नटसम्राट’ या नाटकाने प्रत्येक मराठी नाट्यरसिकाच्या मनात घर केले आहे. शेक्सपिअरच्या ‘किंग लियर’ने शिरवाडकरांच्या लेखनाला चलना दिली असली तरी त्यानंतर त्यांच्या प्रतिभेने झेप घेऊन ह्या नाटकाला अत्यंत जीवघेणी आर्तता मिळवून दिली आहे. यातील गणपतराव बेलवलकर ह्या वृद्ध नटाचे आणि त्यांचे ‘सरकार’ कावेरी यांचे व्यक्तिचित्रण अनेक कलावंतांना मोह पाडणारे आहे आणि गेली चाळीसहून अधिक वर्षे अनेक जड ते जिद्दीने रंगभूमीवर आणत आहेत. ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार मिळालेले हे केकामेव नाटक. ‘मराठीतील सर्वात वाचले, अभ्यासले गेलेले नाटक’ असे याचे वर्णन केल्यास ते अतिशयोक्त ठरू नये. ‘नटसम्राट’ची मोहिनी फक्त मराठी वाचकांनाच वाटलेली नाही त्यामुळेच ह्या नाटकाचे अनेक भाषांतून अनुवाद प्रसिद्ध झाले आहेत.
नटसम्राट या पुस्तकात नाटक सदर करण्यात आलेले आहे.यामध्ये आप्पासाहेब बेलवणकर आणि कावेरी यांना एक मुलगी व एक मुलगा असून सुद्धा म्हातारपणात त्यांच्या जीवनाची झालेली वाताहत याचे वर्णन यातून बघायला मिळते .हि दोन्ही पात्रे वृद्ध झाल्यावर आपल्या मुलाकडे राहतात.मुलीच्या सांगण्या वरून मुलीकडे राहायला जातात.तिथेही तशीच वागणूक मिळते त्यामुळे ते दोघेही घर सोडून जातात.या दरम्यान आजारी पडल्यामुळे पत्नी कावेरीचा मृत्यू होतो .शेवटी आप्पासाहेब एका बूट पॉलिश करणाऱ्या मुलाकडे राहतात .त्यांचा मुलगा ,मुलगी,सून त्यांना घ्यायला येतात.पुस्तकातील प्रसिद्ध उच्चार /संवाद पुढीलप्रमाणे
” To be or not to be
That is the question ”
रोहन उत्तम ठोके (MVP Samaj’s Vitthalrao Ganpatrao Hande College of Education Nashik)