नट सम्राट मधील प्रमुख पात्र अप्पासाहेब बेलवलकर, कावेरी, नंदा, शारदा, सुहास, नलू, सुधाकर, विठोबा आणि राजा इत्यादी
नाटकाचा थोडक्यात सारांश असा कि या नाटकातील अप्पासाहेब बेलवनकर हे आणि त्यांची पत्नी कावेरी स्वताची मुल मुली असून सुद्धा म्हातारपणात त्यांच्या जीवनाची झालेली वाताहत कशी झाली याचे दर्शन घडवते. त्याचे वर्णन या नाटकातून बघायला मिळते. हि दोन्ही वृद्ध पात्रे आपल्या मुला कडे राहतात. तेवढ्यात मुलगी म्हणते बाबा तुम्ही आमच्या कडे कधी येणार ? मुलाच्या वागणुकीला कंटाळून ते मुलीकडे जातात. पण मुलीकडे हि तशीच वागणूक मिळते. घर सोडव म्हणून चोरीचा आरोप लावला जातो आणि ते घर सोडून निघून जातात. दरम्यान त्यांची पत्नी कावेरीचा आजारपणामुळे मृत्यू होतो. हे सर्व त्यांना वृध्दपणी सहन होत नाही.
शेवटी अप्पासाहेब एक बूट पॉलिश करणाऱ्या मुलाकडे राहतात. त्यांचा मुलगा व सून हि त्यांना घ्यायला येतात परंतु अप्पासाहेब बूट पॉलिश करणाऱ्या मुलाच्या मांडीवर पार प्राण सोडतात.
धनगर जयश्री दिगंबर (M.V.P. Samaj Adv. Vitthalrao Ganpatrao Hande College of Education, Nashik)
