Share

साक्षी प्रमोद मालपुरे, तिसरे वर्ष, (बीटेक), संगणक अभियांत्रिकी, के. के. वाघ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग एज्युकेशन अँड रिसर्च, नाशिक

‘कोसला’ ही भालचंद्र नेमाडे यांची १९६३ साली प्रकाशित झालेली कादंबरी एका पिढीच्या मानसिकतेचं आणि अंतर्मनाच्या संघर्षाचं उत्कृष्ट चित्रण करते. पांडुरंग सांगवीकर या साध्या, ग्रामीण भागात वाढलेल्या तरुणाच्या आयुष्याभोवती फिरणारी ही कथा केवळ त्याच्या वैयक्तिक अनुभवांची गोष्ट नाही, तर ती समाज आणि जीवन याबाबतच्या व्यापक प्रश्नांवर प्रकाश टाकते.
पांडुरंग शिक्षणासाठी पुण्यासारख्या शहरात जातो. सुरुवातीला शहराचे चकचकीत जीवन त्याला वेगळं वाटतं, पण जसजसं त्याला कृत्रिमतेचा अनुभव येतो, तस तो वैतागतो. गावातील साधं, मोकळं आयुष्य आणि शहरातील स्वार्थी जीवन यामधील तफावत त्याला सतत जाणवत राहते. शिक्षणव्यवस्थेतील त्रुटी, कुटुंबीयांची अपेक्षा, आणि नात्यांमधील गोंधळ यामुळे तो स्वतःच्या अस्तित्वाचा अर्थ शोधत राहतो. मला हे पुस्तक वाचताना असं वाटलं की, पांडुरंग सांगवीकर या नायकाच्या जीवनातील प्रसंगामधून मीही स्वतःला शोधत होते.
‘कोसला’च्या मुखपृष्ठावरील वटवृक्ष हे कथेचं सार दर्शवतं. वटवृक्ष स्थैर्य आणि मुळांशी जोडले- पणाचं प्रतीक आहे. मात्र, पांडुरंगाच्या आयुष्यात हा वटवृक्ष नुसत्या स्मृतींचं प्रतीक बनतो.
मुखपृष्ठावरील रिकामं वातावरण जणू त्याच्या आयुष्यातील एकटेपणा आणि मोकळी दर्शवतं.
कादंबरीतील काही प्रसंग मला विशेष भावले. उदा. पांडुरंगचा मित्र गप्पा मारताना म्हणतो, “आपण शिकतोय काय ? आणि शिकून काय होणार? शिक्षणाच्या अर्थावर प्रश्नचिन्ह उभं करणारा हा प्रसंग आजच्या काळातही तितकाच लागू होतो.
तसंच, पांडुरंगच्या कुटुंबीयांचं त्याच्यावरील अपेक्षांचं ओझंही मला खूप भावलं. त्याच्या वडिलांना त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा असतात, पण त्याला त्या पूर्ण करता येत नाहीत. यामुळे त्याला सतत अस्वस्थ वाटतं. त्याचा मित्र श्रीरंगसारखा साधा व्यक्तीही त्याला जीवनाचं तत्वज्ञान शिकवतो. वटवृक्षाखाली बसून श्रीरंग म्हणतो,” आपण आपल्या मूळांपासून दूर जात आहोत”. हा संवाद अत्यंत विचारप्रवर्तक आहे.
कादंबरीचं कथानक साधं असूनही तिची शैली खूप वेगळी आहे. पारंपरिक कथा किंवा नायकाच्या यशाची गाथा याऐवजी हा एक अंतर्मुख प्रवास आहे. पांडुरंगच्या विचारांमधून लेखकाने जीवनातील गोंधळ आणि असमाधान मांडलं आहे.
कांदबरीचा शेवटही मला खूप विचार करायला लावणारा वाटला. पांडुरगाच्या प्रश्नांची उत्तरे त्याला मिळत नाहीत, पण त्याला शांततेचा मार्ग सापडतो. कधी कधी आयुष्याचे उत्तर शोधण्यातच खरी मजा असते, हे मला या शेवटातून शिकायला मिळालं. ‘कोसला’ फक्त एका तरुणाची गोष्ट नसून, ती समाजाच्या विसंगतीचे आणि अस्तित्वाच्या प्रश्नांचं प्रतीक आहे.
मुखपृष्ठावरील वटवृक्षापासून ते साध्या-संवादांपर्यंत, प्रत्येक गोष्ट वाचकाला अंतर्मुख करते. प्रत्येकाने ही कांदबरी वाचायलाच हवी, कारण ती आयुष्याकडे एक नवा दृष्टिकोन देते.

Related Posts

उद्योग 4.0 ते 5.0

Manohar Nandan
Shareया पुस्तकात इंडस्ट्री ४.० ते ५.० ज्या तंत्रज्ञानांवर आधारलेली आहे त्या सगळ्या तंत्रज्ञानांची सोप्या भाषेत पण सखोल ओळख करून दिली...
Read More

सराांनी ललहहलय त्यामुळे पढना तो बनता है! कारण त्याांच्या प्रत्येक पस्ुतकातल्या सखोल लेखनाने मला कायमच अचांबबत केलय

Manohar Nandan
Share‘मनात’ हे पुस्तक अच्युत गोडबोले सराांनी ललहहलय त्यामुळे पढना तो बनता है! कारण त्याांच्या प्रत्येक पस्ुतकातल्या सखोल लेखनाने मला कायमच...
Read More