संगमनेर नगरपालिका कला, दा.ज. मालपाणी वाणिज्य आणि ब. ना. सारडा विज्ञान महाविद्यालय (स्वायत्त), संगमनेर जि. अहमदनगर
विद्यार्थी – वाळे अपेक्षा रमेश
वर्ग – एफ.वाय .बी.सी.ए. (सी.ए.)
पुस्तकाचे नाव – सोनसाखळी
लेखकाचे नाव – साने गुरुजी
पुस्तक परीक्षण / पुस्तक अभिप्राय
‘सोनसाखळी’ ही साने गुरुजींची एका सुंदर कथासंग्रहाची रचना आहे. जिथे स्नेहा, माणूसकी, आणि संवेदनशीलता यांचे दर्शन घडते या कथांमधून साने गुरुजींनी साब्या पण ह्दयस्पर्शी प्रसंगांद्वारे जीवनातील महत्त्वाचा मूल्यावर प्रकाश टाकला आहे. सोनसाखळी कथेत एका लहान मुलीचा आणी तिच्या वडिलांच्या गोड संवाद आहे. या कथेचा मुख्य गाभा हणजे माणसातील निसर्गाशी असलेले नाते. कथेतील मुलगी अत्यंत निरागस असून तिला एका फळाचे आकर्षण आहे. फळाची तुलना लेखकाने सोन्यासारखी केली आहे. तिचे वडील तिला तिच्या इच्छांचे महत्त्व समजावतात तसेच तिला प्रेम, तत्वज्ञान आठी सहदयता शिकवतात, या कथेतून वाचकाला कुंटुबातील नातेसंबंधची महत्त्वाची जाणीव येते. साने गुरुजींनी आपल्या साध्या भाषेतून या मुलीच्या भावना आणि तिच्या वडिलांची काळजी ह्दयस्पर्शीपणे मांडली आहे. मुलगी आहे मुलगा आपल्या आजूबाजूच्या गोष्टीकडे निरागसतेने पाहते. त्यातून माणसाच्या स्वच्छ मनाचा संदेश दिला.