हलकेफुलके, आकलनास सोपे.. तुकोबा कालातीत आहेत हेच अधोरेखित होते वारंवार.

Share

Reviewed by: Dr. Dattatray Sankpal, Librarian (Affiliation: Annasaheb Magar Mahavidyalaya, Hadapsar, Pune 411028)

तुकोबा आणि अनेक देश परदेशातील विचारवंत यांची भेट काव्यरुपात पुस्तकाच्या सुरवातीला विनायक होगडे यांनी घडवली आहे. प्रत्येक भेट अंगावर काटा आणत आहे. प्रत्येक ओवी अंगावर शहारे आणते. या सगळ्या कविता घरातल्या ,शाळा, कॉलेजच्या भिंतीवर लिहून काढाव्या, असे वाटते.
या सर्व भेटी होत असताना आपण त्याचे साक्षीदार आहोत असा भास होतो. डोळे पाणावतात. मीडिया trial मध्ये संतूच्या जागी, मुकाच्या जागी आपल्याच भावना आहेत असे वाटते.
डोळे डबडबले, जेव्हा हे वाचले.
“आवलीने दिली डब्यामध्ये खीर, घेई कर्मवीर लक्ष्मी साठी
किती तिच्या खस्ता विके मंगळसूत्र, झुरे दिनरात्र पोरांपायी
साऊची छाया तिच्या ठाई हाय, थोर तीही माय लेकरांची
भाऊंनी धरले पाया आवलीचे, बांध आसवांचे फुटलेले”
तुकोबा आणि गांधी भेटीत:
“शोधला तो गाभा, भारताचा
तुकोबांच्या खांद्यावर गांधी..”
असे अनेक विचारवंत तुकोबांच्या खांद्यावर बसले आणि म्हणून त्यांना आपला समतावादी, विवेकवादी संघर्ष यशस्वी करता आला.
They say, “We are standing on the shoulders of the giants.”
विचार पेरत पेरत.. आजच्या भाषेत.. आजच्या पिढीसाठी… तुकोबा कालातीत आहेत हेच अधोरेखित होते वारंवार. जबरदस्त मांडणी. अजिबात दुर्बोध नाही. हलकेफुलके. आकलनास सोपे. छोटेखानी पुस्तक. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी.