शेतकऱ्याचा असूड हे महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेले अत्यंत प्रभावी व क्रांतिकारक पुस्तक आहे. 1881 साली प्रकाशित झालेले हे पुस्तक भारतीय शेतकऱ्यांच्या हलाखीच्या स्थितीचे आणि त्यावरील अन्यायांचे वर्णन करणारे आहे. महात्मा फुले यांनी या ग्रंथाच्या माध्यमातून समाजातील शेतकरी वर्गावर होणाऱ्या शोषणाला वाचा फोडली आहे. त्यांनी सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि सांस्कृतिक अन्यायांविरुद्ध आवाज उठवून शेतकऱ्यांच्या दुर्दशेचे मार्मिक चित्रण केले आहे. शेतकरी वर्ग हा भारतीय समाजाचा कणा असूनही त्याला नेहमीच दीनवाण्या अवस्थेत ढकलले गेले आहे. सावकार, जमीनदार, धर्मगुरू आणि सरकारी व्यवस्थेच्या शोषणामुळे शेतकरी सतत कर्जबाजारी राहत होता. शेतकऱ्याला त्याच्या श्रमाचे योग्य चीज कधीच मिळाले नाही. महात्मा फुले यांनी या परिस्थितीचे मूळ केवळ आर्थिक समस्यांमध्ये नसून सामाजिक विषमतेत आहे, असे ठामपणे मांडले आहे. धर्माच्या नावाखाली, अंधश्रद्धांचा आधार घेत, उच्चवर्णीयांनी शेतकऱ्यांवर नियंत्रण ठेवले. फुले यांनी धर्मशाहीच्या नावाखाली होणाऱ्या शोषणाचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी शेतकऱ्यांना अज्ञान, अंधश्रद्धा आणि अंधानुकरण यांपासून मुक्त होण्याचा सल्ला दिला आहे. शेतकऱ्यांची स्थिती आणि शोषणाचे स्वरूप -पुस्तकात शेतकऱ्यांच्या वेदनांचे वर्णन करताना फुले म्हणतात की, शेतकरी राबराब राबतो; पण त्याच्या श्रमाचे फळ सावकार, जमीनदार आणि भांडवलशाही व्यवस्था लाटून नेतात. त्याला स्वतःच्या कुटुंबाचे उदरनिर्वाह चालवणेही कठीण होते. त्याच्या या स्थितीला धर्मगुरूंच्या पाखंडाचेही कारणीभूत योगदान आहे. फुले यांच्या मते, धर्माच्या नावावर शेतकऱ्यांना फसवले गेले आणि त्यांना गुलाम बनवले गेले. फुले यांचे विचार व शेतकऱ्यांसाठी आवाहन-फुले यांनी शेतकऱ्यांना जागे होण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी संघर्ष करण्याचे आवाहन केले आहे. शिक्षण हा शोषणातून मुक्त होण्याचा सर्वात प्रभावी मार्ग असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. फुले यांनी महिला शिक्षणालाही तितकेच महत्त्व दिले आहे, कारण स्त्रियांच्या सक्षमीकरणाशिवाय समाजाची प्रगती होऊ शकत नाही. महात्मा फुले यांच्या लेखनशैलीत थेटपणा आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या वेदनांना अतिशय स्पष्ट व प्रभावी भाषेत मांडले आहे. त्यांची भाषा सामान्य लोकांना समजणारी असून, ती वाचकाला विचार करायला प्रवृत्त करते. पुस्तकाचे महत्व -शेतकऱ्याचा असूड हे केवळ एका विशिष्ट काळातील सामाजिक परिस्थितीचे वर्णन करणारे पुस्तक नाही, तर ते शेतकरी, कामगार आणि उपेक्षित वर्गासाठी एक प्रेरणादायी ग्रंथ आहे. फुले यांनी दिलेल्या संदेशामुळे सामाजिक न्यायाच्या चळवळींना नवी दिशा मिळाली.
Previous Post
Things Fall Apart Next Post
श्रीमान योगी Related Posts
ShareBook Review-Vandita Satish Bhosale, Pune District Education Association’s Law College, Hadapsar, Pune-28. The diary of young girl is a profound...
ShareThis novel is a realistic fiction novel that was written during the 1970s and is set in a small Indian...
Shareपुस्तक परीक्षण मुग्धा वाघ तृतीय वर्ष वाणिज्य श्रीमंती दुर्गाबाई मुकुंददास लोहिया महिला वाणिज्य महाविद्यालय रतन टाटा यांचं पुस्तक वाचून खूप...
