Share
  1. वेळेचे व्यवस्थापन हे पुस्तक वेळेचे महत्त्व, त्याचे नियोजन, आणि वेळेचा अधिक चांगल्या
    प्रकारे उपयोग करण्याच्या विविध तंत्रांची माहिती देणारे आहे. लेखकाने अतिशय सोप्या आणि
    प्रभावी भाषेत वेळ व्यवस्थापनाचे महत्त्व पटवून दिले आहे. कामकाज, वैयक्तिक आयुष्य, आणि
    मानसिक शांती यामध्ये संतुलन साधण्यासाठी वेळेचा योग्य वापर कसा करावा, हे पुस्तकातील
    मुख्य उद्दिष्ट आहे.
    मुख्य मुद्दे:
    1. वेळेचे महत्त्व:
    पुस्तकाच्या सुरुवातीला लेखकाने वेळ हा आपल्या जीवनाचा सगळ्यात महत्त्वाचा
    संसाधन असल्याचे स्पष्ट केले आहे. पैसा गमावल्यास परत मिळवता येतो, पण वेळ
    गमावली तर ती परत मिळवता येत नाही, यावर भर देण्यात आला आहे.
    2. कामांची प्राथमिकता ठरवण्याचे तंत्र:
    वेळेचे व्यवस्थापन करताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि कोणत्या दुय्यम,
    हे ठरविणे अत्यावश्यक आहे. लेखकाने विविध साधनांचा उपयोग करून कसे
    प्राथमिकता ठरवायच्या याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.3. योजना आणि उद्दिष्टे:
    दिवस, आठवडा, महिना, आणि दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी नियोजनाचे महत्त्व पुस्तकात
    छान पद्धतीने समजावून सांगितले आहे. ‘SMART Goals’ (Specific,
    Measurable, Achievable, Relevant, Time-bound) पद्धतीचा उपयोग करून
    उद्दिष्टे कशी निश्चित करायची, याचे मार्गदर्शन दिले आहे.
    4. व्यत्यय आणि अडथळ्यांवर नियंत्रण:
    वेळेच्या व्यवस्थापनात अनेकदा अडथळे येतात, जसे की सतत येणारे फोन कॉल्स,
    सोशल मीडियाचे व्यसन, किंवा वेळेचा अपव्यय करणाऱ्या सवयी. लेखकाने या
    सवयींचा कसा त्याग करायचा किंवा त्यावर नियंत्रण कसे मिळवायचे, याबद्दल
    उपयुक्त उपाय सुचवले आहेत.
    5. वर्क लाइफ बॅलेन्स :
    फक्त कामावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी वैयक्तिक आयुष्य, आरोग्य, आणि कुटुंबासाठी
    वेळ देण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. “वर्क-लाईफ बॅलन्स” कसा साधायचा, यावर
    लेखकाने उपयुक्त उदाहरणे आणि तंत्रे दिली आहेत.
    वेळेच्या योग्य नियोजनाने तुम्ही अधिक उत्पादक होऊ शकता, तुमचे उद्दिष्ट साध्य करू
    शकता, आणि मानसिक शांतीही मिळवू शकता.
    Multitasking चे महत्व लेखकाणे समजाऊन सांगितले आहे.
    वेळ वाया घालवणे म्हणजे आपले आयुष्य वाया घालवणे होय.

Recommended Posts

महाकाव्यात्मक कादंबरी.

Dr. Bhausaheb Shelke
Share

Shareकादंबरी एका मोठ्या कालावधीवर आधारित आहे, ज्यामुळे ती वाचकाला विविध ऐतिहासिक आणि सामाजिक घटनांशी जोडते.कादंबरीची सुरुवात 13व्या शतकात पैठण येथील श्रीपती या पात्राने होते. सात नायकांच्या कथा पुढे येतात: साहेबराव, दसरत, जानराव, रखमाजी, पिराजी, शंभुराव आणि देवनाथ. प्रत्येक नायकाच्या कथेतून त्या काळातील […]

Read More

Ikigai

Dr. Bhausaheb Shelke
Share

ShareGaikwad Sanjay Dattatray; Bharatiya Jain Sanghatana’s Arts, Science & Commerce, Wagholi, Pune The Japanese Secret to a Long, Healthy and Happy Life, or Ikigai, is a book written by two authors, Hector Garcia and Francesc Miralles. Ikigai means the secret of life, […]

Read More