Share

Review By Prof.Sushma Vijay Sonar, Baburaoji Gholap College, Pune
या पुस्तकात एकूण बारा प्रकरणे आहे पहिली दोन प्रकरणे सांस्कृतिक चळवळ व सांस्कृतिक शिष्ट मंडळ अशी आहेत या प्रकरणांमधून त्यांनी व्यक्तिरेखा साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे. गच्चीसह-झालीच पाहिजे हे एक छान प्रकरण आहे.या प्रकरणामध्ये चाळीच्या मालक नवीन झाल्यामुळे तू आहे नवीन सुविधा देतो यामध्ये गच्ची सर्वांसाठी खुली करतो रघु नानांचे कन्येस पत्र, काही वासऱ्या हे प्रकरणे सुद्धा उत्तम आहे.
चाळीला आधार देण्यासाठी एखादा टेकू लागतो की काय असेच वाटते त्यातली नाती वृक्षा सारखी भक्कम त्यातही काहीशी गंमतच होती पुस्तकातील सर्व चित्रे व मुखपृष्ठ हे वसंत सरवटे यांनी रेखाटलेली आहेत पुलंच्या या पुस्तकाला प्रस्तावना फार मोठी नाही. पुलंनी चार ओळींमध्ये तीन वाक्ये लिहिलेली आहे प्रस्तावना इतकी छोटी असावी का यावरून पुलंचा साधेपणा ओळखता येईल. भ्रमण मंडळ या सगळ्यांचा कळस आहे इथे काहीजण ट्रीप प्लॅन करतात मग त्यात ट्रिपचे काय घडते? ट्रीप कशी होते आणि त्यातलं गमती जमती कशा होतात हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचणे आवश्यक आहे. एक चिंतन हे प्रकरण आपल्याला स्वतः व आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये खोल डोकवायला लागते. चाळ पूर्वी कशी होती व आता कशी आहे याचे दाखले देतात. एकूणच हे पुस्तक म्हणजे मराठी साहित्यातील एक उत्कृष्ट नमुना आडवळणाने पुलं बरच काही सांगून जातात. त्यांच्यातील सारकॅसम बरच काही बोलून जातो. तो सारकॅसम आपल्याला हसायला लावतो. परंतु घशात अचानक अवंढा येईल अशी तरतूद करतो. पुलंनी उभं केलेले प्रत्येक व्यक्तिरेखा आपल्या आजूबाजूला फिरत असतात रोजच्या आयुष्यात येतात. आणि रोज भेटतात. त्यामुळेच पुलं हे आपल्याला आपलेसे वाटतात.पुलंचा प्रत्येक पुस्तकाचा दीपस्तंभ परिवार व अवघा महाराष्ट्र ऋणी आहे.

Related Posts

हृदयस्पर्शी

Dr. Vitthal Naikwadi
Share क्षितिजाच्या पलीकडे – प्रेम, तळमळ आणि निसर्गाच्या सौंदर्यातून विणलेल्या कविता … पुस्तकाचे वर्णन: हे पुस्तक मानवी भावना आणि अनुभवांच्या...
Read More