Asst. Prof. Jagtap Akshay Goraknath Department of Civil Engineering, Rajgad Dnyanpeeth Shri Chhatrapti Shivajiraje College of Engineering, Dhangwadi
“मृत्युंजय” ही कादंबरी महाभारताच्या एका महानायक, कर्णाच्या जीवनावर आधारित आहे. कर्णाची कथा ही एक संघर्ष, निष्ठा, त्याग आणि स्वाभिमानाची गाथा आहे. कर्णाला जन्मतःच मिळालेला अवहेलनेचा शाप आणि त्याचा न्याय व प्रतिष्ठेसाठीचा संघर्ष या कादंबरीत सुरेखपणे मांडलेला आहे. शिवाजी सावंत यांनी कर्णाचा जीवनप्रवास एक भावनिक आणि तात्त्विक पैलूंनी समृद्ध करून सादर केला आहे.
मृत्युंजय” ही केवळ कादंबरी नसून ती एक अनुभव आहे. वाचकांना कर्णाचे दुःख, त्याचा अभिमान, त्याचे निस्सीम प्रेम आणि त्याग यांची जाणीव होते. कर्णाची भूमिका वाचताना वाचक त्याच्या न्यायासाठी हळहळतो आणि त्याच्या शौर्यासाठी अभिमान वाटतो.