प्रा. प्रकाश दत्तात्रय साबळे, सहाय्यक प्राध्यापक, मराठी विभाग, रा.ब.नारायणराव बोरावके महाविद्यालय, श्रीरामपूर , संपर्क: +918668944889
पुस्तक परीक्षण: रिंगान (कादंबरी)
लेखक कृष्णात खोत
मानवाला उत्क्रांतीची नवी दिशा देणारी कादंबरी रिंगान लेखक कृष्णात खोत यांनी ही कादंबरी तुटलेल्या मुळाच्या कोंबांना अर्पण केली आहे. माणसांच्या जीवनातील तुटले पण हे असह्य असते मग ते तुटले पण घरापासून असो,निसर्गापासून असो वा मैत्रीपासून असो हा तुटलेपणा व त्यातून सावरत जाणारी व सावरता न येणारी मानवी प्रवृत्ती यांचा उत्कट संघर्ष व्यक्त करतो. माणूस असो वा झाडे झुडपे असो ते मूळ ठिकाणापासून तुटल्यानंतर ते दुसऱ्या ठिकाणी रुजू शकत नाही.
अशा परिस्थितीत निर्माण होतो तो उद्रेक अशाच प्रकारचा संघर्ष कृष्णात खोत यांच्या रिंगान या कादंबरीतील धरणग्रस्तांच्या बाबतीत पहावयास मिळतो.
आजही आपण पाहतो केवळ धरणग्रस्तच नव्हे तर शेतकरी, शेतमजूर, भटक्या जमाती अशा प्रकारे विस्थापित झाल्यानंतर आपला उदरनिर्वाह करतात. याचे अस्सल उदाहरण आपल्याला या कादंबरीच्या रूपाने समोर येते. सरकारकडून वेगवेगळ्या कारणांसाठी अनेक गावे उठवली जातात कित्येक पिढ्या विस्थापित म्हणून शिका बसतो त्यानंतर त्यांच्या जीवनात नैरास्य, दबलेपण निर्माण होते व त्यांचे जीवन अस्वस्थ होते याचे उदाहरण रिंगाण मध्ये दिसते.
रिंगण या कादंबरीत असणारा नायक किंवा मूळ पात्र देवाप्पा हा धरणग्रस्त असून विस्थापित देवाप्पा चे कुटुंब हे मूळ ठिकाणापासून लांबच्या प्रदेशात इच्छा नसतानाही जावे लागते व विस्थापित म्हणून संघर्ष करावा लागतो. नव्या ठिकाणी देवाप्पाला माणसातील जनावर, माणसातील भूत कूप्रवृत्तीची भावना शून्य माणसांचा अनुभव येतो. ती देवाप्पा सारख्याला जुळवून घेत नाहीत. सरकारनं धरणग्रस्तांना वेगवेगळ्या ठिकाणी वस्तीला जागा दिली आणि शेत दिली पण विस्थापितांचा प्रश्न असतो तो म्हणजे उठवण्याचा “उठवा पण एका जागी तर वसवा” विस्थापित म्हणून जगताना माणसांच्या जंगलात वाघाच्या काळजाचं शेळीचं कवा काळीज झालं कळलंच नाही. असे संकुचित भित्रे पण विस्थापितांच्या वाट्याला आलेले जाणवते. धरणग्रस्तांच्या जीवावर इतर लोक सुखी होणार पण आम्ही मात्र उचलेच हा देवाप्पा चा प्रश्न मानवी मनाला अंतर्मुख करणारा आहे. नव्या गावात गेल्यानंतर त्यांच्या पोशाखातही बदल होतो. मनासारखं नाही तर तडजोडीने जगाव लागत होत. देवाप्पाला सरकारकडून मिळालेल्या शेतातील हरभरा चोरीस जातो उलट त्यांच्यावर चोरीचा आरोप केला जातो. देवाप्पाच्या आईलाही कापडातली माणसं कुणाचीच नसल्याची असे वाटते. माणसा- माणसातला दुरावा प्रस्थापित विस्थापित संघर्ष कादंबरीतील काही प्रसंगातून प्रकर्षाने जाणवतो. मूळ वस्ती व तिच्या आठवणी पुन्हा- पुन्हा जाग्या होतात. नव्या सावबाची म्हातारी मेल्यावर तिला जाळण्यासाठी स्मशानभूमीत नेलं जात. पण परगावचे प्रेत आम्ही जाळू देणार नाही. असे म्हणत मानवाता हिन तेचे दर्शन घडवतात. सतत संघर्षाला सामोरे जाणाऱ्या देवाप्पाचे मन नव्या वस्तीत रमत नव्हते. म्हणून तो मनाशीच म्हणतो “इथं आपण उगवलोच नाही तर रुजल कसं” देवाप्पाचा हा प्रश्न स्वतःचेच समाधान करणारा आहे.
