Dr. Anpat Sandip Maruti,(sandipanpat2@gmail.com),Assistant Professor,
Marathwada Mitra Mandals College of Commerce Pune
गांधींसारखा तेजस्वी निश्चयी पुरुष! बाहेर सतत यश बघणारा महामानव! पण हे यश उंभरठ्या बाहेरच असावं? १९२९ची असहकाराची लढत असो व १९३१ ची सविनय कायदेभंगाची चळवळ असो, गोलमेज परिषदेचा प्रसंग असो कि चलेजाव चळवळीचा अटीतटीचा क्षण असो. चाळीस करोड लोकांच्या भविष्याविषयीच्या मंत्रणा संपवून बापू मध्यरात्री घरी येत तेव्हा आपल्या लाडक्या पुत्राच्या कृत्यांपुढे हतबल होऊन पराभव पत्करावा लागत असे.
हि कादंबरी हरिलाल गांधी या गांधीजींच्या जेष्ठ पुत्रावर आधारित आहे. कादंबरीमध्ये पिता पुत्राच्या नात्यावर प्रामाणिक प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. इतिहासाच्या पुराव्याचा दस्तऐवज नाही. या कादंबरीमध्ये लेखकाने मानवी मनोवृत्तीच्या अनेक पैलूंना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आहे.