Share

नाना मी साहेब झालो हे पुस्तक उपेक्षित सालगड्याच मुलगा ते आय आर एस अधिकारी यांचा
एक जगा वेगळा जीव घेणा संघर्ष आहे . सदर पुस्तकामध्ये वडील आणि आई सालगड्याचे काम
करत असतात . तसेच वडील हे दिव्यांग असूनही गरिबी कायम पाट्यावर पुंजलेली दिसत आहे .
लेखकाचे पहिलीचे शिक्षण ते आय एस. आर अधिकारी पदापर्यंत घोडदौंड ही गरीब व ग्रामीण
भागातील विद्यार्थांना प्रेरणा देणारी आहे . हे पुस्तक लिहिताना लेखकाचा मते अधिकारी
होण्याच्या अगोदरचे जीवन मागे वळून पाहताना खूप धाक्कादायक वाटत आहे . पण या
अनुभवाने प्रथम जगायला आणि त्यानंतर टिकून राहायला शिकवले . अपेक्षा, दारिद्र ,उपासमार
,अपंगत्व नैसर्गिक आपत्ती, संकटे या विविध बाबी लिहताना एका हाताने लिहित असताना
दुसऱ्या हाताने अनेकवेळा डोळे पुसावे लाग होते . कधी – कधी लेखकाचे आश्रू थांबत
नसल्याने लिहिणे थांबवून शांत बसत आले . सदर पुस्तकात त्यांना जो जीवनात अनुभव
आला असा अनुभव वर्यालाही येऊ नये . असे त्यांना वाटते . सदर पुस्तक लिहिताना लेखकाचे
अपंग व्यक्तीच्या जीवन संघर्ष आणि विपरित्त परिस्तिथीत शिक्षण ,एमपी.,यूपीएससी यांची
केलेली तयारी या बाबीवर लक्ष दिलेले आहे . दररोज जीवन जगताना असताना सर्वसाधारण
लोकांना निश्चित विचित्र अनुभव येतात पण अपंग व्यक्तीला मात्र दर क्षणाला असा अनुभव येत
असतो . त्याग ज्ञानी जगतीचे लेबल लावता येणार नाही . अपंग माणसाकडे पाहण्याचा
दुष्टीकोन आता बदलत असला तरी आता सरकारचे जावई या नव्या संधभाचे अंगाने घेतला
जाऊ लागल्याचे या पुस्तकात दिसत आहे . सदरचे पुस्तक वाचल्यानंतर आपण काहीतरी करू
शकतो ,आपण घडू शकतो .यासाठी निश्चितच प्रेरणा मिळाली आहे . सदरच्या पुस्तकात जर
आपल्याकडे इच्छा शक्ती कष्ठ करण्याची तयारी ,चिकाटी जर असेल तर ते आपापल्या
यशापर्यंत नेल्याशिवाय राहणार नाही असे मला वाटते . सदर लेखकाचे घरी मी स्वत जाऊन
आलो असून त्यांचे आई वडील व लेखक यांची घरची परीतिथी मी स्वताही पहिली असून
पुस्तकांचे केलेले वर्णन बरोबर आहे .

Related Posts

माणसं

Dr. Bhausaheb Shelke
Share‘अनिल अवचट’ यांनी ‘माणसं’ या पुस्तकात समाजाचं नकोसे वाटणारे चित्रण अतिशय प्रभावीपणे मांडले आहे. याला ना.ध. गोरे यांची मानलेली प्रस्तावना,...
Read More

मराठी आत्मकथनांतील पारधी समाजजीवन (समीक्षा)

Dr. Bhausaheb Shelke
Shareआधुनिक भारताच्या वाटचालीत काही महत्त्वाच्या घटना घडल्या. त्यामध्ये स्वातंत्र्यप्राप्ती आणि संविधानाची निर्मिती यांचे स्थान महत्त्वाचे आहे. भारताने वासाहतिक व्यवस्थेकडून प्रजासत्ताक...
Read More