Share

अभिजात म्हणावा असा ग्रंथ आहे. प्रथम प्रकाशित १९८९. आज ३०हून अधिक वर्ष होऊन गेली, तरी हा ग्रंथ वाचला जातो. आजही तो ताजा, वाचनीय, मननीय आहे आणि पुढेही राहील १६ वर्षाचा एक युवक ‘आपल्याला देशकार्य करणारा कार्यकर्ता व्हायचे ही जीवनाची दिशा ठरवतो आणि शिक्षण, पुचक संघटन, ग्रामीण विकास, विविध ‘आंदोलनं… अशा सर्व उचापत्या करत देशभर भ्रमंती करतो, पदयात्रा काढती, काम करतो, लेखन-वाचन-चिंतन करतो… त्याची ही कहाणी आहे.
आंध्र प्रदेशातल्या वादळानंतर केलेलं मदतकार्य, फुटीरतावादी खालिस्तान चळवळीच्या काळात पंजाचमधलं काम, बांगलादेशातलं घुसखोरांविरुद्ध आसाममध्ये झालेलं आंदोलन, ईशान्य भारतातली फुटीरतावादी चळवळ, काश्मीरमधली प्रक्षोभक स्थिती, गुजरातमधलं राखीव जागांविरोधी आंदोलन, रामजन्मभूमी प्रश्न, शहाबानो प्रकरण, यातून उद्भवलेला हिंदू- मुस्लीम नात्याचा विषय, इंदिराजींची हत्या, दिल्लीतलं राजकारण, शेतकरी आंदोलन… अशा सर्व विषयांचा स्वतः समक्ष जाऊन, सहभागी होऊन घेतलेला हा शोध आहे. हा नुसता घडामोडीचा अहवाल नाही. स्वतः पाहिलेल्या, अनुभवलेल्या, सहभागी झालेल्या घटनांचे तपशील तर पात आहेतच; पण त्यांच्या मुळाशी जाऊन घेतलेला हा ‘भारताचा शोध आहे. देशस्थितीचा, देशप्रांचा सखोल अभ्यास तर आहेच; पण नुसतेच प्रश्न मांडणारे पुस्तकी पांडित्य नाही, तर उत्तरे शोधण्याची, कृती करण्याची पडपड यात आहे. सर्व जाती-पाती-वर्ग-धर्म-पंथ भाषा, प्रदेश-लिंग यांच्यावर उठून ‘भारतीय दृष्टीनं भारताच्या प्रश्नांचा शोध घेणारी ही डायरी आहे. एका विचारी कार्यकर्त्याची अंतर्मुख असलेली, अंतर्मुख करणारी, भारताच्या भविष्याबद्दल आशाचादी असलेली डायरी, करियर, कीर्ती, पद, पैसा, संसार पांचा काहीही विचारसुद्धा न करता दहा वर्षांहून अधिक काळ अर्स झोकून देऊन कार्य केल्यावर अविनाश धर्माधिकारी १९८६ साली IASमध्ये निवडले गेले. म्हणजे नुसत्या कार्यकर्त्याचा कार्यकर्ता-अधिकारी झाले, असे कार्यकर्ते अधिकारी आत्ता भारतीय प्रशासनासहित जीवनाच्या सर्व क्षेत्रांत उतरावेत, या हेतूनं त्यांनी १९९६मध्ये IAS सेवेचा राजीनामा देऊन चाणक्य मंडल परिवार’चं शैक्षणिक कार्य सुरू केलं आहे. निवडणुका लढवल्या… भ्रष्टाचार विरोधासाठी, माहितीच्या अधिकारासाठी आणि नागरिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आंदोलनं केली.
देशकार्याची धडपड सुरू आहे….

Related Posts

समांतर

Dr. Bhausaheb Shelke
Shareसमांतर म्हणजे एकाचा भूतकाळ तो दुसऱ्याचा भविष्यकाळ! प्रस्तुत कादंबरी मध्ये मांडलेली संकल्पना आजही जवळजवळ ४०-४५ वर्षानंतरही एकदम नवीकोरी व नावीन्यपूर्ण...
Read More

अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची दुर्दशा

Dr. Bhausaheb Shelke
Shareअवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची दुर्दशा डॉ.आनंदा गांगुर्डे विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बारामती. बारामती....
Read More