Share

परिचय
अण्णाभाऊ साठे यांच्या ‘अमृत’ या कथेचा गाभा सामाजिक विषमता, दारिद्र्य आणि माणुसकीचा विजय या भोवती फिरतो ही कथा समाजातील दुर्बळ घटकांच्या संघर्षाचे आणि त्यांच्या माणूसपणासाठी झगडण्याचं प्रत्येयकारी चित्रण करते.
कथेचा मुख्य आशय
या कथेचे लेखक अण्णाभाऊ साठे असून, कथेचा नायक रामू हा आहे. तो प्रामाणिक माणूस आहे. तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करतो. मात्र, समाजातील श्रीमंत आणि शक्तिशाली लोक त्यांच्या मेहनतीचा फायदा घेतात. रामूची पत्नी पार्वती आणि मुलगा बाळू यांचे छोट कुटुंब आहे. त्यांना दोन वेळेचं जेवण मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो.
संघर्ष आणि अन्याय :-
रामूला कामाच्या ठिकाणी वारंवार अपमान सहन करावा लागतो. त्याचा मालक त्याला नीच वागणूक देतो आणि त्याच्या श्रमाचे योग्य मूल्य देत नाही. अशा परिस्थितीतही भिवा आपली माणुसकी आणि प्रामाणिकपणा सोडत नाही. तो नेहमीच आपल्या कुटुंबासाठी चांगल काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो.
पार्वतीचा संघर्ष :-
पार्वती ही घराची जबाबदारी सांभाळणारी आणि रामूला मानसिक आधार देणारी स्त्री आहे. ती परिस्थितीशी झगडत असताना आपल्या मुलाला चांगले शिक्षण मिळावं, अशी तिची इच्छा असते. मात्र, घरातील गरिबीमुळे ती इच्छा पूर्ण होत नाही.
बाळूचं स्वप्न :-
बाळू हा रामू आणि पार्वतीचा मुलगा आहे. त्याला शिकून मोठे माणूस बनायचं आहे. मात्र, गरिबीमुळे त्याला शाळा सोडून वडिलांना कामात मदत करावी लागते. बाळूचं बालपण कष्टात हरवतं, पण त्याच्या मनात स्वप्न पाहण्याची उमेद कायम असते.
माणुसकीचा विजय :-
एक प्रसंगी रामूला त्याच्या मालकाकडून मोठ्या अन्याय सहन करावा लागतो. मात्र, तो त्याला माणुसकीच्या मूल्यांना सोडत नाही. कथेच्या शेवटी, रामूच्या कुटुंबाला एक दयाळू व्यक्तीकडून मदत मिळते. या मदतीमुळे त्याचे आयुष्य थोडं सुधारतं आणि बाळूचं शिक्षण सुरू होतं.
कथेमधील संदेश :-
‘अमृत’ कथेचा मुख्य संदेश हा आहे की, गरीबी कितीही असली तरी माणुसकीचा मूल्य टिकवन महत्त्वाचा आहे. परिस्थितीत कितीही कठीण असली तरी माणसाने प्रामाणिक राहाव आणि आपल्या स्वप्नाकडे झगडत राहाव. कथेतील रामूचा पात्र समाजातील गरीब आणि मेहनती लोकांच्या प्रतीक आहे, तर पार्वतीचा पात्र संघर्ष स्त्रीचा दर्शन घडवत.
समारोप :-
अण्णाभाऊ साठे यांच्या ‘अमृत’ कथेने समाजातील दारिद्र्य, अन्याय आणि माणुसकीचा विजय यांचा प्रभावी पट मांडला आहे. ही कथा फक्त एक मनोरंजनात्मक साहित्यिकृत नसून ती समाजातील विषमते विरुद्धचा आवाज आहे. रामूच्या संघर्षातून आपल्या जीवनातील खऱ्या अमृताचा – म्हणजेच माणुसकीचा – अनुभव येतो.
शिफारस : ही कथा वाचकाला अंतमूर्ख करणारी असून त्यातून जीवनातील संघर्ष आणि माणुसकीचा महत्त्व अधोरेखित आहे.

Recommended Posts

The Undying Light

Dr.Pravin Ghule
Share

ShareBook Review: Ahire Shubham First Year B Pharmacy, Divine College of Pharmacy Satana अनडाइंग लाइट’ हे गोपाळकृष्ण गांधींनी लिहिलेलं, हे पुस्तक असून या महिन्यात प्रकाशित झालेलं पुस्तक वाचून बाजूला ठेवले. स्वतंत्र भारतातला त्यांचा वैयक्तिक इतिहास या पुस्तकात मांडला आहे. पुस्तकाचं शीर्षकही किती […]

Read More

THE CANTONMENT CONSPIRACY

Dr.Pravin Ghule
Share

ShareBook Review: Manish Baliram Sawkar, First Year B Pharmacy, Divine College of Pharmacy Satana THE CANTONMENT CONSPIRACY पहलगामजवळच्या बैसरनमध्ये २२ एप्रिलचा तो हल्ला झाला नसता, तर आज कदाचित मुंबई-पुण्यातही माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या नव्या पुस्तकाचे स्वागतसोहळे (बुक-लाँच इव्हेन्ट्स) उत्साहानं भरले […]

Read More