देवाप्पाला धरणग्रस्त म्हणून मूळ वस्ती सोडताना सगळीच जनावर बरोबर नेऊ शकत नव्हता. त्यांच्यातल्या दूध न देणाऱ्या गाई व म्हशी तिथेच सोडून दिल्या होत्या पण मूळ वस्तीत जाणाऱ्या व येणाऱ्यांकडून देवाप्पाच्या आईला कळले की आपण सोडलेल्या ढोर आता ताणपी झाल्यात त्यास्नी कोण बी धरून त्यांचं दूध बी काढून नेत्यात. तेव्हापासून देवाप्पाच्या आईने म्हशींना दावे लावून आणण्याचा देवाप्पा जवळ हट्ट धरला होता. म्हणून देवाप्पा मोदीवाल्या म्हशीला दाव लावून आणण्यासाठी दोघांना बरोबर घेऊन धरणाच्या भिंतीवर जंगलात मूळ वस्तीकडे जायला निघतो जंगलातली आपली तिथेच राहिलेली म्हशींना रेड्यांना दावे लावून आणून विकून पैसे करायची असे देवाप्पा सह सर्वांनाच वाटत होते. जंगलातल्या म्हशी देवापाला अरबाट वाटतात दूध देणाऱ्या असतील असे वाटते देवाप्पा जेव्हा या जुन्या वस्तीत येतो तेव्हा त्याचे हृदय भरून येते आपल्या शेतातील खानाखुणा बघतो तिथली झाडे-झुडपे शेत बघून त्याला भरून येत होते. देवबाप्पा जनावरांसाठी वेडा झाला होता आपल्या जनावरांचं जगणं हे जंगली झाल्याची त्याला जाणवले. त्या जनावरांचा पाठलाग करीत तो संपूर्ण जंगलभर फिरतो त्याची दमछाक होते मात्र त्या म्हशी देवापाला हुलकावणी देतात. गोल रिंगान करून रेडकांना कोंडून बसलेल्या असतात गव्यांना वाघांना म्हशी जुमानत नाही. हे म्हशींचे वेगळे रूप देवाप्पा अनुभवत होता. जनावरांनी रिंगण करून संरक्षणाचा प्रयत्न केला आता आपण सुद्धा विस्थापित वस्तीत जगण्या मारण्याचे रिंगण मांडलं असे देवापाला वाटले.
ती जनावरे देवाकडे डोकावूनही बघत नव्हती त्याने मनात विचार केला आपण गेल्यापासून ती जनावरे वाटेकडे डोळे लावून बसल्या असतील. त्यांना घासही गोड लागत नसेल. त्यांना जंगली जनावरांनी त्रासही दिला असेल. मग त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्वतःचा संघर्ष स्वतः केला आणि आपल्या सावलीची ताकद वाढविली देवाप्पाला एक जाणीव झाली असेल. जगात कोणी कोणाचे नसते येथे स्वतःलाच स्वतःसाठी जगावे आणि मरावे लागते स्वकर्तृत्वावर जग उभे करावे लागते.
या कादंबरीत खोत यांनी झुंज दाखविली आहे ती म्हणजे देवाप्पाची झुंज प्रस्थापित लोकांबरोबर व म्हशींची झुंज जंगली जनावरांबरोबर दोघांचीही झुंज आपापल्या ठिकाणी आहे.