Share

विद्या प्रतिष्ठानचे
कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय. विद्यानगरी. बारामती.
सोनवणे स्नेहा अंबादास (अकरावी सायन्स)
पुस्तकच नाव – गरुड झेप
लेखक – भरत आंधळे

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ग्रामीण व अर्ध ग्रामीण भागात राहणाऱ्या व देशासाठी समाजासाठी आपापल्या परीने काहीतरी भरीव कामगिरी करण्याची सुप्त तळमळ असलेल्या व त्या दृष्टीने प्रामाणिकपणे धडपडणार्‍या तरुणाई समर्पित हे पुस्तक आहेत सदर पुस्तकात आपण पाहिलं तर जगत असताना माणसाला आर्थिक दृष्ट्या सर्व समस्यांना तोंड द्यावे लागते यातून मार्ग निघतो हे या पुस्तकातून भरत आंधळे सर यांनी आपल्या कर्तुत्वाने समाजाला दाखवून दिले आहे ग्रामीण भागातील मुला-मुलींना शिक्षणापासून वंचित न ठेवता आपल्या ध्येयपूर्तीसाठी प्रयत्न करणे व चूल आणि मूल हे आपलं आयुष्य नसून व मानसिक दृष्ट्या खचलेल्या तरुण पिढीला चांगल्या मार्गाने पाऊल उचलणे आपल्या जगत पिढीसाठी किती महत्त्वाचे आहे हे पटवून दिले आहे
मी पाहिले असता या पुस्तकाची सुरुवात मुखपृष्ठापासून एका हातात गुर चारण्यासाठी काठी तर दुसऱ्या हातात अभ्यासाचे पुस्तक व दुसऱ्या हातात अभ्यासाचे पुस्तक व डोळ्यात लाल दिव्याच्या गाडीत फिरण्यासाठी चाललेले प्रबळ इच्छा या सर्वातूनच लेखकाचा दृढनिश्चय स्पष्ट होतो जगत असताना माणसाकडे प्रबळ इच्छाशक्ती ऊर्जा दांडगा आत्मविश्वास उपकारांची परतफेड असे अनेक गुण माणसाकडे असावे याच अश्विनी लिहिलेले हे प्रचंड प्रभावी पुस्तक वाचकापर्यंत पोहोचवले आहेत तरी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा म्हणूनच म्हणताना प्रत्येक यशस्वी कहानी मागे वेदनादायक भूतकाळ असतो आणि प्रत्येक वेदनादायक सुरुवातीचा अंत एक यशस्वी कहाणी असते
माणसाला जगत असताना चांगले संस्कार असणे प्रामाणिकपणा चांगले लोकांची संगत व त्याप्रमाणे आपण काय करतो कसं वागतो कोणासोबत राहतो यातून आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन ठरतो त्याप्रमाणे माणसाला आपल्या जीवनरुपी जीवनात जगत असताना खूप समस्यांना तोंड द्यावे लागतील तरी माणसाने न डगमगता त्याचा सामना करायला हवा असंच एक व्यक्तिमत्व असलेले भरत आंधळे सर यांच्या पुस्तकातून त्यांनी दाखवून दिले आहेत त्यांचा हा जीवन प्रवास वाचत असताना अक्षरश रडू येईल एवढा खडतर प्रवास व सामाजिक परिस्थितीची जाणीव यातून मार्ग निघतो हे दाखवून दिले आहे म्हणूनच म्हणतात ना अपयशी यशाची पहिली पायरी असते म्हणूनच माणसाने आपल्या जीव रुपी जीवनात दृष्ट लोभी लंपट माणसाची संगत कधीही धरू नये आपल्या ध्येयाला गवसणी घालण्यासाठी प्रयत्न करावा
फुलांच्या पायघड्यावरून चालताना काटे पोहोचलेत तर सहन करायला शिकावे कारण का त्यांना फक्त बोट न माहीत असतं वेदना कळत नसतात म्हणून तुम्ही तुमचे पाय एवढे घट्ट करा की एक दिवस काटे सुद्धा तुम्हाला सांगतील आइऐ वेलकम सुस्वागतम हम झुकता है तुम चलना सीखो

Related Posts

MAHATMA JYOTIRAO PHULE

Alka Jagtap
Share महात्मा ज्योतिराव फुले महात्मा ज्योतिराव फुले हे पुस्तक वाचून मला बऱ्याच गोष्टी समजल्या. महात्मा ज्योतिराव फुले यांचे बालपण व...
Read More

अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची दुर्दशा

Alka Jagtap
Shareअवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची दुर्दशा डॉ.आनंदा गांगुर्डे विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बारामती. बारामती....
Read More