विद्या प्रतिष्ठानचे
कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय बारामती
नाव – सोनवणे स्नेहा अंबादास अकरावी सायन्स
पुस्तकाचे नाव – फकीरा
लेखक – अण्णाभाऊ साठे
लेखक अण्णाभाऊ साठे यांच्या फकीरा या कादंबरीला मराठी साहित्यात मानाचे पान लाभले आहे मराठी कादंबरीच्या वाटचालीतील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे अण्णाभाऊंची फकीरा ही कादंबरी अण्णाभाऊ जे लिहितात ते त्यांनी भोगलेले असते त्यांच्याविषयी ते लिहितात ती सारी त्यांची माणसे असतात फकीरा राधा विष्णुपंत इत्यादी सर्व व्यक्ती अण्णाभाऊंच्या साक्षात परिवारातल्या आहेत तळागाळातील उपेक्षित वंचित माणसा आणि त्यांची सुखदुःख चित्रित करण्यात अण्णाभाऊ रंगून गेलेले त्यांच्या कथाकार्यातून जगण्यासाठी लढणाऱ्यांच्या शौर्यगाथा वाचायला मिळतात ही माणसं अन्यायाविरुद्ध लढतात सतत झुंजतात आणि प्रसंगी प्राण अर्पणही करतात त्यांची मानव मूल्यावर श्रद्धा ढळत नाही इंग्रज सत्तेला आव्हान देणारा फकीरा आणि त्यांची शौर्यगाथा सांगताना अण्णाभाऊ सारखा नोकरशाही या उपेक्षित माणसाची तेजरची प्रतिमा सादर करतात कलादृष्ट्या श्रेष्ठ ठरलेल्या या कादंबरीला महाराष्ट्र शासनाने पुरस्कार देऊन तर गौरविलेच पण फकीराचे भारताचे भाषांबरोबर रशियन झेक पोलीश जर्मन या भाषांतही अनुवाद झाले आहे
फकीरासारख्या झुंजार माणसाची कथा डॉक्टर आंबेडकर यांच्या झुंजार लेखणीला अण्णाभाऊंनी अर्पण केली यात केवढे औचित्य आहे राज्य सरकारने प्रथम पारितोषक देऊन गौरवलेली कादंबरी कैफियत फकीरा विषयी थोडं सांगावं म्हणून लिहीत आहे ते असं की ही कादंबरी केवळ माझ्या प्रतिभेने निर्माण केली नाही प्रतिमेला सत्याचं जीवनाचे दर्शन नसेल तर प्रतिमा अनुमती वगैरे शब्द निरर्थक आहेत असा माझा अनुभव आहे कारण सत्याला जीवनाचा आधार नसला की प्रतिमा अंधारातील आरशाप्रमाणे निरोपयोगी ठरते मग कितीही प्रयत्न करत त्यात प्रतिबिंबित दिसत नाही आणि कल्पकता निर्मल होते अगदी पंख विरहित पाखरा प्रमाण ती उडूच शकत नाही मी तरी अशी भरावी मारण्यात भलताच जड आह
जशी प्रतिमेला वास्तवाची गरज असते तत्वताच कल्पनेलाही जीवनाचे पंख असणे आवश्यक असते आणि अनुमतीला सहानभूतीची जोड नसेल तर आपण का लिहितो याचा पत्ताच लागत नाही.
ही कादंबरी आजची नाही ती एक प्रकारची ऐतिहासिक कादंबरीच आहे ऐतिहासिक म्हणजे शिवाजी तानाजी केव्हा अशोकचंद्र गुप्त यांच्या काळातली नव्हे इंग्रजी अंमल प्रस्थापित झाल्यानंतर या शतकात आरंभी दक्षिण महाराष्ट्रातल्या खेडेगावच्या परिस्थितीचा विशेषता एका खेड्या गावातल्या मांग जमातीचा आणि तिच्यातल्या शूर बाबलेखाचे चित्रण करणारी कादंबरी आहे वारणेच्या खोऱ्यात लिही कादंबरी अण्णाभाऊ स्वाभाविकच आहे त्यांचे बालपण याच खोऱ्यात गेला आहे आणि ज्या जमातीचे 50 60 वर्षांपूर्वीच चित्रण त्यांनी केला आहे तिच्यातच त्यांचा जन्म झाला आहे प्रत्येक लिहीत लेखक कळत नकळत आत्मचरित्राचा उपयोग करीत असतो लहानपणी पाहिलेल्या ऐकलेल्या परंपरेने चालत आलेल्या आणि मनावर खोल संस्कार करून गेलेल्या अनेक गोष्टी ललित लेखनात प्रतिबिंबित होत असतात आपण अण्णाभाऊ या नियमाला काही अपवाद नाहीत अशी नामांकित कादंबरी मला वाचण्यास मिळाली हे माझं भाग्यच आहे.