Share

कादंबरीचा नायक खंडेराव हा ग्रामीण महाराष्ट्रातील जीवनाचे प्रतिनिधित्व करतो. त्याच्या जीवनप्रवासाच्या माध्यमातून, नेमाडे यांनी समाजातील विविध घटकांचे, त्यांच्या परस्परसंबंधांचे, आणि सांस्कृतिक मूल्यांचे चित्रण केले आहे. कादंबरीची भाषा आणि ओघवती शैली वाचकाला त्या काळातील ग्रामीण जीवनाच्या जवळ घेवून जाण्यात यशस्वी होते. सुरुवातीला वाचकाला कादंबरी समजायला थोडी अवघड वाटते पण साधारण 50-60 पाने वाचून झाल्यावर थोडी थोडी समजायला लागते. त्यानंतर वाचकाला कादंबरी गुंतवून ठेवायला लागते.
एकंदरीत लेखकाने वाचकांना संदेश दिलेला आहे की व्यक्ति कितीही मोठी झाली तरी त्याची मुळे, त्याची नाळ त्याला आपल्या संस्कृति मध्ये / मुळ ठिकाणी परत येण्यास भाग पाडतात. खंडेरावचा प्रवास आपल्याला आपला प्रवास वाटू लागतो आणि आपण त्यात गुरफटून जातो. मला वाटते हे लेखकाचे यश आहे. पट्टीच्या वाचकाने जरूर वाचावी अशी कादंबरी आहे.

Related Posts

फकिरा संघर्ष

Dr. Uday Jadhav
Shareनावः पशिक काशिनाथ पाईकराव वर्ग:-TYBCA(SCI) पुस्तकाचे नावः फकिरा पुस्तकाचे लेखकः अण्णाभाऊ साठे फकिरा हि कादंबरी अण्णाभाऊ साठे यांच्या लिखाणाचे सर्वोत्तम...
Read More

हे पुस्तक म्हणजे एका आईची हृदय विदिर्ण करणारी कहाणी!

Dr. Uday Jadhav
Shareएक पूर्ण अपूर्ण हा नीला सत्यनारायण यांचा ग्रंथ आहे. ही त्यांची स्वतःची आत्मकथा आहे. ग्रंथाली प्रकाशन ने ही प्रकाशित केलेली...
Read More

मृत्युंजय

Dr. Uday Jadhav
Share मृत्युंजय ही एक ऐतिहासिक कादंबरी आहे. सर्वसामान्यांना महाभारतातील खलनायक म्हणून परिचित असलेल्या महावीर कर्णाच्या असामान्य व्यक्तिमत्वाच्या मागोवा घेणारी ही...
Read More