“कर्णासारखा दानशूर कोणी नव्हता कोणी नाही आणि कोणी होणार ही नाही.”
आयुष्यातील समस्यांवर मात करून सकारात्मक बदल घडून नवे दृष्टिकोन शोधण्यास ही कादंबरी मार्गदर्शक आहे.
लेखक शिवाजी सावंत यांनी सूतपुत्र किंवा इतर कोणी कोणत्या कुळात जन्म घ्यावा हे नशिवाने ठरवले आहे तरी पराक्रम आणि यश मी स्वतःच्या सामर्थ्यावर निर्माण केले आहे,
हे मांडले आहे
धैर्यवीर कर्णाचे चित्र अस्सीम जीवन संघर्षाच प्रतिबिंब आहे .कर्णाचे व्यक्तिमत्व निस्पूय क्षत्रिय धर्माचे पालन करणारा, भारतभूमीला वीरता ‘दानशूरता देणारा’, परशुराम शिष्य, सूर्यपुत्र आणि मृत्यूवरंही विजय मिळवणारे आहे.
मृत्यूंजय ,बरेच काही शिकवते, निर्णय कसे जीवन बदलू शकतो, संघर्षातून घडलेले जीवन, ध्येयनिश्चिती, दृढ आत्मविश्वास
ही कादंबरी इतर भाषांमध्ये देखील प्रकाशित झाली आहे. तसेच मूर्तिदेवी पुरस्कारांसारख्या अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी ही कादंबरी सन्मानित झाली आहे. कर्णाचे व्यक्तिमत्व स्पष्ट करताना त्यांनी विविध पात्रांची स्वगतं मांडली आहेत, शब्दरचना व वाक्यरचना सखोल, ठाशिव अभ्यासपूर्ण आणि अर्थपूर्ण आहे.
पात्रांच्या पोशाखांचा, ठिकाणांचा, स्वभावांचा , निर्जिव वस्तूंचा परिचय आपल्याला द्वापरयुगाच्या काळात असल्याचा भास निर्माण करतात.कर्णासारखा मित्र असावा ज्याने मैत्री तोडण्यापेक्षा मरण स्विकारले, वचनबद्ध असावा तर कर्णासारखे वचन म्हणून कुंतीमातेला पांडवांचे जीवन दिले, दानवीर असावे तर कर्णासारखे ज्याने जे दान मागितले त्याला ते दान दिले अगदी कवचकुंडले सुद्धा, आणि मृत्यूमुखी पडत असताना याचकाला दिलेले सोनेरी दातांचे दानदेखील विसरता येणार नाही.