Book Reviewed: Pawar Kaushalya Ramesh,S.Y.B.A ( History Department) MGVs LOKNETE VYNKTRAO HIRAY ARTS, SCIENCE AND COMMERCE COLLEGE, PANCHVATI NASHIK- 03
त्या दिग्विजय दानविक्रमी अशरन सूर्यपुत्र कर्णाला 21 वे अर्धे देण्यासाठी जलांजली उचलली लेखणी हाती घेतली मात्र कुठून तरी सरसरत एक विचार लहर आली नेहमीसारखी ही ओंजळ गंगेच्या जलात भरून ओसंडत नाहीये ते तर आहेच पण त्यात लोकगंगेच्या निरपेक्ष प्रेमाचं सुगंधित केशरही नकळत मिसळलं गेलं नाही नव्या एकविसाव्या शतकाच्या भूकंपासारखे हादरे देत येऊ घातलेल्या घटनांच्या सुरुवातीस मृत्युंजय ची ही 21 वी आवृत्ती पूर्वीच्याच उत्साहाने प्रकाशित होत आहे 20 व 21 अंकापासून जुळून आले आहेत हे पुस्तक 21 वी आवृत्ती उत्साहाने प्रकाशित करण्यात आले आहे यापुढे पण या आवृत्ती अशीच प्रकाशात होत जाईल म्हणून मनात विचार घेऊन गेला येणाऱ्या शतकाच्या या सूर्यपुत्राच्या कथेचा स्वागत कसा होईल नकोशी ती वाचकांना शेळी म्हणून नकोशी वाटेल ती सूर्यपुत्र कथा आहे.
सारांश
प्राचीन काळी घडून गेलेल्या महाभारतात कर्णाचा उल्लेख होतो त्याची जीवन गाथा मृत्युंजय या पुस्तकातून शिवाजी सावंत यांनी व्यक्त केली आहे मृत्युंजय म्हणजेच मृत्यूवर विजय मिळवणारा या पुस्तकाच्या शीर्षकातूनच कर्ण कसा असेल हे जाणवते महाभारतातील अतिशय पराक्रमी पुरुष म्हणून करण्याचा उल्लेख केलेला आहे कर्ण हा एक दानशूर राजा होता त्याच्या आयुष्यात त्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले परंतु त्याने कधीच माघार घेतली नाही. कायम वचनबद्ध राहिला आपल्या मित्रासाठी कायम झटत राहिला महाभारतातील युद्ध जेव्हा पेटले तेव्हा त्याच्या जीवनाची सत्यता त्याला सांगण्यात आली परंतु त्यांनी मित्राचा हात सोडला नाही साक्षात इंद्रदेव त्याच्याजवळ येऊन त्याची कवच कुंडली घेऊन गेला परंतु कर्णाने कोणताही विचार न करता दान म्हणून आपली कवच कुंडली इंद्र देवाला देऊन टाकले तरीसुद्धा करणार तसू बरई ढासळला नाही. युद्धासाठी सज्ज झाला आणि शेवटपर्यंत लढत राहिला.
निष्कर्ष
मृत्युंजय हे पुस्तक सर्वांना आवडणारे आहे या पुस्तकातून सर्वांना एक संदेश भेटतो की आयुष्यात कधीही संकटे आले तरी त्या संकटांना सामोरे जाता आले पाहिजे. त्या संकटांवर मात करून आपल्याला आपले आयुष्य जगता आले पाहिजे मृत्युंजय पुस्तक वाचल्यानंतर हा निष्कर्ष या पुस्तकातून आपल्याला मिळतो.