Share

सर्वांना परिचित असलेल्या लेखकाच्या अत्यंत रसाळ अशा शैलीत सांगितलेली आणि शेकडो नाट्यपूर्ण प्रसंगांनी नटलेली ही `स्मरणगाथा’ ही वाचीत असताना पानापानांतून आपल्याला असे जाणवते, की बालवयापासूनच प्रचंड जिद्द उरात घेऊन या माणसाने जीवनाच्या धकाधकीत उडी घेतली. कडूगोड, भीषण भयानक, क्वचित जीवघेण्या अनुभवांच्या आगीत त्याच्या श्रद्धा तावूनसुलाखून निघाल्या. त्याच्यातला माणूस स्वातंत्र्यपूर्व भारतात इंचाइंचाने वाढतच गेला आणि त्यामुळे गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर हा कधी कलंदर वाटला, कधी अवलिया वाटला, तरी मूलतः ज्याने स्वतःविषयी खूप काही सांगावे आणि ज्याच्याविषयी तुम्ही-आम्ही खूप काही ऐकावे, असा निखळ, हाडामासाचा, छाती आणि काळीज दोन्ही असलेला, असा माणूस राहिला. `स्मरणगाथे’च्या सहाशे पानांतून या माणसाचे संपन्न व्यक्तिमत्त्व संपूर्णपणे फुलून आलेले आहे. दांडेकरांच्या आजवरच्या विपुल आणि गुणसंपन्न साहित्यात, त्याचप्रमाणे मराठी आत्मचरित्रात्मक वाङ्मयातही, `स्मरणगाथा’ हा एक संस्मरणीय मैलाचा दगड आहे.

Related Posts

अस्तित नास्तिकांच्या दर्शनीक विचाराची मांडणी

Yashodip Dhumal
Shareप्रा. मिलिंद बेडसे( इंग्रजी विभाग प्रमुख- श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर) *परिचय:* देव झालेला कुणी ही दीर्घ...
Read More
इकिगाई: जीवन जगण्याची कला

इकिगाई: जीवन जगण्याची कला

Yashodip Dhumal
Shareजपानी शब्द “इकिगाई” किंवा “जीवन जगण्याची कला” म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आत्मसंवेदनाच्या संदर्भात एक उद्देशपूर्ण जीवन जगण्याच्या सरावाचा संदर्भ. फ्रान्सेस्क मिरॅलेस...
Read More