतिहासिक आणि सामाजिक घटनांशी जोडते.कादंबरीची सुरुवात 13व्या शतकात पैठण येथील श्रीपती या पात्राने होते. सात नायकांच्या कथा पुढे येतात: साहेबराव, दसरत, जानराव, रखमाजी, पिराजी, शंभुराव आणि देवनाथ. प्रत्येक नायकाच्या कथेतून त्या काळातील सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक जडण घडण याचे प्रतिबिंब दिसून येते. सात पिढ्यांच्या सात नायकांच्या माध्यमातून मराठा समाजाच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक प्रवासाचे चित्रण केले आहे. कादंबरी सात भागांमध्ये विभागलेली असून, प्रत्येक भाग वेगवेगळ्या ऐतिहासिक कालखंडाचे प्रतिनिधित्व करतो.
कादंबरीची भाषा सहज समजण्यासारखी आहे आणि वाचकाला कथेत गुंतवून ठेवण्याची क्षमता आहे.

Related Posts

प्रकाशवाटा

Dr. Uday Jadhav
Share प्रकाशवाटा हे पुस्तक डॉ.प्रकाश आणि डॉ. मंदा आमटे यांच्या महाराष्ट्रातील हेमलकसा जिल्हा गडचिरोली येथील जीवनातील संकटे आणि संकटांनशी निगडीत...
Read More